शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

मल्लेवाडीत गव्यांचा धुडगूस

By admin | Updated: January 28, 2015 01:01 IST

वनविभाग सुस्त : दहा एकरांतील पिके उद्ध्वस्त

म्हालसवडे : तेरसवाडी (ता. करवीर) पैकी मल्लेवाडी, भोगमवाडी व कदमवाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून गव्यांनी धुडगूस घातला आहे. मल्लेवाडीतील दहा एकर क्षेत्रांतील ऊस, शाळू, मका व वरणा पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले आहे. वनविभागाने जंगली प्राण्यांचा व गव्यांचा बंदोबस्त ताबडतोब करावा, अशी मागणी होत आहे.दाजीपूर अभयारण्यातील गवे ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागताच तुळशी व धामणी परिसराकडे येत आहेत. सलग चौथ्या वर्षी गवे सातेरी डोंगरमाथ्यावरील लोळजाई परिसरातील जंगली भागात उन्हाळ्याच्या दिवसांत वस्ती करू लागले आहेत. या परिसरातील मल्लेवाडीतील नागरिकांना या प्राण्यांनी हैराण करून सोडले आहे.पाझर तलाव व विहिरींच्या पाण्यावर ऊस, गहू, शाळू, मका व वरणा अशी उन्हाळी पिके घेतली जातात. परिसरात सलग चार वर्षे गव्यांच्या तीन ते चार कळपांचे वास्तव्य वाढू लागले आहे. सध्या येथे सात गव्यांचा कळप दाखल झाला आहे. मल्लेवाडी येथील खजिना नावाच्या शेतातील तुकाराम आवाड, निवृत्ती आवाड, शिवाजी आवाड, बळवंत पेंढरे, तुकाराम पेंढरे, सर्जेराव पेंढरे आदी शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त केली आहेत. याच परिसरातील कदमवाडी, भोगमवाडी, धनगरवाडा परिसरातही गव्यांची दहशत सुरू आहे. रात्री फटाके वाजवून, डबे वाजवून ग्रामस्थ हाका घालत शेतात थांबत आहेत. नुकसानीची शासनाने चौकशी करून नुकसानभरपाई द्यावी व गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वारंवार मागणी करूनही शासनाने अथवा वनविभागाने येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.- बाजीराव पाटील, शेतकरी, मल्लेवाडीग्रुप ग्रामपंचायत तेरसवाडीपैकी मल्लेवाडी, कदमवाडी, भोगमवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे गव्यांनी नुकसान केल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व गव्यांचा बंदोबस्त करावा.- एम. जी. पाटील,ग्रामसेवक तेरसवाडी