शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

'कुबेरांच्या पुस्तकातून संभाजी महाराज यांची बदनामीच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 14:09 IST

ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे. कोणताही पुरावा नसताना त्यांनी विकृ़त लिखाण केले आहे, असे स्पष्ट मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी व्यक्त केले.

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करीत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा निषेध केला. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी विविध घटकातून चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कुबेर यांच्या पुस्तकावर शहीद गोंविद पानसरे विचारमंचर्फे परिसंवादाचे शाहू स्मारक भवनात आयोजन करण्यात आले. संयोजकांना दोन्ही बाजू लोकांसमोर मांडायच्या होत्या. परंतु, कुबेर यांच्या बाजूने कुणी उपस्थित राहिले नाही.

सावंत म्हणाले, कुुबेरांनी लिहिलेल्या या पुस्तकात नथुराम गोडसे, गोळवलकर, सावरकर यांचे फोटो छापले आहेत. त्यांचे उदात्तीकरणही केले आहे. आताच्या राजकारणातले फडणवीस, गडकरी यांची भलावण केली आहे. यावरून कुबेर यांनी कोणत्या मानसिकतेतून हे पुस्तक लिहिले आहे, हे समोर येते. त्यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची नोंद घेण्याचे टाळले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासंंबंधी लिहिलेले नाही. संभाजी महाराजांच्या चांगल्या कामगिरीचे उद्दात्तीकरण केलेले नाही. यावरूनच इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा त्यांचा डावही लक्षात येतो. म्हणूनच सहा महिन्यांपूर्वी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, खासदार अमोल कोल्हे यांनी पुस्तकावर बंदीची मागणी केली; पण याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने कुबेरांवर शाई फेकली. या कृत्यानंतर तरी पुस्तकातील बदनामीकारक मजकूर वगळण्यासाठीची व्यापक चर्चा सुरू झाली, हे महत्त्वाचे आहे.

यावेळी काँग्रेसचे ॲड. गुलाबराव घोरपडे, संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव परुळेकर, जिजाऊ ब्रिग्रेडच्या सुनंदा चव्हाण, अनिल चव्हाण यांनी कुबेरांनी संभाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे सांगितले. सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. बाबा ढेरे यांच्यासह श्रोते उपस्थित होते. दिलदार मुजावर यांनी आभार मानले. सुनीता अमृतसागर यांनी सूत्रसंचालन केेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर