शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

'कुबेरांच्या पुस्तकातून संभाजी महाराज यांची बदनामीच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 14:09 IST

ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे. कोणताही पुरावा नसताना त्यांनी विकृ़त लिखाण केले आहे, असे स्पष्ट मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी व्यक्त केले.

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करीत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा निषेध केला. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी विविध घटकातून चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कुबेर यांच्या पुस्तकावर शहीद गोंविद पानसरे विचारमंचर्फे परिसंवादाचे शाहू स्मारक भवनात आयोजन करण्यात आले. संयोजकांना दोन्ही बाजू लोकांसमोर मांडायच्या होत्या. परंतु, कुबेर यांच्या बाजूने कुणी उपस्थित राहिले नाही.

सावंत म्हणाले, कुुबेरांनी लिहिलेल्या या पुस्तकात नथुराम गोडसे, गोळवलकर, सावरकर यांचे फोटो छापले आहेत. त्यांचे उदात्तीकरणही केले आहे. आताच्या राजकारणातले फडणवीस, गडकरी यांची भलावण केली आहे. यावरून कुबेर यांनी कोणत्या मानसिकतेतून हे पुस्तक लिहिले आहे, हे समोर येते. त्यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची नोंद घेण्याचे टाळले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासंंबंधी लिहिलेले नाही. संभाजी महाराजांच्या चांगल्या कामगिरीचे उद्दात्तीकरण केलेले नाही. यावरूनच इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा त्यांचा डावही लक्षात येतो. म्हणूनच सहा महिन्यांपूर्वी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, खासदार अमोल कोल्हे यांनी पुस्तकावर बंदीची मागणी केली; पण याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने कुबेरांवर शाई फेकली. या कृत्यानंतर तरी पुस्तकातील बदनामीकारक मजकूर वगळण्यासाठीची व्यापक चर्चा सुरू झाली, हे महत्त्वाचे आहे.

यावेळी काँग्रेसचे ॲड. गुलाबराव घोरपडे, संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव परुळेकर, जिजाऊ ब्रिग्रेडच्या सुनंदा चव्हाण, अनिल चव्हाण यांनी कुबेरांनी संभाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे सांगितले. सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. बाबा ढेरे यांच्यासह श्रोते उपस्थित होते. दिलदार मुजावर यांनी आभार मानले. सुनीता अमृतसागर यांनी सूत्रसंचालन केेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर