शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Kolhapur Politics: संभाजीराजेंचे 'स्वराज्य'च लोकसभेच्या मार्गात अडसर 

By विश्वास पाटील | Updated: January 20, 2024 16:03 IST

राज्यसभेलाही हाच ठरला होता अडथळा

कोल्हापूर : स्वराज्य संघटनेचा बंध तोडून टाकला तरच माजी खासदार संभाजीराजे यांचा कोल्हापूर मतदार संघातून महाविकास आघाडीकडून विचार होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी दोन पावले मागे येण्याची गरज आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या पाठिंब्यावर स्वराज्य संघटनेकडून ते लढतो म्हटले तर त्यास या पक्षांकडून संमती मिळण्याची शक्यता नाही. राज्यसभेच्या निवडणुकीतही त्यांना याच मुद्द्यावर माघार घ्यायला लागली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याच्यादृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणारा आहे.इचलकरंजीत गुरुवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या बाबतीतही असाच मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यांनाच जर दोन्ही आघाड्या नको आहेत तर आपण त्यांच्यामागे फरफटत जाऊ नये. आघाडीतील घटक पक्षांतील कुणालाही उमेदवारी द्यावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. संभाजीराजे यांच्याबाबतीतही तोच मुद्दा उपस्थित होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना खुली ऑफर दिली होती. परंतु संभाजीराजे हे अपक्ष लढणार या भूमिकेवर ठाम राहिले. अपक्ष लढून सर्वांनी पाठिंबा द्यावा असा त्यांचा त्यावेळी प्रयत्न होता. त्याला यश आले नाही. त्यातून शिवसेनेत व त्यांच्यात कटूता निर्माण झाली. आताही त्यांना दोन बाबींचा तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे. एक म्हणजे कोल्हापूर की नाशिक हे अगोदर निश्चित करावे लागेल. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ते स्वराज्यसाठी जागा सोडा असा आग्रह धरत आहेत. परंतु त्यांना जागा सोडण्याऐवजी स्वराज्यची महाराष्ट्राच्याच नव्हे तर कोल्हापूरच्या राजकारणातही स्पेस नाही. शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका घेण्यामागे त्यांचे स्वत:चे काही गणित आहे. यापूर्वी तीच भूमिका घेऊन ते दोनवेळा खासदार झाले आहेत. हातकणंगलेत स्थानिक कार्यकर्ते कितीही आक्रमक झाले तरी महाविकास आघाडीपुढे शेट्टी यांच्याशिवाय अन्य पर्यायही नाही. शिवाय तिन्ही घटक पक्षांचे केंद्रीय नेतृत्व त्यांना जागा सोडण्याची घोषणा करत असल्याने शेट्टी यांचा भाव वधारला आहे. तशी स्थिती संभाजीराजे यांच्या बाबतीत नाही. त्यांच्या उमेदवारीला नक्कीच बळ मिळू शकते परंतु त्यासाठी त्यांना एकतर शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये थेट प्रवेश करावा लागेल. दुसऱ्याला पोरगं झाले म्हणून आम्ही किती दिवस पेढे वाटायचे अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. म्हणून ही जागा कोणत्या पक्षाकडे जाऊ शकते याचा अंदाज घेऊन त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. कोल्हापूर शहर मतदार संघातून २००४ ला राष्ट्रवादीत सक्रिय असलेल्या मालोजीराजे यांना रात्रीत काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना मैदानात उतरवले व ते विजयी झाले हा इतिहास आहे. ही निवडणूकही त्याच दिशेने जाताना दिसत आहे. देशभरातील राजेराजवाडे सत्तेसाठी भाजपकडे जात असताना कोल्हापूरचे छत्रपती घराणे जर महाविकास आघाडीसोबत जात असेल तर त्यातून देशभर वेगळाच मेसेज जाणार आहे. त्याअर्थानेही संभाजीराजे यांची उमेदवारी महत्त्वाची ठरणारी आहे.

अन्य संभाव्य इच्छुक असेकोल्हापूर मतदार संघ :महाविकास आघाडी : संजय घाटगे, व्ही. बी. पाटील, चेतन नरके, बाजीराव खाडे

हातकणंगले मतदार संघमहायुती : राहुल आवाडे, संजय पाटीलमहाविकास आघाडी : प्रतीक जयंत पाटील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती