शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेतील बंधारा वाहून गेल्याने धावपळ

By admin | Updated: April 26, 2016 00:43 IST

वाळूच्या पोत्यांचा बंधारा बांधण्याचे काम सुरू : सभापती, अतिरिक्त मुख्याधिकारीसह ५० कर्मचाऱ्यांची यंत्रणा कार्यरत

इचलकरंजी : राधानगरी धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे येथील पंचगंगा नदीपात्रातील वाळू व मातीचा तात्पुरता बंधारा वाहून गेला. अचानक घडलेल्या या प्रकाराने नगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याकडील यंत्रणेची धावपळ उडाली. दरम्यान, शहरासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा साठा अबाधित ठेवण्यासाठी वाळूचा पोत्याचा बंधारा बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. बंधारा बांधण्याच्या या कामावर पालिकेचे ५० कर्मचारी व दोन जेसीबी अशी यंत्रणा सायंकाळी उशिरापर्यंत कार्यरत होती. या कामावर पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, अभियंता संजय बागडे, शिवाजी लोखंडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे, बंडोपंत मुसळे जातीने लक्ष ठेवून होते. उन्हाळ्यात कृष्णा व पंचगंगा या दोन्ही नद्यांमधील पाण्याची पातळी खालावल्यामुळे या दोन्ही नद्यांवरून असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे पंप उघडे पडतात. परिणामी शहराचा पाणीपुरवठा खंडित होतो. यंदा पाऊस कमी झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईची तीव्रता भासू नये, यासाठी पंचगंगा नदीमधील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यास नगरपालिकेच्या वतीने बरगे घालण्यात आले. तर अधिक पाणीसाठा व्हावा, यासाठी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला वाळू व मुरूम यांचा भराव करण्यात आला. त्यामुळे पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा चालू राहिला. राधानगरी धरणातून सद्य:स्थितीस पंचगंगा नदीमध्ये १४०० क्युसेस क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोमवारी पहाटे येथील पंचगंगा नदीपात्रात आले. पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. ही माहिती मिळताच सभापती दिलीप झोळ, नगरसेवक चोपडे, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, आदींनी नदीकडे धाव घेतली. नगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील ५० कर्मचारी व दोन जेसीबी मागविण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने वाहून जाणारी वाळू नदी घाटावर काढून तिचा साठा केला. तर कर्मचाऱ्यांनी वाळूची पोती भरून ठेवली. दुपारनंतर पाण्याचा प्रवाह कमी झाला असता बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला वाळूची पोती रचून ठेवण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे पंचगंगा नदीत पाण्याचा साठा झाल्याने तेथून रात्री उशिरा दोन्ही पंपांतून पाणी उचलण्यास सुरूवात झाली. (प्रतिनिधी)