शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दरोड्याचा छडा!

By admin | Updated: September 19, 2015 23:52 IST

सहाजणांना अटक : सामूहिक अत्याचारातील दरोडेखोर शेजारचेच

सातारा : दहा दिवसांपूर्वी सातारा-कोरेगाव रस्त्यावर पडलेला दरोडा आणि अत्याचार प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. घटनास्थळी सापडलेल्या बोटांच्या ठशांवरून शेजारच्या हॉटेलातील आरोपींचा शोध लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. गणेश भीम अय्यर (वय २१, मूळ रा. कडल, ता. खिरसैन, जि. डोटी, नेपाळ, सध्या रा. त्रिपुटी खिंड, ता. सातारा), सुरेश बळिराम कांबळे (२८, रा. जांभखुर्द, ता. कोरेगाव), राहुल ऊर्फ संदीप ऊर्फ सन्डी शिवाजी कांबळे (३७, त्रिपुटी, ता. कोरेगाव), गणेश पिराजी घोडके (२४, रा. त्रिपुटी, ता. कोरेगाव), नीलेश आत्माराम जाधव (२१, रा. तेताळनगर, जांब, ता. कोरेगाव), राजेंद्र लक्ष्मण माने (३५, रा. त्रिपुटी, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सातारा-कोरेगाव रस्त्यावर दि. ११ रोजी एका शाळेच्या बांधकामावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दाम्पत्याच्या झोपडीवर सहाजणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. तसेच त्यावेळी तीन जणांनी सुरक्षारक्षकाच्या पत्नीवर अत्याचारही केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ दाखल झाले होते. त्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक दीपाली खटावकर या महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. दोन दरोडेखोरांच्या बोटांचे ठसे खटावकर यांना सापडले. त्यामुळे दरोडेखोरांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना हा महत्त्वाचा पुरावा सापडला. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी एक ढाबा आहे. त्या ढाब्यावरील कर्मचारी आणि मालकाकडे पोलिसांनी या घटनेबाबत विचारपूस केली; परंतु त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. जिल्'ात अशा प्रकराची घृणास्पद घटना घडल्यामुळे सर्वच स्तरातून पोलिसांवर दबाव वाढत होता. पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी ठिकठिकाणी तीन पथके रवाना केली होती. मात्र, हा प्रकार स्थानिकांंकडून झाला असावा, अशी शंका पोलिसांना घटना घडली त्या दिवसांपासून होती. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक पातळीवरच तपास केंद्रित केला होता. ढाब्यावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्या, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी) यात्रेत मौजमजेसाठी आखला बेत - गणेश अय्यर आणि राहुल कांबळे हे दोघे घटनास्थळासमोरील ढाब्यावर वेटर म्हणून काम करीत होते. राहुलच्या गावची जत्रा काही दिवसांवरच होती. त्यामुळे यात्रेमध्ये मौजमजा करण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. समोर राहणाऱ्या दाम्पत्याला लुटल्यानंतर पैसे मिळतील, अशी त्यांना अपेक्षा होती; परंतु त्यांच्याजवळ फारसे पैसे सापडले नाहीत. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी सुरक्षारक्षकाच्या पत्नीवर अत्याचार केला असल्याचे तपासांत समोर आले. तिघांवर यापूर्वी गंभीर गुन्हे - अटक केलेल्या सुरेश कांबळे याच्या नावावर वाठार पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा, गणेश घोडके याच्याविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा, तर नीलेश जाधव याच्यावर मोटार चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासांत समोर आले आहे. गणेश अय्यर आणि राहुल कांबळे यांच्यावर कसलेही गुन्हे दाखल नाहीत; परंतु याच दोघांनी हा दरोड्याचा बेत आखला. - ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली असताना दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत या ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी तोंड उघडले नाही. दहानंतर मात्र, त्यांनी हळूहळू माहिती देण्यास सुरूवात केली. मात्र, ती माहितीही विसंगत होती, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. ढाब्यावरील दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. येथूनच या प्रकरणाचा उलगडा झाला. घटनास्थळी सापडलेले बोटांचे ठसे आणि ढाब्यावरील दोन कर्मचाऱ्यांच्या बोटांचे ठसे मिळते-जुळते झाल्याने पोलिसांचे पुढचे काम सोपे झाले. आरोपी सीसीटीव्हीत पीडित महिलेवर अत्याचार झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेच्या तिसऱ्या दिवशी गणेश अय्यर रुग्णालयात आला. ज्या ठिकाणी पीडित महिला होती, त्या वॉर्डमध्ये जाऊन त्याने पीडित महिलेची तब्येत कशी आहे, हे लांबून पाहिले. त्यानंतर तो तेथून निघून गेला. हा सारा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ढाबेवाल्याचा थयथयाट फुसका! जे दोन कर्मचारी ढाब्यावर काम करत होते, तो ढाबा एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा आहे. अधिकाऱ्याचा मुलगा या ढाब्याचा व्यवहार पाहतो. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अधिकाऱ्याचा मुलगा व दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. याचा राग निवृत्त अधिकाऱ्याला आला. आपल्या मुलावर आणि कर्मचाऱ्यांवर दांडगा विश्वास असल्यामुळे अधिकाऱ्याने थेट खाकीला आव्हान दिले. विनाकारण माझ्या मुलाला आणि कर्मचाऱ्यांना पोलिसांनी दिवसभर बसवून ठेवले आहे. हे अन्यायकारक असून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा हा प्रकार असल्याचा संताप त्यांनी चक्क पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांच्या निवेदनाकडे लक्ष न देता तपास सुरूच ठेवला. तपासात उघड झालं ते वेगळंच. पोलिसांनी सांगितलं, अधिकाऱ्याचा मुलगा त्या दिवशी रात्री ढाब्यावर नव्हता. तो वेगळ्या ‘उद्योगा’साठी बाहेर गेला होता. याचवेळी ढाब्यामधील कर्मचाऱ्यांनी बेत आखला. रात्री मी ढाब्यामध्ये नव्हतो, हे वडिलांना समजलं तर काय होईल, या भीतीने त्याने वडिलांना तर खोटं सांगितलंच शिवाय पोलिसांनाही खोटं सांगितले. अखेर हा सारा प्रकार त्या निवृत्त अधिकाऱ्यालाही समजला. तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.