शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशभरातील बालकांना ‘रोटाव्हायरस’ची लस देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:53 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : डायरियासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रोटाव्हायरसला प्रतिबंध करणारी ‘रोटासील’ ही लस देशभरातील सर्व ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : डायरियासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रोटाव्हायरसला प्रतिबंध करणारी ‘रोटासील’ ही लस देशभरातील सर्व बालकांना मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या आजारामुळे प्रतिवर्षी ७८ हजार बालकांचा मृत्यू होतो. सध्या याबाबतचे प्रशिक्षण सुरू असून, १५ मे नंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.डायरियामुळे १ ते ५ वयोगटांतील बालकांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आजारामध्ये अंगातील पाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊन बालकाला अशक्तपणा येतो. वय लहान असल्याने तोंडावाटे फारसे काही घेतले जात नाही. परिणामी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. एकीकडे याचा खर्चही अधिक येत असताना दुसरीकडे हे बालक कुपोषित राहण्याची शक्यता असते.यावर उपाय म्हणून ज्यामुळे डायरिया होतो, त्या रोटाव्हायरस या व्हायरसला प्रतिबंध करणारी ही लस देण्यात येणार आहे. पावडरपासून तयार करण्यात येणारी ही लस इंजेक्शनच्या माध्यमातून तोंडात सोडली जाणार आहे.लसीकरण पूर्णपणे मोफतसध्या ही लस खाजगी दवाखान्यांमध्ये एक हजारहून अधिक किंमत आकारून दिली जाते; मात्र केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये या लसीकरणाचा समावेश झाल्याने याची कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. बाळाच्या जन्मानंतर ६, १0 आणि १४ आठवड्यांनंतर ही प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.सध्या सुरू असलेले लसीकरण१ बीसीजी (क्षयरोग), २ पोलिओ,३ पेन्टा (मेंदूज्वर, कावीळ),४ कावीळ,५ एम. आर. (गोवर रूबेला), ६ डीपीटी लस (त्रिगुणी), ७ टीटी (धनुर्वात), ८ आयपीव्ही (इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन) या आठ लसींबरोबरच आता ही नववी लस दिली जाणार आहे.डायरियामुळे देशभरातील ७८ हजार बालकांचा मृत्यू होत असल्याने या रोटाव्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा निर्णय केंद ्रशासनाने घेतला आहे. या लसीकरणामुळे हजारो बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका टाळणे शक्य होणार आहे.- डॉ. फारूक देसाई, माता बालसंगोपन अधिकारी,जिल्हा परिषद कोल्हापूर