शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

सदाभाऊंचे ‘घट’ बसले, रयत क्रांती संघटनेची घोषणा, यंदाचा ऊस दर मीच ठरवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 05:01 IST

‘रयत क्रांती संघटना’ या नव्या शेतकरी संघटनेची स्थापना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी घटस्थापनेदिवशी कोल्हापुरात केली.

कोल्हापूर : ‘रयत क्रांती संघटना’ या नव्या शेतकरी संघटनेची स्थापना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी घटस्थापनेदिवशी कोल्हापुरात केली. बत्तीस वर्षे शेतकºयांसाठी लढलो. कितीही संकटे, वादळे आली तरी त्यांना वेसण घालू, असे सांगून यंदा ऊसदरासाठी कोणाला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, आपण जो दर सांगू तोच अंतिम असेल, असा दावाही खोत यांनी केला.मेळाव्यात बोलताना खोत यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता टीका केली. आजचा दिवस येईल, असे कधीही वाटले नव्हते, पण नियतीच्या पोटात काय दडले होते, हे माहिती नसल्याचे सांगत खोत म्हणाले, बत्तीस वर्षांत संघर्षाने कधी पाठ सोडली नाही, हा प्रवास करत एका नव्या वळणावर उभा राहिलो आहे. अंबाबाईचे दर्शन घेऊन नव्या अध्यायाची सुरुवात करत आहोत. शरद जोशी यांनी शेतीचे अर्थकारण शिकविले आणि गावगाड्यातील अंगठाबहाद्दर शेतकºयांना बरोबर घेऊन राजकारणातील जहागीरदार, लक्ष्मीपुत्रांच्या बरोबर लढलो. दोन्ही कॉँग्रेसची राजवट उधळूून लावली, पण वतनदारी आडवी आली. मला संपविण्याबरोबरच माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप खोत यांनी केला.सदाभाऊंना आली चक्करजिल्हा दौºयावर आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना गुरुवारी दुपारी १च्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे अचानक तब्येत बिघडल्याने चक्कर आली. त्यांना तत्काळ परिसरातील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. सदाभाऊंवर तातडीने उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर ते पुढील कार्यक्र्रमासाठी रवाना झाले.>बिल्ला काढण्याची हिंमत होणार नाहीछातीवर बिल्ला नसल्याने कुंकू नसलेल्या महिलेसारखी अवस्था झाल्याचे सांगत खोत म्हणाले, माझ्या आईने छातीवर बिल्ला लावल्याने तो काढण्याची कोणाची हिंमत होणार नाही. येथून पुढे कोणत्याही कार्यकर्त्याचा बिल्ला काढला जाणार नाहीच; पण कोणाची चौकशीही लावली जाणार नाही़