शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

ऊस वाहतुकीमुळे रस्ते वाहतूक बनली असुरक्षित

By admin | Updated: December 31, 2015 00:23 IST

रस्त्यांवर दहशत : मर्यादेपेक्षा जास्त ऊस भरलेल्या; भरधाव वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढली

अशोक खाडे-- कुंभोज--रहदारीने गजबजलेल्या लहान-मोठ्या रस्त्यांवर साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला की, ऊस वाहतूक सुरू होते. मर्यादेपेक्षा जास्त ऊस भरलेल्या ट्रॅॅक्टरची भरधाव ये-जा आणि दिवसागणिक ऊस वाहतुकीची वाहने पलटी होण्याच्या घटनांत जीवघेण्या अपघातांची संख्या वाढली आहे. सर्वच रस्त्यांवर सध्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची बेफिकिरी वाढल्याने पादचारी, सायकलस्वार, दुचाकी वाहनधारक, शाळकरी मुले भीतीच्या छायेत जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसून येतात. खचाखच ऊस भरून झोकांड्या घेत, कर्णकर्कश गाण्यांच्या तालावर बेफामपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचीच रस्त्यांवर दहशत निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.ऊस वाहतुकीसाठी बैलगाडी, टॅक्टर तसेच ट्रकचा वापर होतो. वाहनधारकाने किती ऊस भरावा याबाबत बंधन नसल्याने ऊस वाहतूकदार अतिरिक्त कमाईच्या आशेने १६ टनांपेक्षा २ ते ४ टन जादा उसाची वाहतूक करताना दिसतात. वाहनमालकाचा कमीतकमी खर्चात ऊस वाहतुकीद्वारे जादा कमाई करण्याचा प्रयत्न असतो. यामुळेच वाहनांची ये-जा करताना जणू शर्यत सुरू असते. या चढाओढीमुळे रस्त्यावरील प्रत्येकाचा प्रवास असुरक्षित बनला आहे.लहान-मोठ्या रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक यांची वर्दळ वाढली आहे. या वाहनांची बेफाम गती, अतिरिक्त ऊस भरणी, वाहनांसह त्यातील टेपरेकॉर्डरचा कर्णकर्कश आवाज यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीला बेशिस्तपणा आला आहे. त्यातच रस्त्यात ऊस गळणे, उसाचे ट्रॅक्टर पलटी होणे, अशा घटना नित्याच्या बनल्या आहेत. यामुळे विशेषत: पादचारी, सायकलस्वार, दुचाकीस्वार यांचा प्रवास असुरक्षित बनला आहे. शाळकरी मुले तर जीव मुठीत घेऊन शाळेच्या वाटेवरून ये-जा करतात. मुले शाळेहून घरी पोहोचेपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. अनेक गावे, तसेच शहरांबाहेरून बायपास रस्ते नसल्याने ऊस वाहतुकीची वाहने बिनदिक्कतपणे नागरी वस्तींतूनच ये-जा करतात. त्यामुळेच तर अपघातांची संख्या दिवसेंदिस वाढत चालली आहे. परिणामी याकाळात रस्ते वाहतूक सर्वांसाठीच असुरक्षित बनली आहे.