शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी ग्रामीण रुग्णालय कागदावरच

By admin | Updated: August 28, 2014 23:40 IST

जयसिंगपूर : साडेचार कोटी रुपयांचा निधी पडून

संदीप बावचे - जयसिंगपूर -जागेअभावी येथे होणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सध्या अधांतरीच आहे. तब्बल साडेचार कोटी रुपयांचा निधी शासनदरबारी पडला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर ही जागा जिल्हा परिषदेच्या नावावर होणार असून त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजास प्रारंभ होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जागेबाबतच्या कामकाजाचा प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयात रेंगाळला आहे. मार्च २०१४ मध्ये जयसिंगपूर येथे ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव (ता. शिरोळ) या ठिकाणी स्थलांतरित करून प्राथमिक केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. प्रारंभी निधी मंजूर झाल्यानंतर नगरपालिकेकडे जागेसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, जागा उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या इमारतीजवळील जागेत हे रुग्णालय बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सहा महिन्यांपूर्वी ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर आहे. मात्र, जागेअभावी हा प्रश्न रेंगाळत पडला आहे. उदगाव येथील शशिकला क्षय रुग्णालयामधील जागेवर ग्रामीण रुग्णालय बांधण्याबाबतही चर्चा झाली. हा भाग ग्रामीण विभागात येत असल्याने हा प्रस्तावही नाकारण्यात आला. सध्या जयसिंगपुरात असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र उदगावला स्थलांतरित करून या ठिकाणी असणारी जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात भिजत पडला आहे. जागा हस्तांतरानंतर गेल्या ५२ वर्षांपासून सुरू असलेले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित केले जाणार आहे. एकूणच ग्रामीण रुग्णालयाच्या अस्तित्वानंतर जयसिंगपूरसह परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधेचा फायदा होणार आहे आणि तालुक्यातील शिरोळ, दत्तवाडनंतर जयसिंगपूर येथे तिसरे ग्रामीण रुग्णालय नावारूपास येणार आहे. दरम्यान, जागेबाबतचा प्रश्न सुटल्यानंतरच ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे.‘शासकीय काम, सहा महिने थांब’ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी पन्नास लाख रूपयांचा निधी पडून आहे. मात्र, जागेचा प्रश्न सुटला नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालय सुरू होण्याअगोदरच ‘सलाईन’वर अशी अवस्था बनली आहे. आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून शासनाने चांगले पाऊल टाकून निधी मंजूर केला आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे रुग्णांची जणू चेष्टाच होत असल्याचा प्रकार चर्चेत आला आहे.