शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

संभाजी ब्रिगेड लोकप्रतिनिधींना जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीती असताना सर्वच राजकीय पक्षांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीती असताना सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा खेळ सुरू केला आहे. सगळ्यांनाच आरक्षण द्यायचे आहे मग आडवले कोणी? मूक आंदोलनासह सर्वच आंदोलने झाली, आता थेट लोकप्रतिनिधींना जाब विचारणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्षे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहे. मात्र राज्यात सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारने आपआपली वोटबँक टिकवण्यासाठी मराठा समाजाची दिशाभूल करून आरक्षण दिले. ‘एसईबीसी’चे आरक्षण टिकणार नाही, अगोदरच आम्ही सांगितले होते. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी गेली तीस वर्षे मराठा सेवा संघ व संभाजी बिग्रेड संघर्ष करत आहे.

परंतु आघाडी व युती सरकारांनी समाजाची फसवणूक केली आहे. बहुजन समाजाचा घटक असलेल्या मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मनोज आखरे यांनी सांगितले. ओबीसीकरण झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण अशक्य असून त्यासाठी राज्यातील सर्व आमदारांनी विधीमंडळात एकमताने निर्णय घेतला पाहिजे, असे आखरे यांनी सांगितले. डॉ. प्रदीप तुपेरे, अण्णासाहेब सावंत, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

संघर्ष तेवत ठेवून राजकीय पोळी भाजली

ओबीसी व मराठा समाजात गेली अनेक वर्षे आरक्षणावरून संघर्ष तेवत ठेवून सर्वच पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजल्याचा आरोप मनोज आखरे यांनी केला.

संभाजीराजेंची भूमिका योग्यच

खासदार संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या पातळीवर त्यांनी केलेल्या मागण्या बाजूला ठेवून आरक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे आल्याचे आखरे यांनी सांगितले.