शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

'कुबेरांच्या पुस्तकातून संभाजी महाराज यांची बदनामीच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 14:09 IST

ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे. कोणताही पुरावा नसताना त्यांनी विकृ़त लिखाण केले आहे, असे स्पष्ट मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी व्यक्त केले.

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करीत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा निषेध केला. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी विविध घटकातून चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कुबेर यांच्या पुस्तकावर शहीद गोंविद पानसरे विचारमंचर्फे परिसंवादाचे शाहू स्मारक भवनात आयोजन करण्यात आले. संयोजकांना दोन्ही बाजू लोकांसमोर मांडायच्या होत्या. परंतु, कुबेर यांच्या बाजूने कुणी उपस्थित राहिले नाही.

सावंत म्हणाले, कुुबेरांनी लिहिलेल्या या पुस्तकात नथुराम गोडसे, गोळवलकर, सावरकर यांचे फोटो छापले आहेत. त्यांचे उदात्तीकरणही केले आहे. आताच्या राजकारणातले फडणवीस, गडकरी यांची भलावण केली आहे. यावरून कुबेर यांनी कोणत्या मानसिकतेतून हे पुस्तक लिहिले आहे, हे समोर येते. त्यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची नोंद घेण्याचे टाळले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासंंबंधी लिहिलेले नाही. संभाजी महाराजांच्या चांगल्या कामगिरीचे उद्दात्तीकरण केलेले नाही. यावरूनच इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा त्यांचा डावही लक्षात येतो. म्हणूनच सहा महिन्यांपूर्वी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, खासदार अमोल कोल्हे यांनी पुस्तकावर बंदीची मागणी केली; पण याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने कुबेरांवर शाई फेकली. या कृत्यानंतर तरी पुस्तकातील बदनामीकारक मजकूर वगळण्यासाठीची व्यापक चर्चा सुरू झाली, हे महत्त्वाचे आहे.

यावेळी काँग्रेसचे ॲड. गुलाबराव घोरपडे, संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव परुळेकर, जिजाऊ ब्रिग्रेडच्या सुनंदा चव्हाण, अनिल चव्हाण यांनी कुबेरांनी संभाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे सांगितले. सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. बाबा ढेरे यांच्यासह श्रोते उपस्थित होते. दिलदार मुजावर यांनी आभार मानले. सुनीता अमृतसागर यांनी सूत्रसंचालन केेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर