शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

बटालियनमध्येच होत होती जवानांची लूट : अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:15 IST

दीपक जाधव ।कोल्हापूर : नागरिकांच्या सुरक्षेवर भर देण्याऐवजी आपल्याच कार्यालयातील जवानांना लुटण्याचा भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या अधिकाºयांचा प्रताप लाचलुचपत विभागाच्या कारवाईने उजेडात आला आहे. जवानांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी या विभागाच्या महासंचालक अर्चना त्यागी यांच्याकडे झाल्या आहेत. गेल्याच आठवड्यात अतिरिक्त महासंचालक संदीप कर्णिक यांनीही कोल्हापुरात येऊन त्यासंबंधीची चौकशी ...

ठळक मुद्दे अनेक वर्षांपासून सुरू होता गैरव्यवहार

दीपक जाधव ।कोल्हापूर : नागरिकांच्या सुरक्षेवर भर देण्याऐवजी आपल्याच कार्यालयातील जवानांना लुटण्याचा भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या अधिकाºयांचा प्रताप लाचलुचपत विभागाच्या कारवाईने उजेडात आला आहे. जवानांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी या विभागाच्या महासंचालक अर्चना त्यागी यांच्याकडे झाल्या आहेत. गेल्याच आठवड्यात अतिरिक्त महासंचालक संदीप कर्णिक यांनीही कोल्हापुरात येऊन त्यासंबंधीची चौकशी केली होती तरीही अधिकाºयांना त्याची कोणतीही भीती वाटत नव्हती हे विशेष.

भारतीय राखीव बटालियन क्रमांक तीनचा कारभार सुरुवातीपासून वादग्रस्त आहे. येथील समादेशकाच्या हाताखालच्या टोळीकडून जवानांची पिळवणूक होत होती. ड्यूटी न लावणे, रजा देण्यासाठीही पैशांची मागणी येथे केली जात असे. जवानांकडून प्रत्येक कामात पैसा घेतला जात असल्याने ते हतबल झाले होते. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतून पैसा गोळा करणे इतकेच काम ही टोळी करीत होती. ‘पैसा देईल त्याचेच काम’ असा इथला कारभार होता अशी चर्चा सुरु होती.जिथे नक्षलवाद्यांचा प्रभाव अधिक आहे, त्या ठिकाणी बटालियन कार्यरत असते. मात्र, या दलातील समादेशकांकडून जवानांची आर्थिक पिळवणूक होत आहे. बाहेर बदली नको असेल तर महिन्याला पाच हजार रुपये मोजावे लागतील, असा सज्जड दमही जवानांना दिला जात होता. जवानांसाठी स्वतंत्र खानावळ आहे. मात्र, त्याठिकाणी कधीही जेवण दिले जात नाही. उलट जवानांकडूनच दर महिन्याला २५०० रुपये घेतले जातात. त्याचा हिशेब मात्र कुठेच कागदोपत्री दिसत नाही. हे पैसे नेमके जातात कुठे याचा शोध अद्यापही लागलेला नाही.

काही महिन्यांपूर्वी ‘वर्ग चार’च्या कर्मचाºयांकडून पदोन्नतीचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये काढले होते. पैसे देऊनही पदोन्नत्या मिळालेल्या नाहीत. एखादा कर्मचारी वैद्यकीय रजा घेवून हजर होणार असेल तर पाच हजार रुपये घेऊन मुंबई गाठायची. याठिकाणी बसलेल्या समुपदेशकाला पैसे द्यायचे. या समुपदेशकाचे कार्यालयात कमी आणि मुंबईत जास्त वास्तव्य आहे.चर्चा लग्नाचीबटालियनमधील एका वरिष्ठ अधिकाºयाच्या मुलाचे लग्न जळगावमध्ये झाले. त्यासाठी दौंड, मुंबई, गडचिरोली, कर्नाटक आणि कोल्हापुरातून रसद पुरविण्यात आली होती. त्याची चर्चा राज्यभर झाली.अलिखित रेटकार्डचालक प्रशिक्षण - १० हजार रुपयेआर्मर प्रशिक्षणासाठी - ७० हजार रुपयेगैरहजर राहिल्यास- ५ हजार रुपयेखानावळ - २५०० रुपयेहजेरी सवलत - १०० ते १ हजार