शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. कामगारांचे ‘चड्डी-बनियन’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:29 IST

प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले : राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाचा तीव्र निषेध

पालकमंत्री : जलयुक्तच्या कामासह कृषीची आढावा बैठकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलयुक्त शिवार हा मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. सचिवालयातून या कामांचा नियमित आढावा घेतला जाऊन बारकाईने लक्ष ठेवल्या जाते. त्यामुळे या कामांसाठी आकड्याचा खेळ नको. झालेल्या कामांची प्रत्यक्ष पडताळणी करा. नागरिकांच्या मनात कुठल्याही कामाविषयी संभ्रम नको. यासाठी झालेल्या कामांची प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करा. यामध्ये कुणाचाही मुलाहिजा खपवून घेतला जाणार नाही. अशा शब्दात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरूवारच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना समज दिली.जिल्ह्यात कर्जवाटपाची स्थिती, तातडीचे कर्जवाटप, जलयुक्तच्या कामांचा आढावा तसेच खरीपाची पेरणी, दुबार पेरणीची स्थिती आदीबाबत पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित होती. बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी के.पी. परदेशी, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.जलयुक्तच्या कामाबाबत शासनस्तरावर काही बाबी प्रामुख्याने समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे १०० टक्के कामे झालेल्या गावातून ह्या तक्रारी आल्या आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी या कामांच्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन कामांची पडताळणी करावी. यामध्ये कुठलीही तडजोड नाही. शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प असल्याने विषयाचे गांभीर्य समजून घ्या. कामे झालेल्या गावात ग्रामसभेव्दारा मंजूरी घ्या. कामांच्या कार्यारंभ आदेशाच्या प्रती तत्काळ मला द्या, कामे सुरू झाले नसल्यास पडताळणी करता येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीपूर्वी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज उपलब्ध करण्याविषयीचा त्यांनी आडावा घेतला.१० हजारांच्या कर्ज वाटपाला मुदतवाढशासनाचे २८ जूनचे आदेशाप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.त्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीपासाठी शासन हमीवर १० हजारांचे कर्ज देण्याचे आदेश एक जुलै रोजी दिलेत. या आदेशात सुधारणा करून १४ जुलैच्या आदेशानुसार या कर्जासाठी ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १० हजारांचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर याचा कोणताच परिणाम होणार नाही. कर्जमाफी झाल्यानंतर त्या रक्कमेतून हे कर्ज वजा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या तातडीच्या कर्जासाठी बँकांशी, जिल्हा उपनिबंधकांशी, जिल्हा बँकेशी, अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांशी, तसेच संबंधित तालुक्याचे तहसीलदार, सहाय्यक निबंधक यांच्यासी संपर्क साधावा, असे आवाहन बैठकीदरम्यान शेतकऱ्यांना करण्यात आले.