शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

राजघराण्यांनी घडविला नवा ‘इतिहास’!

By admin | Updated: April 9, 2015 00:05 IST

सातारा जिल्ह््यात ‘सत्तासंघर्ष’ : उदयनराजे अन् रामराजेंचा ‘साम्राज्यवाद’ बारामतीकरांच्या नियंंत्रणाबाहेर

सातारा : जिल्ह्याच्या इतिहासात ‘न भूतो न भविष्यति’ एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करणाऱ्या ‘राजघराण्याचा संघर्ष’ आता टोकाला पोहोचलाय. कधीकाळी ‘मराठी साम्राज्याचा इतिहास’ घडविणारी ही दोन दिग्गज राजघराणी आज त्वेषानं एकमेकांवर तुटून पडताना पाहून अवघा महाराष्ट्र अचंबित झालाय. ‘राजकीय इगो’मुळं उडालेल्या या भडक्यामागचं खरं कारण मात्र निव्वळ ‘साम्राज्यवाद’, हेच ठरलंय!वेगवेगळ्या प्रांतातील प्रस्थापित नेत्यांना एकत्र आणून स्थापन केलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी. मग यात कुणी सरदार तर कुणी सुभेदार. यांच्यातही अंतर्गत ‘सवतासुभा’ असला तरी साताऱ्यात सध्या रंगलेला ‘राजसंघर्ष’ मात्र भलताच अतर्क्य, अगम्य... कारण, एकमेकांना शब्दबंबाळ करणारे हे दोन्हीही नेते ऐतिहासिक राजघराण्यातले. उदयनराजे हे छत्रपती शिवरायांच्या घराण्याचे वंशज, तर छत्रपतींच्या पत्नी सईबाई यांचं माहेर असलेल्या निंबाळकर घराण्याचे रामराजे वारस. एका अर्थानं निंबाळकर म्हणजे उदयनराजेंच्या ‘शिव’घराण्याचं मातुलच. तरीही गेल्या पंधरा दिवसांपासून या दोघांमध्ये जहरी वाक्युध्द पेटलेलं. ‘उदयनराजे हे छत्रपतींचे थेट वंशज नव्हतेच’ असा दावा रामराजेंनी केलेला.. तर ‘छत्रपतींबद्दल बोलाल तर जीभ हासडून हातात देऊ’ अशी धमकी उदयनराजेंनी दिलेली.दोघेही आपापल्या राजधानीत ‘राजे’ असले तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते. एक खासदार तर दुसरे विधानपरिषद सभापती. तरीही आरोप-प्रत्यारोपाच्या रणधुमाळीत दोघांनी जो शब्दच्छल केला, तो अत्यंत धक्कादायक ठरणारा. विशेष म्हणजे, या वादात बिलकूल न पडता तटस्थपणे ‘चुप्पी’ साधणाऱ्या शरद पवारांची भूमिकाही आश्चर्यचकित करणारी. अजित पवारांनी जरी ‘पोरकटपणा थांबवावा,’ असा पोक्त सल्ला दिला असला तरी उदयनराजेंनी पुन्हा त्यांच्यावरही ‘शालजोडी’तून प्रहार केलाय. ‘सभापतींना पोरकटपणाची उपमा देऊन अजितदादांनी महाराष्ट्राचा अपमान केला’ असं जाहीर करून पक्षाला अधिकच बुचकळ्यात टाकलंय.‘नीरा नदीचं पाणी बारामतीला पळविलं,’ या कारणावरून दोन्ही राजेंमध्ये वादाला तोंड फुटलं असलं तरी यामागे दडलीय गेल्या पाच वर्षांमधील खदखद. ‘सरकारी कार्यक्रमात खासदारांना न बोलविणं, त्यांनी सुचविलेली कामे तांत्रिक कारणं दाखवून रखडविणं, जिल्हा बँकेत शब्दाला मान न देणं’, अशा अनेक घटनांमागे तत्कालीन पालकमंत्री रामराजेच असल्याची तक्रार उदयनराजे गटाकडून वारंवार केली गेलेली. तर ‘पक्षाच्या व्यासपीठावर प्रोटोकॉल न पाळणं, आपल्याच नेत्यांवर ऊठसूट टीका करणं, सामाजिक अन् सार्वजनिक सभ्यता ओलांडणं’, असे आरोप रामराजे गटाकडून खासगीत केले गेलेले. मात्र, मनात कटुता असूनही दोघे सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचा आदर राखून राहिलेले.दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर सातारा जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळाला. ‘कट्टर पवारविरोधक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय शिवतारेंनी डीपीसी बैठकीच्या व्यासपीठावर उदयनराजेंना मोठ्या आदरानं बसवून घेतलं. तेव्हाच ‘जमाना बदल गया है,’ याची चुणूक मिळाली. यावेळी ‘अतिरिक्त पालकमंत्री’ असा टोमणा रामराजेंनी हाणताच शीतयुध्द भडकलं. त्यातच ‘श्रीराम’ कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजेंनी पारंपरिक विरोधकांना पाठबळ दिल्यानं रामराजे पुरते डिवचले गेले. त्यानंतर या दोघांच्या पत्रकबाजीत दोन्हीही घराण्याच्या अनेक पिढ्यांचा इतिहासही बाहेर आला. एवढं सारं घडूनही जिल्ह्यातील एकाही नेत्यानं याबाबत अवाक्षर काढलं नाही; कारण या दोघांमधली ईर्षा होती साम्राज्यवादाची. या वादाला किनार होती अनादिकाळापासून राजे-राजवाड्यांमध्ये चालत आलेल्या सत्तासंघर्षाची. (प्रतिनिधी)अबब... प्राण्यांचा भलताच धुमाकूळ!उदयनराजे यांनी सुरुवातीला रामराजेंना ‘मर्कट’ म्हटलं. तेव्हा रामराजेंनी चिडून त्यांना ‘बोकड’ ही उपाधी दिली. तसंच पालकमंत्री शिवतारे म्हणजे ‘अस्वल’ या शब्दात त्यांचीही खिल्ली उडविली. तेव्हा शिवतारे यांनी रामराजेंना ‘पवारांच्या ताटाखालचं मांजर’ अशी उपाधी दिली. ‘वाघ अन् अस्वल’ यातला फरक न समजणाऱ्यांवर मानसिक उपचाराची गरज आहे, असा टोलाही लगावला. आता हे सारे प्राणी कमी पडले की काय म्हणून ‘समुद्रात पडलेलं डबक्यातलं बेडूक’ अशी रामराजेंची संभावना उदयनराजेंनी केलीय. आता बोला..