शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

रस्तेप्रश्नी प्रशासन धारेवर

By admin | Updated: January 20, 2017 00:14 IST

महापालिका सभा : कंत्राटदार-अधिकाऱ्यांत मिलीभगतचा सदस्यांकडून आरोप

  कोल्हापूर : ‘नगरोत्थान’मधून ३२ कोटी ८९ लाख रुपयांचे रस्ते केले असताना त्यातील ५७ लाख रुपयांचेच रस्ते खराब झाले आहेत, असे प्रशासन म्हणत आहे. खराब झालेल्या रस्त्यांची गुणतपासणी करण्याचे काम वालचंद कॉलेजकडे असताना, नगर अभियंत्यांना एवढेच रस्ते खराब झाल्याचे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल महासभेत गुरुवारी सदस्यांनी उपस्थित केला. या विषयावरून सदस्यांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या. भूपाल शेटे यांनी हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, ‘नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरातील ३२ कोटी ८९ लाख रुपयांचे रस्ते डांबरीकरण करण्यात आले. दोन वर्षांतच हे रस्ते खराब झाले; त्याबद्दल गुणतपासणी करण्यासाठी वालचंद कॉलेजच्या तज्ज्ञ समितीची नेमणूक केली. तरीही नगर अभियंता यांनी स्वत:च्या अधिकारात केवळ ५७ लाख रुपयांचेच रस्ते खराब झाले, असा अहवाल आयुक्तांना सादर केला. विशेष म्हणजे शहरात खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. तरीही प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नाही. यात रस्त्यांचा दर्जा खराब असल्याच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी महापालिकेचे अधिकारी कंत्राटदारांबरोबर मिलीभगत करून विषय मिटवितात. याबाबत प्रशासनातर्फे नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले की, शहरातील ६६ रस्ते नगरोत्थान योजनेतून केले आहेत. त्यांची किंमत ६ कोटी ७१ लाख आहे. नागरिक सातत्याने रस्त्यावर पाणी मारत असल्याने ते खराब होत आहेत. या उत्तराने शेटे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने कारवाई करावी; अन्यथा मी स्वतंत्र गुन्हा दाखल करणार असे सांगितले. बायोमेट्रिकमुळे कर्मचारी कामावर असूनही त्याची २० दिवस हजेरी लागत नाही. ही मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार संतोष गायकवाड यांनी केली. ही मशीन योग्य रीतीने सुरू असल्याचे प्रशासनातर्फे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. यावर आक्रमक होत गायकवाड यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवावे, अशी मागणी केली. ही मागणी सभागृहानेही (हॅलो ३ वर) श्वेतपत्रिका काढा महापालिकेच्या दृष्टीने कुठले काम चांगले आहे, हे सभागृहाला दाखवा, अशी मागणी नगरसेवक सुनील कदम यांनी केली. यात त्यांनी प्रत्येक विभागाचा प्रमुख काय करतो?, रंकाळा तलावाची दुरवस्था आहे. संरक्षक कठडे नाहीत म्हणून माणसे मरत आहेत. पूल पडत आहेत. स्मशानभूमीमध्ये लाकडे नाहीत. अपुरा कर्मचारी वर्ग आहे. या सर्व प्रश्नांवर आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी कदम यांनी केली. ...यांचाही गौरव : ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी लोगो तयार करणारे अनंत खासबारदार यांचा, तर इराणी खणीत बाप-लेकीसह बुडालेली गाडी काढणारे धाडसी सुनील कांबळे व पाणीपुरवठा विभागाकडे रोजंदारीवर २५ वर्षे काम करणारे रमेश सरनाईक, रंकाळा तलावात आत्महत्या करणाऱ्या शालन भंडारे या महिलेस वाचविल्याबद्दल अग्निशमन दलाचे जवान भगवान शिंगाडे, तर जयदीप पाटणे, प्रसाद पोवार, वैभव ठाकर (तिघांची राष्ट्रीय कि क बॉक्सिंगमध्ये चमकदार कामगिरी), विशाल पाटील (राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड), विशाल भाले (राज्य हॉकी संघात निवड), भार्गव कांबळे (ढोलकी बोलकी स्पर्धेत यश), शैलजा कोसंबी (आदर्श माता), तौफिक मुल्लाणी (चेंबर्स सदस्य निवड) यांचा सत्कार महापौर हसिना फरास यांच्या हस्ते झाला. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, आदी उपस्थित होते. हे ठराव मंजूर झाले ताराबाई पार्कातील सासने मैदान केवळ खेळासाठी राखीव ठेवा महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थानमधून २०१६-१७ या वर्षातील ४.४१ कोटींच्या कामांना मंजुरी सीमाभागातील मराठी भाषिकांवर झुंडशाहीचा निषेध फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने कारवाई करावी; अन्यथा मी स्वतंत्र गुन्हा दाखल करणार, असे भूपाल शेटे यांनी सांगितले.