शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कारभारणींच्या उमेदवारीसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

ज्योती पाटील पाचगाव : प्रभाग क्रमांक ६५, राजेंद्रनगर हा प्रभाग यंदा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून या प्रभागात आपल्या ...

ज्योती पाटील

पाचगाव : प्रभाग क्रमांक ६५, राजेंद्रनगर हा प्रभाग यंदा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून या प्रभागात आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे धावपळ सुरू केली आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी देताना नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. यातून नाराजीही उद्‌भवण्याची शक्यता असून बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान नेत्यांसमोर उभे ठाकणार आहे. या प्रभागात जवळजवळ ६० टक्के मतदार हे झोपडपट्टीधारक आहेत. हा प्रभाग १० ते १२ कॉलन्यांनी बनला आहे.

२००५ मध्ये गोरख माने यांनी अपक्ष निवडून येऊन या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१० मध्ये राजश्री साबळे या प्रभागातून महापालिकेत गेल्या होत्या. २०१५ मध्ये झालेल्या तुल्यबळ लढतीत काँग्रेसच्या लाला भोसले यांनी राष्ट्रवादीच्या मुस्ताक मलबारी यांचा १५९ मतांनी पराभव करत महापालिका गाठली होती.

सध्या हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून गेली अनेक वर्षे लोकांच्या संपर्कात असलेल्या शशिकांत पाटील यांनी पत्नी शुभांगी पाटील यांच्यासाठी काँग्रेसमधून उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसमधून अर्चना बिरंजे, स्नेहा मयूर पाटील, छाया कांबळे, संगीत चक्रे, वैशाली मिसाळ यांचीही नावे चर्चेत आहेत, तर अन्य पक्षांतून कोमल बिरजे, नागटिळे हेही इच्छुक आहेत.

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते...

लाला भोसले : (काँग्रेस) १४९५

मुस्ताक मलबारी : (राष्ट्रवादी) १३३६

प्रदीप डवरी : (अपक्ष) 124

मोहन मोरे : (शिवसेना) ९२

कोट :

गेल्या पाच वर्षात या प्रभागात दोन कोटी साठ लाख रुपयांची विकासकामे केली असून भागातील अनेक समस्या सोडवल्या आहेत. यामध्ये रस्ते, गटर्स, गार्डन, पाईपलाईन, ओपन जिम ही कामे मार्गी लावली आहेत.

- विद्यमान नगरसेवक : लाला भोसले : (काँग्रेस)

सोडविलेले प्रश्न : अंतर्गत रस्ते, गार्डन, प्रभागातील गटर्स, पाण्याच्या पाईपलाईन, एलईडी, ओपन जिम, वृक्षारोपण...

प्रभागातील समस्या...

पाणीटंचाई, ड्रेनेज लाईनची मुख्य समस्या असून बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकलेली नाही,

रस्त्यावरच कचरा पसरत असल्याने दुर्गंधी पसरते, अनेक ठिकाणची गटर्स व्यवस्थित नसल्याने दुर्गंधी पसरते व नागरिकांना आजाराचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणचे रस्ते उखडले आहेत.