शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

ग्रामीण भागात ‘बैत्या’ला घरघर

By admin | Updated: October 29, 2014 00:14 IST

बलुतेदारांचे लक्ष नोकरी, करिअरकडे

शिवराज लोंढे - सावरवाडी -पूर्वी धान्याच्या रूपात बैतं घालण्याची प्रथा होती. सुगीच्या दिवसांत खळ्यावर भटक्या जमातीच्या लोकांची वर्दळ असायची. शेतकऱ्यांची वर्षभराची कामे बैत्यावर चालत असत. बदलत्या जमान्यात मात्र ही बैत्याची परंपरा नामशेष होऊ लागली आहे. त्यामुळे सुगीच्या दिवसांत ग्रामीण भागात बाराबलुतेदारांची खळ्यावरची वर्दळ कमी झाली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बैलाच्या औताचे लाकडी साहित्य बनविणे, खुरपी पाजविणे (धार काढणे), आवातणे देणे, गणपतीच्या मूर्ती देणे यांसारखी शेतकऱ्यांची कामे बाराबलुतेदार करून देत असत. शिक्षणामुळे ग्रामीण भागातील समाजाची प्रगती झाली. त्यामुळे बाराबलुतेदार वर्गातील सुशिक्षित पिढी नोकरी, उद्योगधंद्याकडे वळली. कच्च्या मालांच्या दरात वाढत्या महागाईमुळे बाराबलुतेदारांना शेतकऱ्यांना बैत्यावर सेवा देणे परवडत नाही. त्यामुळे बैत देण्याची पूर्वीची प्रथा सध्या नव्या जमान्यात बंद पडू लागली आहे. जुन्या काळातील रूढी-परंपरा या नव्या पिढीला रुचल्या नाहीत. त्यामुळे बैतं देणे ही संकल्पना सध्या कालबाह्य होऊ लागली आहे. धान्याच्या मोबदल्यात सेवा देण्याऐवजी पैसे देऊन अथवा वस्तू विकत घेणे-देणे ही प्रथा सध्या सुरू झाली. शेतीमध्ये सुशिक्षित लोक येत आहेत. त्यामुळे पैशांच्या मोबदल्यात वस्तूंची सेवा घेणे शेतकरीवर्ग अधिक पसंद करू लागला आहे. यामुळेही धान्यांच्या रूपात बैतं घालण्याची प्रथा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बाजारपेठेत नव्या सुधारित पद्धतीची शेती औजारे, वस्तू मिळू लागल्या आहेत. त्यामुळे कुंभार, सुतार, लोहार कारागिरांची कलाही कमी होऊ लागली. जमाना बदलत असून नवनवीन संशोधन कृषी क्षेत्रात येऊ लागले. परिणामी जुन्या प्रथाही हळूहळू कमी होऊ लागल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.