शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बटालियनमध्येच होत होती जवानांची लूट : अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:15 IST

दीपक जाधव ।कोल्हापूर : नागरिकांच्या सुरक्षेवर भर देण्याऐवजी आपल्याच कार्यालयातील जवानांना लुटण्याचा भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या अधिकाºयांचा प्रताप लाचलुचपत विभागाच्या कारवाईने उजेडात आला आहे. जवानांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी या विभागाच्या महासंचालक अर्चना त्यागी यांच्याकडे झाल्या आहेत. गेल्याच आठवड्यात अतिरिक्त महासंचालक संदीप कर्णिक यांनीही कोल्हापुरात येऊन त्यासंबंधीची चौकशी ...

ठळक मुद्दे अनेक वर्षांपासून सुरू होता गैरव्यवहार

दीपक जाधव ।कोल्हापूर : नागरिकांच्या सुरक्षेवर भर देण्याऐवजी आपल्याच कार्यालयातील जवानांना लुटण्याचा भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या अधिकाºयांचा प्रताप लाचलुचपत विभागाच्या कारवाईने उजेडात आला आहे. जवानांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी या विभागाच्या महासंचालक अर्चना त्यागी यांच्याकडे झाल्या आहेत. गेल्याच आठवड्यात अतिरिक्त महासंचालक संदीप कर्णिक यांनीही कोल्हापुरात येऊन त्यासंबंधीची चौकशी केली होती तरीही अधिकाºयांना त्याची कोणतीही भीती वाटत नव्हती हे विशेष.

भारतीय राखीव बटालियन क्रमांक तीनचा कारभार सुरुवातीपासून वादग्रस्त आहे. येथील समादेशकाच्या हाताखालच्या टोळीकडून जवानांची पिळवणूक होत होती. ड्यूटी न लावणे, रजा देण्यासाठीही पैशांची मागणी येथे केली जात असे. जवानांकडून प्रत्येक कामात पैसा घेतला जात असल्याने ते हतबल झाले होते. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतून पैसा गोळा करणे इतकेच काम ही टोळी करीत होती. ‘पैसा देईल त्याचेच काम’ असा इथला कारभार होता अशी चर्चा सुरु होती.जिथे नक्षलवाद्यांचा प्रभाव अधिक आहे, त्या ठिकाणी बटालियन कार्यरत असते. मात्र, या दलातील समादेशकांकडून जवानांची आर्थिक पिळवणूक होत आहे. बाहेर बदली नको असेल तर महिन्याला पाच हजार रुपये मोजावे लागतील, असा सज्जड दमही जवानांना दिला जात होता. जवानांसाठी स्वतंत्र खानावळ आहे. मात्र, त्याठिकाणी कधीही जेवण दिले जात नाही. उलट जवानांकडूनच दर महिन्याला २५०० रुपये घेतले जातात. त्याचा हिशेब मात्र कुठेच कागदोपत्री दिसत नाही. हे पैसे नेमके जातात कुठे याचा शोध अद्यापही लागलेला नाही.

काही महिन्यांपूर्वी ‘वर्ग चार’च्या कर्मचाºयांकडून पदोन्नतीचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये काढले होते. पैसे देऊनही पदोन्नत्या मिळालेल्या नाहीत. एखादा कर्मचारी वैद्यकीय रजा घेवून हजर होणार असेल तर पाच हजार रुपये घेऊन मुंबई गाठायची. याठिकाणी बसलेल्या समुपदेशकाला पैसे द्यायचे. या समुपदेशकाचे कार्यालयात कमी आणि मुंबईत जास्त वास्तव्य आहे.चर्चा लग्नाचीबटालियनमधील एका वरिष्ठ अधिकाºयाच्या मुलाचे लग्न जळगावमध्ये झाले. त्यासाठी दौंड, मुंबई, गडचिरोली, कर्नाटक आणि कोल्हापुरातून रसद पुरविण्यात आली होती. त्याची चर्चा राज्यभर झाली.अलिखित रेटकार्डचालक प्रशिक्षण - १० हजार रुपयेआर्मर प्रशिक्षणासाठी - ७० हजार रुपयेगैरहजर राहिल्यास- ५ हजार रुपयेखानावळ - २५०० रुपयेहजेरी सवलत - १०० ते १ हजार