शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

‘रिपाइं’ चळवळ व्यापक करणार

By admin | Updated: May 13, 2014 00:48 IST

रामदास आठवले यांचे प्रतिपादन : कोल्हापुरातील चिंतन शिबिरात साधला सुसंवाद

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाशी कुठेही तडजोड न करता रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियामध्ये सर्व समाजाला सामावून घेऊन एक व्यापक चळवळ उभी करणार असल्याचे प्रतिपादन ‘रिपाइं’चे नेते खासदार रामदास आठवले यांनी केले. ‘रिपाइं’ कोल्हापूर शाखेच्यावतीने आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणि रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे संचालक डॉ. कृष्णा किरवले होते. आठवले म्हणाले, राजकारणाशिवाय मागासवर्गीयांची उन्नती करता येणार नाही. डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाशी कुठेही तडजोड न करता महायुतीमध्ये गेलो आहे. समान कार्यक्रमावर आम्ही एकत्र आलो आहे, हे जरी खरे असले तरी बाबासाहेबांच्या घटनेला कोणालाही हात लावू देणार नसल्याचा इशारा महायुतीला दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला पहिल्यांदा पाठिंबा दिला. मराठा, ब्राह्मण समाजातील अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्यासाठी आरक्षण गरजेचे आहे. असे धोरण स्वीकारल्यानेच मराठा, जैन, ब्राह्मण समाजातील अनेक नेत्यांसह सेवानिवृत्त अधिकारी ‘रिपाइं’कडे येत आहेत. ‘बदलते राजकारण, अर्थकारण, संस्कृती आणि ‘रिपाइं’ची भूमिका’ या विषयावर बोलताना डॉ. कृष्णा किरवले म्हणाले, सर्व जाती-धर्मांच्या माणसांना पुढे नेण्याचे तत्त्वज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. या तत्त्वज्ञानाचा अवलंब करून वाटचाल केली तर यश निश्चित आहे. ‘रिपाइं’ हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील असल्याने धर्मनिरपेक्षतावादी आहे. त्यामुळे महायुतीत सहभागी झाल्याने कदाचित ती संकल्पना कमकुवत होईल, असे वाटणे साहजिकच आहे, पण रिपब्लिकन पक्ष डॉ. आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान व विचार यांच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता अथवा भविष्यात तडजोड केली जाणारच नाही, अशा ठाम विश्वासाने महायुतीत सहभागी झाला आहे. सामाजिक हितासाठी राजकीय सत्ता मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आंबेडकरी जनतेच्या व आंबेडकरी चळवळीच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. यावेळी आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक वामन होवाळ, अच्युत माने, मंगलराव माळगे, अ‍ॅड. गौतम भालेराव, काकासाहेब खंबाळकर, आदींनी विचार मांडले. प्रा. शहाजी कांबळे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कांबळे, अशोक गायकवाड, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)