शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

सत्ताधाऱ्यांनी कमावले, विरोधकांनी गमावले !

By admin | Updated: June 1, 2015 00:11 IST

गडहिंग्लज अर्बन बँक निवडणूक : ‘लोकमत’ने मांडली बिनविरोध निवडणुकीची भूमिका; अभिनंदनाचा वर्षाव

राम मगदूम - गडहिंग्लज -अपेक्षेप्रमाणे गडहिंग्लज अर्बन बँकेची निवडणूक अखेरीस बिनविरोध झाली. या बहुचर्चित निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी ‘कमावले’, तर विरोधकांनी ‘गमावले’ अशी स्थिती आहे. बँकेच्या भल्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच भूमिका ‘लोकमत’ने सुरुवातीपासून घेतली होती. त्यास दाद मिळाली. निवडणूक बिनविरोध होण्यात विधायक भूमिका बजावल्याबद्दल ‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.१९५० मध्ये स्थापन झालेल्या या बँकेने सीमाभागात नावलौकिक असणाऱ्या गडहिंग्लज बाजारपेठेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे समस्त गडहिंग्लजकरांची ‘अस्मिता’ बनलेल्या या बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, अशीच भूमिका सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंंतकांची होती. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीला आक्षेप असणाऱ्या बँकेच्या काही ‘हितचिंतकांनी’ त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ‘बँक बचाव’चे आवाहन करीत विरोधी परिवर्तन पॅनेलने मोर्चेबांधणी केली.निवडणूक लागून आरोप-प्रत्यारोप झाल्यास ठेवीदार विचलित होतील आणि त्यांचा बँकेच्या सांपत्तिक स्थितीवर परिणाम होईल म्हणून तडजोडीचे प्रयत्न सुरू झाले. आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर यांनीही दोन्ही बाजूच्या मंडळींना सबुरीचा सल्ला दिला. बिनविरोधाच्या हालचालींना गती मिळाली.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला घाळी यांनीही यात पुढाकार घेतला. डॉ. नंदिनी बाभूळकर, उदयराव जोशी, किशोर हंजी, सुकाणू समितीचे शिवगोंडा पाटील, कृष्णाप्पा मुसळे, नागाप्पा कोल्हापुरे, हरिभाऊ चव्हाण, आदींच्या प्रयत्नाने निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले.तथापि, आपल्या वाट्याला आलेल्या चार जागांवर कुणाला पाठवायचे यावर एकमत न झाल्यामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली. चार जाणती मंडळी संचालक मंडळावर पाठवून कारभारात सहभागी होण्याची आणि चुकीचा कारभार होत असल्यास त्यावर अंकुश ठेवण्याची संधी विरोधकांनी गमावली आहे. सध्या बँकेत १६० कोटींच्या ठेवी आहेत. मुख्यालयासह गडहिंग्लजला १, कडगावला १, कोल्हापुरात ३ व जयसिंगपुरात १, अशा सहा शाखा आहेत. मात्र, बँकेचे वयोमान लक्षात घेता अपेक्षित शाखा विस्तार झालेला नाही. शाखा विस्ताराबरोबरच व्यवसायवृद्धीसाठीही नियोजनपूर्वक प्रयत्न करायला हवेत. अलीकडे राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बँकेच्या स्पर्धेमुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. बदलत्या काळाची आव्हाने पेलण्याची क्षमता विकसित करण्याबरोबरच एटीएम, एसएमएस व इंटरनेट बँकिंग, आदी अत्याधुनिक सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून द्यायला हव्यात.कारभाराची संधी; पण जबाबदारीही वाढलीअमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या बँकेच्या यशात संस्थापक अध्यक्ष शिवपुत्राप्पा दड्डी यांच्यापासून विद्यमान अध्यक्ष रवींद्र आजरी आणि पहिले व्यवस्थापक गुरुसिद्धाप्पा गाडवी यांच्यापासून विद्यमान सरव्यवस्थापक किरण तोडकर आणि सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यात कर्मचाऱ्यांचेही बहुमोल योगदान असल्यामुळे त्यांचा ‘सन्मान’देखील जपायला हवा. पुन्हा एकहाती कारभाराची संधी मिळाल्याने सत्ताधाऱ्यांनी ‘कमावले’ असले तरी त्यांची जबाबदारीही वाढली आहे.