शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सदाभाऊंचे ‘घट’ बसले, रयत क्रांती संघटनेची घोषणा, यंदाचा ऊस दर मीच ठरवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 05:01 IST

‘रयत क्रांती संघटना’ या नव्या शेतकरी संघटनेची स्थापना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी घटस्थापनेदिवशी कोल्हापुरात केली.

कोल्हापूर : ‘रयत क्रांती संघटना’ या नव्या शेतकरी संघटनेची स्थापना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी घटस्थापनेदिवशी कोल्हापुरात केली. बत्तीस वर्षे शेतकºयांसाठी लढलो. कितीही संकटे, वादळे आली तरी त्यांना वेसण घालू, असे सांगून यंदा ऊसदरासाठी कोणाला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, आपण जो दर सांगू तोच अंतिम असेल, असा दावाही खोत यांनी केला.मेळाव्यात बोलताना खोत यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता टीका केली. आजचा दिवस येईल, असे कधीही वाटले नव्हते, पण नियतीच्या पोटात काय दडले होते, हे माहिती नसल्याचे सांगत खोत म्हणाले, बत्तीस वर्षांत संघर्षाने कधी पाठ सोडली नाही, हा प्रवास करत एका नव्या वळणावर उभा राहिलो आहे. अंबाबाईचे दर्शन घेऊन नव्या अध्यायाची सुरुवात करत आहोत. शरद जोशी यांनी शेतीचे अर्थकारण शिकविले आणि गावगाड्यातील अंगठाबहाद्दर शेतकºयांना बरोबर घेऊन राजकारणातील जहागीरदार, लक्ष्मीपुत्रांच्या बरोबर लढलो. दोन्ही कॉँग्रेसची राजवट उधळूून लावली, पण वतनदारी आडवी आली. मला संपविण्याबरोबरच माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप खोत यांनी केला.सदाभाऊंना आली चक्करजिल्हा दौºयावर आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना गुरुवारी दुपारी १च्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे अचानक तब्येत बिघडल्याने चक्कर आली. त्यांना तत्काळ परिसरातील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. सदाभाऊंवर तातडीने उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर ते पुढील कार्यक्र्रमासाठी रवाना झाले.>बिल्ला काढण्याची हिंमत होणार नाहीछातीवर बिल्ला नसल्याने कुंकू नसलेल्या महिलेसारखी अवस्था झाल्याचे सांगत खोत म्हणाले, माझ्या आईने छातीवर बिल्ला लावल्याने तो काढण्याची कोणाची हिंमत होणार नाही. येथून पुढे कोणत्याही कार्यकर्त्याचा बिल्ला काढला जाणार नाहीच; पण कोणाची चौकशीही लावली जाणार नाही़