शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

संभाजी ब्रिगेड लोकप्रतिनिधींना जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीती असताना सर्वच राजकीय पक्षांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीती असताना सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा खेळ सुरू केला आहे. सगळ्यांनाच आरक्षण द्यायचे आहे मग आडवले कोणी? मूक आंदोलनासह सर्वच आंदोलने झाली, आता थेट लोकप्रतिनिधींना जाब विचारणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्षे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहे. मात्र राज्यात सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारने आपआपली वोटबँक टिकवण्यासाठी मराठा समाजाची दिशाभूल करून आरक्षण दिले. ‘एसईबीसी’चे आरक्षण टिकणार नाही, अगोदरच आम्ही सांगितले होते. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी गेली तीस वर्षे मराठा सेवा संघ व संभाजी बिग्रेड संघर्ष करत आहे.

परंतु आघाडी व युती सरकारांनी समाजाची फसवणूक केली आहे. बहुजन समाजाचा घटक असलेल्या मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मनोज आखरे यांनी सांगितले. ओबीसीकरण झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण अशक्य असून त्यासाठी राज्यातील सर्व आमदारांनी विधीमंडळात एकमताने निर्णय घेतला पाहिजे, असे आखरे यांनी सांगितले. डॉ. प्रदीप तुपेरे, अण्णासाहेब सावंत, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

संघर्ष तेवत ठेवून राजकीय पोळी भाजली

ओबीसी व मराठा समाजात गेली अनेक वर्षे आरक्षणावरून संघर्ष तेवत ठेवून सर्वच पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजल्याचा आरोप मनोज आखरे यांनी केला.

संभाजीराजेंची भूमिका योग्यच

खासदार संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या पातळीवर त्यांनी केलेल्या मागण्या बाजूला ठेवून आरक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे आल्याचे आखरे यांनी सांगितले.