शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेड लोकप्रतिनिधींना जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीती असताना सर्वच राजकीय पक्षांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीती असताना सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा खेळ सुरू केला आहे. सगळ्यांनाच आरक्षण द्यायचे आहे मग आडवले कोणी? मूक आंदोलनासह सर्वच आंदोलने झाली, आता थेट लोकप्रतिनिधींना जाब विचारणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्षे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहे. मात्र राज्यात सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारने आपआपली वोटबँक टिकवण्यासाठी मराठा समाजाची दिशाभूल करून आरक्षण दिले. ‘एसईबीसी’चे आरक्षण टिकणार नाही, अगोदरच आम्ही सांगितले होते. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी गेली तीस वर्षे मराठा सेवा संघ व संभाजी बिग्रेड संघर्ष करत आहे.

परंतु आघाडी व युती सरकारांनी समाजाची फसवणूक केली आहे. बहुजन समाजाचा घटक असलेल्या मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मनोज आखरे यांनी सांगितले. ओबीसीकरण झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण अशक्य असून त्यासाठी राज्यातील सर्व आमदारांनी विधीमंडळात एकमताने निर्णय घेतला पाहिजे, असे आखरे यांनी सांगितले. डॉ. प्रदीप तुपेरे, अण्णासाहेब सावंत, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

संघर्ष तेवत ठेवून राजकीय पोळी भाजली

ओबीसी व मराठा समाजात गेली अनेक वर्षे आरक्षणावरून संघर्ष तेवत ठेवून सर्वच पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजल्याचा आरोप मनोज आखरे यांनी केला.

संभाजीराजेंची भूमिका योग्यच

खासदार संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या पातळीवर त्यांनी केलेल्या मागण्या बाजूला ठेवून आरक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे आल्याचे आखरे यांनी सांगितले.