शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

...तर टोकाची भूमिका : राजू शेट्टी

By admin | Updated: October 8, 2015 01:04 IST

याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूर : एकरकमी ‘एफआरपी’ देणे कायद्याने बंधनकारक असताना साखर कारखानदार त्याचे तुकडे पाडणार असतील, तर ते खपवून घेणार नाही. एकंदरीत गेल्या सहा-सात महिन्यांतील सरकारची भूमिका पाहिली तर कारखानदारांना पाठीशी घालणारी आहे, असाच संशय येतो. अशीच भूमिका घेणार असाल तर आम्हालाही टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सत्तेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साखर कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शेतकरी संघटनांनी विरोध केला असून, त्याविरोधात १६ आॅक्टोबरला ‘स्वाभिमानी’ने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चाचे नियोजन केले आहे. याबाबत खासदार राजू शेट्टींशी संपर्क साधला असता ते म्हणाले, साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभेत कारखानदारांनी टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचा ठराव करून घेतला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, एकंदरीत गेल्या पाच-सहा महिन्यांतील सरकारची भूमिका पाहता त्यांचीही कारखानदारांच्या भूमिकेला मूक संमती असल्याचे दिसते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कारखानदारांना सरकार पाठीशी घालणार असेल तर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल. सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सरकारमध्ये असलो काय आणि नसलो काय? आमच्या दृष्टीने शेतकरी महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या हितापुढे कधीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही. याचे भान कारखानदार व सरकारनेही ठेवावे, असा इशारा शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)५० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीमशेतकऱ्यांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली असेल तर संघटनेला काय हरकत, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. यासाठी आम्हीही गावोगावी शेतकऱ्यांना भेटून ‘एफआरपी’बाबत भूमिका जाणून घेण्याची मोहीम उघडली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, साखर कारखान्यांचे नाव, सभासद, ऊस उत्पादक, अशी सर्व माहिती घेण्यात येणार असून, तुम्हाला एकरकमी ‘एफआरपी’ पाहिजे की टप्प्याटप्प्याने, असेही विचारले जाणार आहे. जिल्ह्यातून ५० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम घेतली असून, यासह प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.