शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

राजघराण्यांनी घडविला नवा ‘इतिहास’!

By admin | Updated: April 9, 2015 00:05 IST

सातारा जिल्ह््यात ‘सत्तासंघर्ष’ : उदयनराजे अन् रामराजेंचा ‘साम्राज्यवाद’ बारामतीकरांच्या नियंंत्रणाबाहेर

सातारा : जिल्ह्याच्या इतिहासात ‘न भूतो न भविष्यति’ एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करणाऱ्या ‘राजघराण्याचा संघर्ष’ आता टोकाला पोहोचलाय. कधीकाळी ‘मराठी साम्राज्याचा इतिहास’ घडविणारी ही दोन दिग्गज राजघराणी आज त्वेषानं एकमेकांवर तुटून पडताना पाहून अवघा महाराष्ट्र अचंबित झालाय. ‘राजकीय इगो’मुळं उडालेल्या या भडक्यामागचं खरं कारण मात्र निव्वळ ‘साम्राज्यवाद’, हेच ठरलंय!वेगवेगळ्या प्रांतातील प्रस्थापित नेत्यांना एकत्र आणून स्थापन केलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी. मग यात कुणी सरदार तर कुणी सुभेदार. यांच्यातही अंतर्गत ‘सवतासुभा’ असला तरी साताऱ्यात सध्या रंगलेला ‘राजसंघर्ष’ मात्र भलताच अतर्क्य, अगम्य... कारण, एकमेकांना शब्दबंबाळ करणारे हे दोन्हीही नेते ऐतिहासिक राजघराण्यातले. उदयनराजे हे छत्रपती शिवरायांच्या घराण्याचे वंशज, तर छत्रपतींच्या पत्नी सईबाई यांचं माहेर असलेल्या निंबाळकर घराण्याचे रामराजे वारस. एका अर्थानं निंबाळकर म्हणजे उदयनराजेंच्या ‘शिव’घराण्याचं मातुलच. तरीही गेल्या पंधरा दिवसांपासून या दोघांमध्ये जहरी वाक्युध्द पेटलेलं. ‘उदयनराजे हे छत्रपतींचे थेट वंशज नव्हतेच’ असा दावा रामराजेंनी केलेला.. तर ‘छत्रपतींबद्दल बोलाल तर जीभ हासडून हातात देऊ’ अशी धमकी उदयनराजेंनी दिलेली.दोघेही आपापल्या राजधानीत ‘राजे’ असले तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते. एक खासदार तर दुसरे विधानपरिषद सभापती. तरीही आरोप-प्रत्यारोपाच्या रणधुमाळीत दोघांनी जो शब्दच्छल केला, तो अत्यंत धक्कादायक ठरणारा. विशेष म्हणजे, या वादात बिलकूल न पडता तटस्थपणे ‘चुप्पी’ साधणाऱ्या शरद पवारांची भूमिकाही आश्चर्यचकित करणारी. अजित पवारांनी जरी ‘पोरकटपणा थांबवावा,’ असा पोक्त सल्ला दिला असला तरी उदयनराजेंनी पुन्हा त्यांच्यावरही ‘शालजोडी’तून प्रहार केलाय. ‘सभापतींना पोरकटपणाची उपमा देऊन अजितदादांनी महाराष्ट्राचा अपमान केला’ असं जाहीर करून पक्षाला अधिकच बुचकळ्यात टाकलंय.‘नीरा नदीचं पाणी बारामतीला पळविलं,’ या कारणावरून दोन्ही राजेंमध्ये वादाला तोंड फुटलं असलं तरी यामागे दडलीय गेल्या पाच वर्षांमधील खदखद. ‘सरकारी कार्यक्रमात खासदारांना न बोलविणं, त्यांनी सुचविलेली कामे तांत्रिक कारणं दाखवून रखडविणं, जिल्हा बँकेत शब्दाला मान न देणं’, अशा अनेक घटनांमागे तत्कालीन पालकमंत्री रामराजेच असल्याची तक्रार उदयनराजे गटाकडून वारंवार केली गेलेली. तर ‘पक्षाच्या व्यासपीठावर प्रोटोकॉल न पाळणं, आपल्याच नेत्यांवर ऊठसूट टीका करणं, सामाजिक अन् सार्वजनिक सभ्यता ओलांडणं’, असे आरोप रामराजे गटाकडून खासगीत केले गेलेले. मात्र, मनात कटुता असूनही दोघे सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचा आदर राखून राहिलेले.दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर सातारा जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळाला. ‘कट्टर पवारविरोधक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय शिवतारेंनी डीपीसी बैठकीच्या व्यासपीठावर उदयनराजेंना मोठ्या आदरानं बसवून घेतलं. तेव्हाच ‘जमाना बदल गया है,’ याची चुणूक मिळाली. यावेळी ‘अतिरिक्त पालकमंत्री’ असा टोमणा रामराजेंनी हाणताच शीतयुध्द भडकलं. त्यातच ‘श्रीराम’ कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजेंनी पारंपरिक विरोधकांना पाठबळ दिल्यानं रामराजे पुरते डिवचले गेले. त्यानंतर या दोघांच्या पत्रकबाजीत दोन्हीही घराण्याच्या अनेक पिढ्यांचा इतिहासही बाहेर आला. एवढं सारं घडूनही जिल्ह्यातील एकाही नेत्यानं याबाबत अवाक्षर काढलं नाही; कारण या दोघांमधली ईर्षा होती साम्राज्यवादाची. या वादाला किनार होती अनादिकाळापासून राजे-राजवाड्यांमध्ये चालत आलेल्या सत्तासंघर्षाची. (प्रतिनिधी)अबब... प्राण्यांचा भलताच धुमाकूळ!उदयनराजे यांनी सुरुवातीला रामराजेंना ‘मर्कट’ म्हटलं. तेव्हा रामराजेंनी चिडून त्यांना ‘बोकड’ ही उपाधी दिली. तसंच पालकमंत्री शिवतारे म्हणजे ‘अस्वल’ या शब्दात त्यांचीही खिल्ली उडविली. तेव्हा शिवतारे यांनी रामराजेंना ‘पवारांच्या ताटाखालचं मांजर’ अशी उपाधी दिली. ‘वाघ अन् अस्वल’ यातला फरक न समजणाऱ्यांवर मानसिक उपचाराची गरज आहे, असा टोलाही लगावला. आता हे सारे प्राणी कमी पडले की काय म्हणून ‘समुद्रात पडलेलं डबक्यातलं बेडूक’ अशी रामराजेंची संभावना उदयनराजेंनी केलीय. आता बोला..