शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

खटला कोल्हापूरबाहेर चालवा

By admin | Updated: December 19, 2015 02:10 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि सनातन संस्थेचा सदस्य समीर गायकवाड याने कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून खटला जिल्ह्याबाहेर वर्ग करण्यासाठी उच्च

मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि सनातन संस्थेचा सदस्य समीर गायकवाड याने कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून खटला जिल्ह्याबाहेर वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत यावर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.विशेष तपास पथकाने सप्टेंबर २०१५मध्ये समीरला सांगली येथून अटक केली. त्यानंतर समीरने १५ डिसेंबर रोजी हा खटला कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून राज्यात अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. ए.आर. जोशी यांच्या खंडपीठापुढे झाली. याचिकेनुसार, कोल्हापूर दंडाधिकाऱ्यांनी समीरचा रिमांड देताना पानसरेंच्या नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले. कायद्यानुसार, आरोपीला रिमांड देताना पीडितांच्या नातेवाइकांची बाजू ऐकण्याची तरतूद नाही. कनिष्ठ न्यायालय जनमतप्रवाहात वाहून गेल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. त्याशिवाय कोल्हापूरमध्ये पानसरेंच्या समर्थकांनी भव्य रॅली काढून कोल्हापुरातील वातावरण दूषित केले आहे. हा खटला घेण्यास एकही वकील तयार नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा नाही, असे गायकवाडने याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)पानसरे कुटुंबीयांचा विरोधया खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांचा अथवा अन्य कुणाचाच कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. गायकवाडनेही आजपर्यंत त्याबद्दल कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापूरच्या बाहेर चालविण्याची मागणी करणे चुकीचे आहे. त्यास आमचा विरोध राहील, असे गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी म्हटले आहे.