शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

समरजित यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग : कागल , विक्रमसिंहराजेंचा राजकीय वारसा चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:15 IST

कोल्हापूर/कागल : कागल तालुक्यात खालच्या दर्जाचे राजकारण सुरू असून, त्याला छेद देत समरजितसिंहराजे विकासाचे राजकारण करत आहेत.

ठळक मुद्देघाणेरड्या राजकारणाला कागलकर वैतागले : चंद्रकांतदादाज्यांनी स्वार्थासाठी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आशीर्वादाचा अर्थ काय कळणार.टीकाकारांची नावे घेऊन त्यांना कशाला मोठे करता, त्यांची पात्रता तरी काय? खासदार संभाजीराजे

कोल्हापूर/कागल : कागल तालुक्यात खालच्या दर्जाचे राजकारण सुरू असून, त्याला छेद देत समरजितसिंहराजे विकासाचे राजकारण करत आहेत. राजे विक्रमसिंह घाटगे यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी पुढे यावे, कागलची जनता तुम्हाला साथ देईलच, पण मुख्यमंत्री म्हणून तुमच्या मागे खंबीर उभा राहू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राजे विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीत खंजीर खुपसणारी वृत्ती एका बाजूला आहे आणि दुसºया बाजूला शाहूंच्या संस्काराचे कर्तृत्व आहे, यातील कोणाबरोबर राहायचे हे जनतेने ठरवावे, असे आवाहन करत समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

कागल येथे शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात समरजितसिंह घाटगे यांनी केलेले शक्तिप्रदर्शन व विरोधकांवर चौफेर हल्ला चढवत आपला २०१९चा इरादा स्पष्ट केला. घाटगे म्हणाले, गेल्या वर्षात कागलमध्ये स्वत:ला मोठे करण्यासाठी पुढे येणाºयाला कापले जाते, पण आमच्यावर ‘शाहूंचे संस्कार आहेत. आम्ही कर्तृृत्वाने पुढे जाणार आहे. माझ्यावरील टीका एकवेळ खपवून घेऊ पण मुख्यमंत्र्यांवरील टीका यापुढे खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री दुसºयांदा कागलला आल्याने त्यांचा आशीर्वाद लाभतो का? अशी टीका केली जाते, पण आम्हाला थोरांचे आशीर्वाद घेण्याची सवय आहे. ज्यांनी स्वार्थासाठी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आशीर्वादाचा अर्थ काय कळणार.टीका करणे हे शाहू घराण्याची शिकवण नसल्याचे सांगत खासदार संभाजीराजे म्हणाले, टीकाकारांची नावे घेऊन त्यांना कशाला मोठे करता, त्यांची पात्रता तरी काय? ‘शाहूं’चा विचार घेऊन सकारात्मक राजकारण करा. कागलच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, समरजितराजेंनी विकासाच्या राजकारणातून सामान्य माणसाला आपलेसे केल्याने विरोधक भांबावून गेले आहेत. आतापर्यंत या मंडळींनी गावागावांत विष पेरले, भावाभावांत भांडणे लावून स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांची डोकी फोडली. सकारात्मक व विकासाचे राजकारण करण्याची गरज असली तरी या मंडळींची दुकानदारी बंद होईल. पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच बेछूट आरोप करीत आहेत.कायद्याचा बडगा दाखवाचकागल नगरपालिकेची इमारत आगीने जळली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे जळालेली इमारत शोभत नाही. यासाठी आपण दुरुस्तीसाठी निधी द्यावा, अशी मागणी करतो पण, इमारतीला आग लागली की लावली? याची शहानिशा व्हायला हवी. त्याची चौकशी करून एकदा कायद्याचा बडगा दाखवाच, असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.‘के.पीं’च्या उपस्थितीने भुवया उंचावल्याराष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते व ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कागल येथील सभेला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व समरजितसिंह यांनी त्यांच्यासमोरच हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली.‘शाहूं’च्या कार्यक्षेत्रात गडहिंग्लजचंदगड मतदारसंघापासून आपल्याला तोडल्याची गडहिंग्लजकरांची भावना आहे. त्यांना पोरके वाटत असले तरी ‘शाहू’ ग्रुप त्यांना आपलेसे करणार असून, गडहिंग्लज तालुक्यातील ४१ गावांना ‘शाहू’च्या कार्यक्षेत्रात घेत असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.मंडलिकांवर टीका संभाजीराजे व समरजितसिंह घाटगे हे भाजपचे लाभार्थी असल्याची टीका संजय मंडलिक यांनी केली होती. त्यावर समरजितसिंह म्हणाले, ज्यांच्याकडे कर्तृत्वच नाही त्यांना कर्तृत्व व लाभातील फरक काय कळणार? ज्यांचा मोबाईल कायम बंद असतो, त्यांची आमच्यावर टीका करण्याची पात्रता काय? त्याची दखल घेण्याची गरज नसल्याची खिल्ली संभाजीराजे यांनी उडवली.महिला, तरुणांची उपस्थिती लक्षणीयगहिनीनाथ गैबी पीर नगरातील पटांगणावर कागल, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला होता. मेळाव्याला तरुण व महिलांची संख्या लक्षणीय होती. तरुणांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता. सभेनंतर जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडल्याने कागल शहरातील रस्ते तासभर तुंबले होते.समरजितसिंहराजेंच्या घोषणा....कागल व गडहिंग्लजमध्ये बॅँकेच्या दहा नवीन शाखामुद्रालोनच्या धर्तीवर बॅँकेच्या वतीने युवकांना ‘शाहू’ कर्ज योजनागडहिंग्लजमधील ४१ गावे ‘शाहंू’च्या कार्यक्षेत्रातजिजाऊ संघटनेच्या वतीने महिलांना कॅन्सर प्रबोधन व उपचारशंभर एकरांवर सोलर, नैसर्गिक व सेंद्रिय शेती.