शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

‘ब्याडगी’च्या नावाखाली ‘सिजन्टा’ची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:17 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ब्याडगी मिरचीच्या नावाखाली ‘सिजन्टा’ मिरचीची राजरोस विक्री सुरू आहे. ‘ सिजन्टा ’ दिसायला ‘ब्याडगी’सारखी असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असून, मिरची विक्रेत्यांकडून ब्याडगीच्या दरातच विक्री सुरू आहे. ग्राहकांच्या आता लक्षात येणार नाही, पण पावसाळ्यात ‘सिजन्टा’ मिरचीची चटणी पिवळसर पडण्यास सुरुवात होईल आणि खरे रूप समोर ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ब्याडगी मिरचीच्या नावाखाली ‘सिजन्टा’ मिरचीची राजरोस विक्री सुरू आहे. ‘सिजन्टा’ दिसायला ‘ब्याडगी’सारखी असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असून, मिरची विक्रेत्यांकडून ब्याडगीच्या दरातच विक्री सुरू आहे. ग्राहकांच्या आता लक्षात येणार नाही, पण पावसाळ्यात ‘सिजन्टा’ मिरचीची चटणी पिवळसर पडण्यास सुरुवात होईल आणि खरे रूप समोर येणार आहे.पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून लाल मिरचीचा हंगाम जोरात सुरू आहे. कोल्हापुरात साधारणत: आंध्रप्रदेश व कर्नाटकातून मिरचीची आवक होते. यंदा मिरचीचे पीक कमी झाल्याने आवक मंदावली आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून मिरची मागणीप्रमाणे येत नसल्याने दर थोडे चढेच राहिले आहेत. किलोमागे चाळीस ते पन्नास रुपयांनी दरात वाढ झाली आहे.साधारणत: कोल्हापूर जिल्ह्यात लाल व तिखट चटणी खाण्याची सवय आहे. ही चटणी तिखट पण तेवढीच रूचकर लागत असल्याने ‘ब्याडगी’ अधिक लाल तिखट मिरची एकत्रित करून चटणी केली जाते. त्यामुळेच ‘ब्याडगी’ संकेश्वरी मिरचीला अधिक पसंती आहे; पण दोन वर्षांपासून मिरचीमध्ये भेसळ सुरू झाली आहे. गेल्यावर्षी आंध्रप्रदेशमधून ‘लाली’ मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. व्यापाऱ्यांनी त्याची विक्री ‘ब्याडगी’च्या दरानेच केली होती.यंदा ‘लाली’ आणि ‘ब्याडगी’चे क्रॉस करून ‘सिजन्टा’ मिरची बाजारात आली आहे. ‘सिजन्टा’ दिसायला ‘ब्याडगी’सारखीच दिसते; पण या मिरचीचा खरा दर १२० रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहे. त्याची विक्री ‘ब्याडगी’च्या नावाखाली करून १८० ते २०० रुपये किलोने सुरू आहे. ‘ब्याडगी’ आणि ‘सिजन्टा’ या मिरचीतील फरक घाऊक व्यापाºयांनाच माहिती आहे. त्यामुळे किरकोळ व्यापाºयांनाही चकवा बसला असून तेही याबाबत अनभिज्ञ आहेत. तेही ‘ब्याडगी’म्हणूनच ‘सिजन्टा’ची विक्री करत आहेत. चटणी केल्यानंतर त्याचा फरक दिसणार नाही, पावसाळ्यात ती पिवळी पडण्यास सुरुवात होणार आहे.‘सिजन्टा’ कशी ओळखायचीब्याडगी मिरचीचा शेंडा आपण खाल्ला तर तोंड भाजते; पण ‘सिजन्टा’ मिरचीचा शेंडा गोड लागतो आणि नंतर आंबट वाटतो. ग्राहकांनी चवीतून खरी ‘ब्याडगी’ ओळखली पाहिजे.