शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

...तर टोकाची भूमिका : राजू शेट्टी

By admin | Updated: October 8, 2015 01:04 IST

याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूर : एकरकमी ‘एफआरपी’ देणे कायद्याने बंधनकारक असताना साखर कारखानदार त्याचे तुकडे पाडणार असतील, तर ते खपवून घेणार नाही. एकंदरीत गेल्या सहा-सात महिन्यांतील सरकारची भूमिका पाहिली तर कारखानदारांना पाठीशी घालणारी आहे, असाच संशय येतो. अशीच भूमिका घेणार असाल तर आम्हालाही टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सत्तेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साखर कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शेतकरी संघटनांनी विरोध केला असून, त्याविरोधात १६ आॅक्टोबरला ‘स्वाभिमानी’ने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चाचे नियोजन केले आहे. याबाबत खासदार राजू शेट्टींशी संपर्क साधला असता ते म्हणाले, साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभेत कारखानदारांनी टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचा ठराव करून घेतला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, एकंदरीत गेल्या पाच-सहा महिन्यांतील सरकारची भूमिका पाहता त्यांचीही कारखानदारांच्या भूमिकेला मूक संमती असल्याचे दिसते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कारखानदारांना सरकार पाठीशी घालणार असेल तर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल. सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सरकारमध्ये असलो काय आणि नसलो काय? आमच्या दृष्टीने शेतकरी महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या हितापुढे कधीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही. याचे भान कारखानदार व सरकारनेही ठेवावे, असा इशारा शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)५० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीमशेतकऱ्यांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली असेल तर संघटनेला काय हरकत, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. यासाठी आम्हीही गावोगावी शेतकऱ्यांना भेटून ‘एफआरपी’बाबत भूमिका जाणून घेण्याची मोहीम उघडली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, साखर कारखान्यांचे नाव, सभासद, ऊस उत्पादक, अशी सर्व माहिती घेण्यात येणार असून, तुम्हाला एकरकमी ‘एफआरपी’ पाहिजे की टप्प्याटप्प्याने, असेही विचारले जाणार आहे. जिल्ह्यातून ५० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम घेतली असून, यासह प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.