शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

सत्ताधाऱ्यांनी कमावले, विरोधकांनी गमावले !

By admin | Updated: June 1, 2015 00:11 IST

गडहिंग्लज अर्बन बँक निवडणूक : ‘लोकमत’ने मांडली बिनविरोध निवडणुकीची भूमिका; अभिनंदनाचा वर्षाव

राम मगदूम - गडहिंग्लज -अपेक्षेप्रमाणे गडहिंग्लज अर्बन बँकेची निवडणूक अखेरीस बिनविरोध झाली. या बहुचर्चित निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी ‘कमावले’, तर विरोधकांनी ‘गमावले’ अशी स्थिती आहे. बँकेच्या भल्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच भूमिका ‘लोकमत’ने सुरुवातीपासून घेतली होती. त्यास दाद मिळाली. निवडणूक बिनविरोध होण्यात विधायक भूमिका बजावल्याबद्दल ‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.१९५० मध्ये स्थापन झालेल्या या बँकेने सीमाभागात नावलौकिक असणाऱ्या गडहिंग्लज बाजारपेठेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे समस्त गडहिंग्लजकरांची ‘अस्मिता’ बनलेल्या या बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, अशीच भूमिका सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंंतकांची होती. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीला आक्षेप असणाऱ्या बँकेच्या काही ‘हितचिंतकांनी’ त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ‘बँक बचाव’चे आवाहन करीत विरोधी परिवर्तन पॅनेलने मोर्चेबांधणी केली.निवडणूक लागून आरोप-प्रत्यारोप झाल्यास ठेवीदार विचलित होतील आणि त्यांचा बँकेच्या सांपत्तिक स्थितीवर परिणाम होईल म्हणून तडजोडीचे प्रयत्न सुरू झाले. आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर यांनीही दोन्ही बाजूच्या मंडळींना सबुरीचा सल्ला दिला. बिनविरोधाच्या हालचालींना गती मिळाली.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला घाळी यांनीही यात पुढाकार घेतला. डॉ. नंदिनी बाभूळकर, उदयराव जोशी, किशोर हंजी, सुकाणू समितीचे शिवगोंडा पाटील, कृष्णाप्पा मुसळे, नागाप्पा कोल्हापुरे, हरिभाऊ चव्हाण, आदींच्या प्रयत्नाने निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले.तथापि, आपल्या वाट्याला आलेल्या चार जागांवर कुणाला पाठवायचे यावर एकमत न झाल्यामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली. चार जाणती मंडळी संचालक मंडळावर पाठवून कारभारात सहभागी होण्याची आणि चुकीचा कारभार होत असल्यास त्यावर अंकुश ठेवण्याची संधी विरोधकांनी गमावली आहे. सध्या बँकेत १६० कोटींच्या ठेवी आहेत. मुख्यालयासह गडहिंग्लजला १, कडगावला १, कोल्हापुरात ३ व जयसिंगपुरात १, अशा सहा शाखा आहेत. मात्र, बँकेचे वयोमान लक्षात घेता अपेक्षित शाखा विस्तार झालेला नाही. शाखा विस्ताराबरोबरच व्यवसायवृद्धीसाठीही नियोजनपूर्वक प्रयत्न करायला हवेत. अलीकडे राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बँकेच्या स्पर्धेमुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. बदलत्या काळाची आव्हाने पेलण्याची क्षमता विकसित करण्याबरोबरच एटीएम, एसएमएस व इंटरनेट बँकिंग, आदी अत्याधुनिक सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून द्यायला हव्यात.कारभाराची संधी; पण जबाबदारीही वाढलीअमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या बँकेच्या यशात संस्थापक अध्यक्ष शिवपुत्राप्पा दड्डी यांच्यापासून विद्यमान अध्यक्ष रवींद्र आजरी आणि पहिले व्यवस्थापक गुरुसिद्धाप्पा गाडवी यांच्यापासून विद्यमान सरव्यवस्थापक किरण तोडकर आणि सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यात कर्मचाऱ्यांचेही बहुमोल योगदान असल्यामुळे त्यांचा ‘सन्मान’देखील जपायला हवा. पुन्हा एकहाती कारभाराची संधी मिळाल्याने सत्ताधाऱ्यांनी ‘कमावले’ असले तरी त्यांची जबाबदारीही वाढली आहे.