शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

आवाराबाहेरील शेतीमाल विक्रीस पायबंद - :‘नियमन रद्द’चा वटहुकूमच निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:30 IST

बाजार समित्यांच्या आवाराबाहेर शेतीमाल विक्री करण्यास शेतकऱ्यांना मुभा देणारा वटहुकुमास राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने तो निकाली निघाला आहे. सरकारने आॅक्टोबर २०१८ मध्ये समित्यांच्या आवाराबाहेरील

ठळक मुद्देबाजार समित्यांचा पुन्हा अंकुश राहणारसरकारच्या निर्णयाने समित्यांच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने वटहुकुमाविरोधात बाजार समिती संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : बाजार समित्यांच्या आवाराबाहेर शेतीमाल विक्री करण्यास शेतकऱ्यांना मुभा देणारा वटहुकुमास राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने तो निकाली निघाला आहे. सरकारने आॅक्टोबर २०१८ मध्ये समित्यांच्या आवाराबाहेरील शेतीमालाचे नियमन रद्दचा निर्णय घेतला होता; पण आता पुन्हा बाजार समित्यांचा अंकुश राहणार आहे.

बाजार समिती कार्यक्षेत्रात शेतीमालाची खरेदी-विक्री केली तर मार्केट फी द्यावी लागते. त्याचबरोबर समितीच्या परवानगीशिवाय शेतकऱ्यांना बाहेर विक्री करता येत नाही. त्यामुळे शेतीमाल खरेदी-विक्रीवर समित्यांचे अंकुश राहतो; पण राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर समित्यांचे नियंत्रणच कमी करण्याचा निर्णय घेतला. समिती आवाराबाहेर शेतीमाल खरेदी-विक्री करण्याची मुभा सरकारने दिली होती. याबाबतचा २५ आॅक्टोबर २०१८ रोजी वटहुकूम काढला होता. या निर्णयाने समित्यांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला होता.

व्यापारी शेतकºयांकडून कोठेही माल खरेदी करू लागल्याने मार्केट फी वसूल करता येत नाही, त्यामुळे अनेक समित्यांचे उत्पन्न निम्यावर आले होते. याविरोधात नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यातील बाजार समित्यांच्या पदाधिकाºयांची पुणे येथे बैठक झाली होती. सरकारच्या निर्णयाने समित्यांच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने वटहुकुमाविरोधात बाजारसमिती संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सहा महिन्यांच्या आत दोन्ही सभागृहांत मान्यता घेतल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते. वटहुकुमाला २५ एप्रिलला सहा महिने पूर्ण झाले,वास्तविक सरकारने त्याला मुदतवाढ देण्याची गरज होती; पण तसे न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने वटहुकूम कालबाह्य झाल्याने नियमनमुक्ती कायदेशीरदृष्ट्या अमलात असणार नाही, असा आदेश न्यायालयात दिल्याचे समजते.निवडणुकांसाठी समित्यांवर कर्जाची वेळनियमनमुक्ती आणि एकूणच उत्पन्नात मोठी घट झाल्याने राज्यातील ३०० पैकी २०-२५ समित्या सोडल्या तर इतर आतबट्ट्यात आल्या आहेत. कर्मचाºयांचे पगार भागवताना दमछाक उडत असून काहींचा निवडणूक कार्यक्रम लागला आहे. त्यात कार्यक्षेत्रात २० गुंठे जमीनधारकांना मतांचा अधिकार सरकारने दिल्याने हजारोंच्या पटीत मतदार आहेत. यासाठी मोठा बोजा पडला असून निवडणुकांसाठी कर्ज काढण्याची वेळ समित्यांवर आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार