शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

...तर टोकाची भूमिका : राजू शेट्टी

By admin | Updated: October 8, 2015 01:04 IST

याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूर : एकरकमी ‘एफआरपी’ देणे कायद्याने बंधनकारक असताना साखर कारखानदार त्याचे तुकडे पाडणार असतील, तर ते खपवून घेणार नाही. एकंदरीत गेल्या सहा-सात महिन्यांतील सरकारची भूमिका पाहिली तर कारखानदारांना पाठीशी घालणारी आहे, असाच संशय येतो. अशीच भूमिका घेणार असाल तर आम्हालाही टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सत्तेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साखर कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शेतकरी संघटनांनी विरोध केला असून, त्याविरोधात १६ आॅक्टोबरला ‘स्वाभिमानी’ने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चाचे नियोजन केले आहे. याबाबत खासदार राजू शेट्टींशी संपर्क साधला असता ते म्हणाले, साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभेत कारखानदारांनी टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचा ठराव करून घेतला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, एकंदरीत गेल्या पाच-सहा महिन्यांतील सरकारची भूमिका पाहता त्यांचीही कारखानदारांच्या भूमिकेला मूक संमती असल्याचे दिसते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कारखानदारांना सरकार पाठीशी घालणार असेल तर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल. सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सरकारमध्ये असलो काय आणि नसलो काय? आमच्या दृष्टीने शेतकरी महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या हितापुढे कधीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही. याचे भान कारखानदार व सरकारनेही ठेवावे, असा इशारा शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)५० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीमशेतकऱ्यांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली असेल तर संघटनेला काय हरकत, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. यासाठी आम्हीही गावोगावी शेतकऱ्यांना भेटून ‘एफआरपी’बाबत भूमिका जाणून घेण्याची मोहीम उघडली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, साखर कारखान्यांचे नाव, सभासद, ऊस उत्पादक, अशी सर्व माहिती घेण्यात येणार असून, तुम्हाला एकरकमी ‘एफआरपी’ पाहिजे की टप्प्याटप्प्याने, असेही विचारले जाणार आहे. जिल्ह्यातून ५० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम घेतली असून, यासह प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.