शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पंचगंगेतील बंधारा वाहून गेल्याने धावपळ

By admin | Updated: April 26, 2016 00:43 IST

वाळूच्या पोत्यांचा बंधारा बांधण्याचे काम सुरू : सभापती, अतिरिक्त मुख्याधिकारीसह ५० कर्मचाऱ्यांची यंत्रणा कार्यरत

इचलकरंजी : राधानगरी धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे येथील पंचगंगा नदीपात्रातील वाळू व मातीचा तात्पुरता बंधारा वाहून गेला. अचानक घडलेल्या या प्रकाराने नगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याकडील यंत्रणेची धावपळ उडाली. दरम्यान, शहरासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा साठा अबाधित ठेवण्यासाठी वाळूचा पोत्याचा बंधारा बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. बंधारा बांधण्याच्या या कामावर पालिकेचे ५० कर्मचारी व दोन जेसीबी अशी यंत्रणा सायंकाळी उशिरापर्यंत कार्यरत होती. या कामावर पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, अभियंता संजय बागडे, शिवाजी लोखंडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे, बंडोपंत मुसळे जातीने लक्ष ठेवून होते. उन्हाळ्यात कृष्णा व पंचगंगा या दोन्ही नद्यांमधील पाण्याची पातळी खालावल्यामुळे या दोन्ही नद्यांवरून असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे पंप उघडे पडतात. परिणामी शहराचा पाणीपुरवठा खंडित होतो. यंदा पाऊस कमी झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईची तीव्रता भासू नये, यासाठी पंचगंगा नदीमधील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यास नगरपालिकेच्या वतीने बरगे घालण्यात आले. तर अधिक पाणीसाठा व्हावा, यासाठी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला वाळू व मुरूम यांचा भराव करण्यात आला. त्यामुळे पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा चालू राहिला. राधानगरी धरणातून सद्य:स्थितीस पंचगंगा नदीमध्ये १४०० क्युसेस क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोमवारी पहाटे येथील पंचगंगा नदीपात्रात आले. पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. ही माहिती मिळताच सभापती दिलीप झोळ, नगरसेवक चोपडे, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, आदींनी नदीकडे धाव घेतली. नगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील ५० कर्मचारी व दोन जेसीबी मागविण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने वाहून जाणारी वाळू नदी घाटावर काढून तिचा साठा केला. तर कर्मचाऱ्यांनी वाळूची पोती भरून ठेवली. दुपारनंतर पाण्याचा प्रवाह कमी झाला असता बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला वाळूची पोती रचून ठेवण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे पंचगंगा नदीत पाण्याचा साठा झाल्याने तेथून रात्री उशिरा दोन्ही पंपांतून पाणी उचलण्यास सुरूवात झाली. (प्रतिनिधी)