शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

‘आयआरबी’चे रस्ते सदोष

By admin | Updated: July 14, 2015 01:12 IST

‘नोबेल’चा निष्कर्ष : कोल्हापुरातील रस्त्यांच्या दर्जाचा प्राथमिक अहवाल सादर; पडताळणीनंतरच अहवाल फेरमूल्यांकन समितीकडे

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून कोल्हापुरात ‘आयआरबी’ कंपनीने ‘बीओटी’ तत्त्वावर केलेल्या रस्त्यांचा दर्जा सदोष असल्याचा निष्कर्ष ‘नोबेल कन्सल्टिंग’ कंपनीने आपल्या प्राथमिक अहवालात काढला आहे. कंपनीने सोमवारी हा अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता बी. एन. ओहोळ यांना सादर केला. ओहोळ हे या अहवालाची पडताळणी करून तो फेरमूल्यांकन समितीला सादर करणार आहेत. कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आयआरबीच्या या रस्त्यांचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी समिती स्थापन केली. या समितीत मुंबई येथील राज्य रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय सरव्यवस्थापक तथा समितीचे अध्यक्ष संतोषकुमार, कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर्किटेक्ट राजेंद्र सावंत, रामचंदानी या सदस्यांचा समावेश आहे. त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्यांचा दर्जा तपासण्यासाठी पुणे येथील अमित सणगर यांच्या ‘नोबेल कन्सल्टिंग’ कंपनीला नियुक्त केले. मुंबईत सोमवारी ‘नोबेल कन्सल्टिंग’ कंपनीच्या प्रतिनिधींची बी. एन. ओहोळ यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत या कंपनीने आपला प्राथमिक अहवाल सादर केला. या अहवालात रस्त्यांचे मोजमाप व दरपत्रक, रस्त्यांच्या दर्जाबाबत असलेल्या काही त्रुटी, याची माहिती असल्याचे समजते. ओहोळ हे या अहवालाची पडताळणी करणार आहेत व लवकरच या अहवालाद्वारे फेरमूल्यांकन समितीला रस्त्यांच्या त्रुटी काय आहेत, ते कळविणार आहेत. त्यानंतर गरज भासल्यास पुन्हा या रस्त्यांच्या दर्जाची तपासणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)