शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

बाजार समितीत भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 14:29 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने होत आहे. कोबी १, वांगी ५, टोमॅटो २ तर ढब्बू १० रुपये किलोने विक्री होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देबाजार समितीत भाजीपाल्याची विक्री मातीमोल दरानेकोबी १, वांगी ५, टोमॅटो २ तर ढब्बू १० रुपये किलो : शेतकरी हवालदिल

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने होत आहे. कोबी १, वांगी ५, टोमॅटो २ तर ढब्बू १० रुपये किलोने विक्री होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.अतिवृष्टी, महापुरात संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली; त्यातून सावरत पुन्हा लागवड केलेल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळेल असे अपेक्षित होते. साधारणत: आपल्याकडे आॅक्टोबरपासून स्थानिक भाजीपाला बाजारात येतो आणि दर उतरतात. मात्र, यंदा परतीच्या पावसाने भाजीपाला उशिरा आला.

डिसेंबर, जानेवारीपर्यंत भाजीपाल्याचे दर खाली येतात, मात्र फेबु्रवारीनंतर ते वाढू लागतात. उन्हाचा तडाका जसा वाढत जातो, तसे उत्पादन कमी मिळते. मागणी आणि पुरवठा यात तफावत राहते, परिणामी, दर वाढू लागतात मात्र, यंदा काहीशी परिस्थिती उलटी दिसते. फेबु्रवारी संपत आला तरी भाजीपाल्याच्या दरातील घसरण काही थांबत नाही.

मंगळवारी तर भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली. कोबीची २७८ पोत्यांची आवक झाली, यामध्ये किमान १ ते कमाल दर ५ रुपये किलो झाला. वांग्याच्या दरातही मोठी घसरण झाली असून, घाऊक बाजारात ५ पासून १५ रुपयांपर्यंत दर राहिला आहे.

शेतकऱ्यांना टोमॅटो बाजारापर्यंत आणायचा सोडाच, पण त्याच्या काढणीचे पैसेही अंगावर बसत आहेत. एरव्ही बारमाही तेजीत असणाऱ्या ढब्बूने शेतकऱ्यांना घाम फोडला असून, १० रुपये किलोने विक्री करावी लागत आहे. तीच अवस्था गवारी, कारली, भेंडी, दोडक्याची आहे.कोल्हापूर बाजार समितीमध्ये येणारा निम्मा माल रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जातो. मात्र, आता निपाणीतील दहा-बारा शेतकरी एकत्रित येऊन थेट कोकणात माल पाठवत असल्याने येथील मालाला उठाव नाही, हेही दर घसरण्यामागे कारण सांगितले जाते. दरातील घसरण आणि कमिशनबाबत भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष जमीर बागवान यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कर्नाटकातील आवकेचाही परिणामकर्नाटकातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. विशेषत: घटप्रभा येथून जिल्ह्यातील मोठमोठ्या बाजारात भाजीपाला विक्रीसाठी येत असल्याने दरावर परिणाम होत असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

कोबीच्या गड्ड्यापेक्षा रोपाला दुप्पट दररोपवाटिकेतून कोबीचे रोप घेतले तर त्यासाठी दोन रुपये लागतात. त्याचा महिना-दीड महिना सांभाळ करून त्यापासून बनवलेला कोबीचा गड्डा मात्र एक रुपयाला विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.कमिशन वसुलीतूनही लूटकायद्याप्रमाणे खरेदीदारांकडून ६ टक्के प्रमाणे कमिशन घ्यायचे असते. मात्र, भाजीपाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडूनच वसूल केले जातात. तक्रार येणार म्हणून त्याच्या पट्टीत न लावता, पैसे देताना तेवढे कमी करूनच दिले जाते, याबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

व्यापारी जाणीवपूर्वक दर पाडत असून, नफा राहूदे खर्चच अंगावर येत आहे. त्यात ६ टक्केप्रमाणे कमिशन आमच्यातून घेऊन पिळवणूक सुरू आहे. याबाबत तक्रार करायची तर समिती पुरावे मागते.-महादेव वाघमोडे, शेतकरी, अंंबप

स्थानिक भाजीपाला आल्याने दरात घसरण झाली, ही वस्तुस्थिती आहे. कमिशनबाबत तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी समितीकडे यावे, संबंधित व्यापाºयांवर कारवाई केली जाईल.-गजानन पाटील, विभागप्रमुख, भाजीपाला 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर