शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

नियमानुसार कारभार करण्याची गरज

By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST

इचलकरंजी नगरपालिका : लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासनाकडून नागरिकांची अपेक्षा

राजाराम पाटील -इचकरंजी  -नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेस व शहर विकास आघाडी या दोन्ही पक्षांनी कूपनलिकांवरील पाणबुडे पंप व पाण्याच्या टाक्यांच्या निविदेतील सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आणला. तर आमदार सुरेश हाळवणकर यांनी २१ मे रोजी पालिकेतील प्रशासनाची झाडाझडती घेऊन कारभारावर ताशेरे ओढले. अशा गंभीर घटनांपासून बोध घेत पालिकेतील पदाधिकारी व प्रशासन दोघांनीही आत्मकेंद्रित होऊन नियम व कायद्याच्या चौकटीत कामकाज करण्याची वेळ आली आहे.साधारणत: दहा वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या राजकारणात दिग्गज ज्येष्ठ नगरसेवक होते. त्यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासन या तिघांवरही एक वचक असे. योग्य नियोजनाने नियम व कायद्याच्या चाकोरीत नगरपालिकेचे कामकाज चालत असे. पण अलीकडील काळात नवनवीन लोकप्रतिनिधी व काही कारभाऱ्यांच्या तालावर चालणारे प्रशासन पालिकेत आल्याने कारभारात सावळागोंधळ सुरू झाला. अगदी नगरसेवकच मक्तेदार होऊ लागल्याने गैरव्यवहार व आर्थिक वाटाघाटींनी सीमारेषा ओलांडली.डिसेंबर २०१४च्या अखेरीस पक्षांतर्गत दिलेली मुदत संपूनही नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांच्या बंडाला शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. नंतर उर्वरित कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या जांभळे गटानेही त्यांच्याशी मिळते-जुळते घेतले. मग ‘सबका साथ, सबका विकास’ तत्त्वाने सर्वच सत्तेत आले. नवनवीन कारभारी झाले आणि येथूनच कामकाजाचा खेळखंडोबा होण्यास सुरूवात झाली.मागील आठवड्यात ‘शविआ’चे नगरसेवक प्रमोद पाटील, अध्यक्ष जयवंत लायकर, मदन झोरे यांनी बांधकाम विभागातील कारभाराच्या तक्रारी केल्या. तर नगरसेवक संतोष शेळके यांनी उपोषण केले. त्यानिमित्ताने नगरपालिकेत आलेले आमदार सुरेश हाळवणकर यांनी तडक मुख्याधिकारी सुनील पवार यांच्या कार्यालयात जाऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली. नगरपालिका आहे की धर्मशाळा, असे ताशेरे मारत काही नगरसेवक मक्तेदार असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना गोपनीय अहवाल द्या, असे हाळवणकरांनी सूचित केले.शनिवारच्या नगरपालिकेच्या सभेत नगरसेवक शशांक बावचकर व अजित जाधव यांनी कूपनलिकांवर बसविण्यात येणाऱ्या पाणबुडे पंप व पाण्याच्या टाक्यांमध्ये सव्वाकोटींचा गैरव्यवहार बाहेर काढत प्रशासनाचे वाभाडे काढले. यावेळी मुख्याधिकारी पवार यांनी आता फक्त नियम व कायद्यानुसारच पालिकेचे कामकाज चालवू. त्यासाठी नगरसेवक व व्यवहारांशी सांगड घालणार नाही, असा इशारा दिला. अशा घटनांनी आता लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासनाने आत्मकेंद्रित होऊन नियम व कायद्यानेच कारभार हाकावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.