शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

'कुबेरांच्या पुस्तकातून संभाजी महाराज यांची बदनामीच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 14:09 IST

ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे. कोणताही पुरावा नसताना त्यांनी विकृ़त लिखाण केले आहे, असे स्पष्ट मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी व्यक्त केले.

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करीत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा निषेध केला. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी विविध घटकातून चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कुबेर यांच्या पुस्तकावर शहीद गोंविद पानसरे विचारमंचर्फे परिसंवादाचे शाहू स्मारक भवनात आयोजन करण्यात आले. संयोजकांना दोन्ही बाजू लोकांसमोर मांडायच्या होत्या. परंतु, कुबेर यांच्या बाजूने कुणी उपस्थित राहिले नाही.

सावंत म्हणाले, कुुबेरांनी लिहिलेल्या या पुस्तकात नथुराम गोडसे, गोळवलकर, सावरकर यांचे फोटो छापले आहेत. त्यांचे उदात्तीकरणही केले आहे. आताच्या राजकारणातले फडणवीस, गडकरी यांची भलावण केली आहे. यावरून कुबेर यांनी कोणत्या मानसिकतेतून हे पुस्तक लिहिले आहे, हे समोर येते. त्यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची नोंद घेण्याचे टाळले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासंंबंधी लिहिलेले नाही. संभाजी महाराजांच्या चांगल्या कामगिरीचे उद्दात्तीकरण केलेले नाही. यावरूनच इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा त्यांचा डावही लक्षात येतो. म्हणूनच सहा महिन्यांपूर्वी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, खासदार अमोल कोल्हे यांनी पुस्तकावर बंदीची मागणी केली; पण याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने कुबेरांवर शाई फेकली. या कृत्यानंतर तरी पुस्तकातील बदनामीकारक मजकूर वगळण्यासाठीची व्यापक चर्चा सुरू झाली, हे महत्त्वाचे आहे.

यावेळी काँग्रेसचे ॲड. गुलाबराव घोरपडे, संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव परुळेकर, जिजाऊ ब्रिग्रेडच्या सुनंदा चव्हाण, अनिल चव्हाण यांनी कुबेरांनी संभाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे सांगितले. सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. बाबा ढेरे यांच्यासह श्रोते उपस्थित होते. दिलदार मुजावर यांनी आभार मानले. सुनीता अमृतसागर यांनी सूत्रसंचालन केेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर