शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

सदाभाऊंचे ‘घट’ बसले, रयत क्रांती संघटनेची घोषणा, यंदाचा ऊस दर मीच ठरवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 05:01 IST

‘रयत क्रांती संघटना’ या नव्या शेतकरी संघटनेची स्थापना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी घटस्थापनेदिवशी कोल्हापुरात केली.

कोल्हापूर : ‘रयत क्रांती संघटना’ या नव्या शेतकरी संघटनेची स्थापना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी घटस्थापनेदिवशी कोल्हापुरात केली. बत्तीस वर्षे शेतकºयांसाठी लढलो. कितीही संकटे, वादळे आली तरी त्यांना वेसण घालू, असे सांगून यंदा ऊसदरासाठी कोणाला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, आपण जो दर सांगू तोच अंतिम असेल, असा दावाही खोत यांनी केला.मेळाव्यात बोलताना खोत यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता टीका केली. आजचा दिवस येईल, असे कधीही वाटले नव्हते, पण नियतीच्या पोटात काय दडले होते, हे माहिती नसल्याचे सांगत खोत म्हणाले, बत्तीस वर्षांत संघर्षाने कधी पाठ सोडली नाही, हा प्रवास करत एका नव्या वळणावर उभा राहिलो आहे. अंबाबाईचे दर्शन घेऊन नव्या अध्यायाची सुरुवात करत आहोत. शरद जोशी यांनी शेतीचे अर्थकारण शिकविले आणि गावगाड्यातील अंगठाबहाद्दर शेतकºयांना बरोबर घेऊन राजकारणातील जहागीरदार, लक्ष्मीपुत्रांच्या बरोबर लढलो. दोन्ही कॉँग्रेसची राजवट उधळूून लावली, पण वतनदारी आडवी आली. मला संपविण्याबरोबरच माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप खोत यांनी केला.सदाभाऊंना आली चक्करजिल्हा दौºयावर आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना गुरुवारी दुपारी १च्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे अचानक तब्येत बिघडल्याने चक्कर आली. त्यांना तत्काळ परिसरातील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. सदाभाऊंवर तातडीने उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर ते पुढील कार्यक्र्रमासाठी रवाना झाले.>बिल्ला काढण्याची हिंमत होणार नाहीछातीवर बिल्ला नसल्याने कुंकू नसलेल्या महिलेसारखी अवस्था झाल्याचे सांगत खोत म्हणाले, माझ्या आईने छातीवर बिल्ला लावल्याने तो काढण्याची कोणाची हिंमत होणार नाही. येथून पुढे कोणत्याही कार्यकर्त्याचा बिल्ला काढला जाणार नाहीच; पण कोणाची चौकशीही लावली जाणार नाही़