शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

ग्रामीण भागात ‘बैत्या’ला घरघर

By admin | Updated: October 29, 2014 00:14 IST

बलुतेदारांचे लक्ष नोकरी, करिअरकडे

शिवराज लोंढे - सावरवाडी -पूर्वी धान्याच्या रूपात बैतं घालण्याची प्रथा होती. सुगीच्या दिवसांत खळ्यावर भटक्या जमातीच्या लोकांची वर्दळ असायची. शेतकऱ्यांची वर्षभराची कामे बैत्यावर चालत असत. बदलत्या जमान्यात मात्र ही बैत्याची परंपरा नामशेष होऊ लागली आहे. त्यामुळे सुगीच्या दिवसांत ग्रामीण भागात बाराबलुतेदारांची खळ्यावरची वर्दळ कमी झाली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बैलाच्या औताचे लाकडी साहित्य बनविणे, खुरपी पाजविणे (धार काढणे), आवातणे देणे, गणपतीच्या मूर्ती देणे यांसारखी शेतकऱ्यांची कामे बाराबलुतेदार करून देत असत. शिक्षणामुळे ग्रामीण भागातील समाजाची प्रगती झाली. त्यामुळे बाराबलुतेदार वर्गातील सुशिक्षित पिढी नोकरी, उद्योगधंद्याकडे वळली. कच्च्या मालांच्या दरात वाढत्या महागाईमुळे बाराबलुतेदारांना शेतकऱ्यांना बैत्यावर सेवा देणे परवडत नाही. त्यामुळे बैत देण्याची पूर्वीची प्रथा सध्या नव्या जमान्यात बंद पडू लागली आहे. जुन्या काळातील रूढी-परंपरा या नव्या पिढीला रुचल्या नाहीत. त्यामुळे बैतं देणे ही संकल्पना सध्या कालबाह्य होऊ लागली आहे. धान्याच्या मोबदल्यात सेवा देण्याऐवजी पैसे देऊन अथवा वस्तू विकत घेणे-देणे ही प्रथा सध्या सुरू झाली. शेतीमध्ये सुशिक्षित लोक येत आहेत. त्यामुळे पैशांच्या मोबदल्यात वस्तूंची सेवा घेणे शेतकरीवर्ग अधिक पसंद करू लागला आहे. यामुळेही धान्यांच्या रूपात बैतं घालण्याची प्रथा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बाजारपेठेत नव्या सुधारित पद्धतीची शेती औजारे, वस्तू मिळू लागल्या आहेत. त्यामुळे कुंभार, सुतार, लोहार कारागिरांची कलाही कमी होऊ लागली. जमाना बदलत असून नवनवीन संशोधन कृषी क्षेत्रात येऊ लागले. परिणामी जुन्या प्रथाही हळूहळू कमी होऊ लागल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.