शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

संभाजी ब्रिगेड लोकप्रतिनिधींना जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीती असताना सर्वच राजकीय पक्षांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीती असताना सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा खेळ सुरू केला आहे. सगळ्यांनाच आरक्षण द्यायचे आहे मग आडवले कोणी? मूक आंदोलनासह सर्वच आंदोलने झाली, आता थेट लोकप्रतिनिधींना जाब विचारणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्षे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहे. मात्र राज्यात सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारने आपआपली वोटबँक टिकवण्यासाठी मराठा समाजाची दिशाभूल करून आरक्षण दिले. ‘एसईबीसी’चे आरक्षण टिकणार नाही, अगोदरच आम्ही सांगितले होते. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी गेली तीस वर्षे मराठा सेवा संघ व संभाजी बिग्रेड संघर्ष करत आहे.

परंतु आघाडी व युती सरकारांनी समाजाची फसवणूक केली आहे. बहुजन समाजाचा घटक असलेल्या मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मनोज आखरे यांनी सांगितले. ओबीसीकरण झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण अशक्य असून त्यासाठी राज्यातील सर्व आमदारांनी विधीमंडळात एकमताने निर्णय घेतला पाहिजे, असे आखरे यांनी सांगितले. डॉ. प्रदीप तुपेरे, अण्णासाहेब सावंत, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

संघर्ष तेवत ठेवून राजकीय पोळी भाजली

ओबीसी व मराठा समाजात गेली अनेक वर्षे आरक्षणावरून संघर्ष तेवत ठेवून सर्वच पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजल्याचा आरोप मनोज आखरे यांनी केला.

संभाजीराजेंची भूमिका योग्यच

खासदार संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या पातळीवर त्यांनी केलेल्या मागण्या बाजूला ठेवून आरक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे आल्याचे आखरे यांनी सांगितले.