शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी ग्रामीण रुग्णालय कागदावरच

By admin | Updated: August 28, 2014 23:40 IST

जयसिंगपूर : साडेचार कोटी रुपयांचा निधी पडून

संदीप बावचे - जयसिंगपूर -जागेअभावी येथे होणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सध्या अधांतरीच आहे. तब्बल साडेचार कोटी रुपयांचा निधी शासनदरबारी पडला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर ही जागा जिल्हा परिषदेच्या नावावर होणार असून त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजास प्रारंभ होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जागेबाबतच्या कामकाजाचा प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयात रेंगाळला आहे. मार्च २०१४ मध्ये जयसिंगपूर येथे ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव (ता. शिरोळ) या ठिकाणी स्थलांतरित करून प्राथमिक केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. प्रारंभी निधी मंजूर झाल्यानंतर नगरपालिकेकडे जागेसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, जागा उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या इमारतीजवळील जागेत हे रुग्णालय बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सहा महिन्यांपूर्वी ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर आहे. मात्र, जागेअभावी हा प्रश्न रेंगाळत पडला आहे. उदगाव येथील शशिकला क्षय रुग्णालयामधील जागेवर ग्रामीण रुग्णालय बांधण्याबाबतही चर्चा झाली. हा भाग ग्रामीण विभागात येत असल्याने हा प्रस्तावही नाकारण्यात आला. सध्या जयसिंगपुरात असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र उदगावला स्थलांतरित करून या ठिकाणी असणारी जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात भिजत पडला आहे. जागा हस्तांतरानंतर गेल्या ५२ वर्षांपासून सुरू असलेले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित केले जाणार आहे. एकूणच ग्रामीण रुग्णालयाच्या अस्तित्वानंतर जयसिंगपूरसह परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधेचा फायदा होणार आहे आणि तालुक्यातील शिरोळ, दत्तवाडनंतर जयसिंगपूर येथे तिसरे ग्रामीण रुग्णालय नावारूपास येणार आहे. दरम्यान, जागेबाबतचा प्रश्न सुटल्यानंतरच ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे.‘शासकीय काम, सहा महिने थांब’ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी पन्नास लाख रूपयांचा निधी पडून आहे. मात्र, जागेचा प्रश्न सुटला नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालय सुरू होण्याअगोदरच ‘सलाईन’वर अशी अवस्था बनली आहे. आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून शासनाने चांगले पाऊल टाकून निधी मंजूर केला आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे रुग्णांची जणू चेष्टाच होत असल्याचा प्रकार चर्चेत आला आहे.