शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

रुद्रशी समीरचे व्यावसायिकही संबंध

By admin | Updated: September 21, 2015 00:31 IST

सांगलीत दोघे चालवायचे मोबाईलचे दुकान : मडगाव बॉम्बस्फोटानंतर भागीदारी तुटली

सुशांत कुंकळयेकर - मडगाव --कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक केलेला सनातनचा साधक समीर गायकवाड आणि मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार संशयित रुद्र पाटील या दोघांमध्ये व्यावसायिक संबंधही होते. २00६ पर्यंत रुद्र व समीर सांगलीत भागीदारीने मोबाईलचे दुकान चालवीत होते. रुद्र या हत्या प्रकरणाचा मास्टरमार्इंड असण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत.मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर रुद्र पाटील फरार झाल्यानंतर समीरचीही एनआयएने चौकशी केली. या चौकशीमुळे सांगलीत समीरची काहीशी बदनामी झाली. त्यामुळेच त्याला दुकान बंद करावे लागले. ते बंद केल्यानंतर रोजीरोटीचा कोणताही मार्ग नसल्यामुळे सनातनचे काम त्याने सुरू केले, असे सनातनशी संबंध असलेले मुंबईचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी सांगितले.मार्च २0११ पासून समीर सनातनचा धर्मरथ चालविण्याच्या कामावर होता. पानसरेंच्या हत्येनंतर त्याने कित्येकांशी फोनवरून संपर्क साधला होता. या संपर्कावरूनच पोलीस समीरपर्यंत पोहोचले. रुद्र पाटील याच्याकडे व्यावसायिक संबंध असल्यामुळेच पोलिसांची समीरवर नजर होती. पुनाळेकर म्हणाले, २00९ मध्ये मडगावात बॉम्बस्फोट झाल्यानंतर चौकशी करणाऱ्या एसआयटीने तसेच एनआयएने समीरची चौकशी केली होती. त्यावेळी सांगली येथील त्याच्या दुकानावरही पोलीस आले होते. यामुळेच त्याची बदनामी झाली होती. यानंतर दुकानमालकाने समीरकडून दुकान काढून घेतल्याने तो बेरोजगार झाला. पुनाळेकरांच्या म्हणण्याप्रमाणे समीरला फोन वारंवार बदलायची सवय होती. त्याशिवाय त्याचा स्वभाव थापाड्या होता. गोष्टी वाढवून सांगायची त्याला सवय होती. यामुळे तो गोत्यात आला. घमेंडखोर स्वभावानुसार तो बरळल्यामुळेच पोलिसांच्या जाळ्यात सापडला.काय म्हणते सनातन ?‘पोलिसांनी सनातनचे निष्पाप साधक समीर गायकवाड याला अटक केली आहे. आध्यात्मिक दृष्टीने सात्विक व सज्जन लोकांचा छळ करणे हे तामसी प्रवृत्तीचे लक्षण आहे. ही प्रवृत्ती साधना करूनच नष्ट होते. वाल्याचे वाल्मीकी ऋषी केवळ साधना करून झाले. या आध्यात्मिक सिद्धांतावर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून सनातन अनेक वृत्तांत ‘आगामी हिंदू राष्ट्रात कठोर साधनेची शिक्षा करण्यात येईल’ असे म्हणते. येथे शिक्षा हा शब्द प्रातिनिधिक असून, साधनेद्वारे व्यक्तीचे पारमार्थिक कल्याण व्हावे, असा व्यापक दृष्टिकोन यामागे आहे’.