शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मल्लेवाडीत गव्यांचा धुडगूस

By admin | Updated: January 28, 2015 01:01 IST

वनविभाग सुस्त : दहा एकरांतील पिके उद्ध्वस्त

म्हालसवडे : तेरसवाडी (ता. करवीर) पैकी मल्लेवाडी, भोगमवाडी व कदमवाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून गव्यांनी धुडगूस घातला आहे. मल्लेवाडीतील दहा एकर क्षेत्रांतील ऊस, शाळू, मका व वरणा पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले आहे. वनविभागाने जंगली प्राण्यांचा व गव्यांचा बंदोबस्त ताबडतोब करावा, अशी मागणी होत आहे.दाजीपूर अभयारण्यातील गवे ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागताच तुळशी व धामणी परिसराकडे येत आहेत. सलग चौथ्या वर्षी गवे सातेरी डोंगरमाथ्यावरील लोळजाई परिसरातील जंगली भागात उन्हाळ्याच्या दिवसांत वस्ती करू लागले आहेत. या परिसरातील मल्लेवाडीतील नागरिकांना या प्राण्यांनी हैराण करून सोडले आहे.पाझर तलाव व विहिरींच्या पाण्यावर ऊस, गहू, शाळू, मका व वरणा अशी उन्हाळी पिके घेतली जातात. परिसरात सलग चार वर्षे गव्यांच्या तीन ते चार कळपांचे वास्तव्य वाढू लागले आहे. सध्या येथे सात गव्यांचा कळप दाखल झाला आहे. मल्लेवाडी येथील खजिना नावाच्या शेतातील तुकाराम आवाड, निवृत्ती आवाड, शिवाजी आवाड, बळवंत पेंढरे, तुकाराम पेंढरे, सर्जेराव पेंढरे आदी शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त केली आहेत. याच परिसरातील कदमवाडी, भोगमवाडी, धनगरवाडा परिसरातही गव्यांची दहशत सुरू आहे. रात्री फटाके वाजवून, डबे वाजवून ग्रामस्थ हाका घालत शेतात थांबत आहेत. नुकसानीची शासनाने चौकशी करून नुकसानभरपाई द्यावी व गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वारंवार मागणी करूनही शासनाने अथवा वनविभागाने येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.- बाजीराव पाटील, शेतकरी, मल्लेवाडीग्रुप ग्रामपंचायत तेरसवाडीपैकी मल्लेवाडी, कदमवाडी, भोगमवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे गव्यांनी नुकसान केल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व गव्यांचा बंदोबस्त करावा.- एम. जी. पाटील,ग्रामसेवक तेरसवाडी