शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

लोकांच्या मदतीला धावून जाणे हाच खरा वाढदिवस सतेज पाटील यांची भावना : शुभेच्छा द्या; परंतु उत्सवाचे स्वरूप नको..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे सामान्य जनता भीतीच्या सावटाखाली असताना लोकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे सामान्य जनता भीतीच्या सावटाखाली असताना लोकांच्या मदतीला धावून जाणे हाच माझा वाढदिवस साजरा करण्यासारखे आहे, अशी भावना पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. मंत्री पाटील यांचा आज, सोमवारी वाढदिवस होत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यास ते उपलब्ध नाहीत. कार्यकर्त्यांनीही शुभेच्छा जरूर द्याव्यात, तुमच्या शुभेच्छांचे पाठबळ कायम हवेच आहे; परंतु यंदा कोरोनाची स्थिती असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरूप देऊ नये, असेही आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखणे हाच खरे तर माझा यावर्षीचाही वाढदिवसाचा संकल्प असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आपण अधिक योग्यरीतीने या संसर्गाला सामोरे जात आहोत. गेल्या वर्षी पीपीई कीटपासून पायाभूत सुविधांपर्यंत अनेक गोष्टींची कमतरता होती. पीपीई कीट मिळत नव्हती म्हणून कापड आणून इचलकरंजीतून ती शिवून घेतली. लोकांत भीतीचे वातावरण होते. यंदा तशी स्थिती नाही. लोकांतील भीती कमी झाली आहे, शिवाय कोरोनाबद्दल जागरूकताही आली आहे. किमान चार हजार रुग्णांची उपचाराची व्यवस्था उभी केली आहे. गडहिंग्लज, इचलकरंजी व कोल्हापुरातील आयसोलेशन रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर दिले आहेत. सीपीआरमध्ये टँकच उभारला आहे. वीस हजार लिटर आॉक्सिजनचा टँक बसविणारा कोल्हापूर हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा असावा. नो मास्क...नो एंट्री ही मोहीम आपण घेतली. ती नंतर राज्य सरकारनेही स्वीकारली. प्रशासनातील अगदी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी उत्तम समन्वय ठेवून रात्रंदिवस काम केल्यामुळेच आपण गतवर्षी कोरोनावर मात करू शकलो. यंदाही तसेच नियोजन केले आहे.

ते म्हणाले, माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, त्यांनी या संकटात लोकांच्या मदतीला धावून जावे. मी मास्क वापरणार तुम्हीही वापरा ही मोहीम आम्ही राबवीत आहोत. मी रक्तदान केले तुम्हीही करा असेही आवाहन केले आहे. कोविड रुग्णांना आधार द्या. अडचणीत सापडलेल्या कष्टकरी, हातावर पोट असलेल्या श्रमजिवी जनतेला तुम्ही मदत करा. त्यांच्या मदतीला धावून जाणे, त्यांना आधार देणे यासारखा दुसरा आनंद नाही. जिथे रक्त कमी पडेल तिथे रक्तदानासाठी पुढे आहे. कुठे रुग्णांसाठी पोळी-भाजी पुरविण्याची गरज निर्माण झाली तर तशी यंत्रणा उभी करा...प्रशासन आपल्या पातळीवर सगळ्या उपाययोजना करीत आहेच; परंतु सामाजिक बांधीलकी व लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या कोल्हापूरच्या परंपरेप्रमाणे आपण या संकटाला सगळे मिळून सामोरे जाऊ या...

लोकांत कोरोनाबद्दल जागरूकता निर्माण झाल्यामुळेच यंदा अन्य जिल्ह्यांत कोरोनाचा विस्फोट झाला असतानाही कोल्हापुरात अजूनही कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. तशीच राहायची असेल तर लोकांचे सहकार्य फार महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले, लोकांची प्रतिकारशक्ती वाढली आहे. बाहेरगावांहून आलेल्या लोकांमुळे गेल्यावर्षी संसर्ग वाढला होता. यंदा ते प्रमाणही कमी आहे. जे बाहेरून आले ते आपलेच बांधव आहेत व ते देखील पुरेसी दक्षता घेत आहेत. गेल्यावर्षी आम्हाला संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शोधमोहीम राबवावी लागली. यंदा स्वत:हून लोक उपचारांसाठी पुढे येत आहेत.

काँग्रेस पक्षाने सत्तेची संधी दिली म्हणूनच लोकांसाठी चांगले काम करू शकलो असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कायमच विश्वास दर्शविला. मागच्या पंचवार्षिकमध्ये एकही आमदार नव्हता तिथे आता जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, बाजार समितीमध्ये पक्षाची सत्ता आहे. त्याशिवाय नगरपालिका, साखर कारखान्यांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. काँग्रेस समितीतूनच पक्षाचे सगळे निर्णय होत आहे. तालुका पातळीवरील संघटनही मजबूत झाले आहे. पक्षाने एखादा कार्यक्रम जाहीर केला तर त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होते. कोरोनाच्या काळात पक्ष म्हणूनही आम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलो. काँग्रेसकडून सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचे युनिट वाटप केले. लहान व्यावसायिकांना स्प्रे भेट दिले. त्याशिवाय परराज्यात गावी निघालेल्या लोकांसाठी खास रेल्वेची व्यवस्था केली. अशा तब्बल २५ रेल्वेतून ३२ हजार ३९५ मजुरांना गावी पाठवू शकलो. त्यांच्या रेल्वेतील दोन दिवसांच्या प्रवासातील जेवणाची सोय केली. लहान मुलांसाठी दुधाच्या बाटलीचीही व्यवस्था केली. झोपडपट्टीतील गोरगरीब जनतेला धान्याचे घरपोहोच वाटप केले.

कोरोना संशयितांवर कोविड सेंटरमध्येच उपचार होणार

पुण्यासह अनेक शहरात कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या लोकांनी घरीच राहणे पसंत केले. हे लोक घरात न राहता सर्वत्र फिरत राहिल्याने संसर्ग झपाट्याने वाढला व त्यातून पूर्ण अपार्टमेंटच पॉझिटिव्ह झाल्याचे अनुभव आहेत. म्हणून एकाही रुग्णांवर घरी राहून उपचार करण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यांच्यासाठी कोविड काळजी केंद्राची पुरेशी व्यवस्था उभी करीत आहोत. त्यातील पहिले केंद्र विद्यापीठातील डीओटीमध्ये सुरू करीत आहोत. हवे तर रुग्ण घरचा डबा आणून तिथे खाऊ देत; परंतु उपचार मात्र तिथेच होतील.

ग्रामसमित्या पुन्हा सक्रिय करणार

जिल्ह्यांत निम्म्यांहून अधिक गावांत निवडणुका झाल्याने नवे लोक निवडून आले आहेत. त्यांना विश्वासात घेऊन तातडीने ग्राम समित्या कशा सक्रिय होतील असे नियोजन केले आहे. आपापली गावे लोकांनी सुरक्षित राखली तरच हा संसर्ग रोखणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.