शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारी वाचविण्यासाठी रस्त्यावर

By admin | Updated: November 9, 2014 23:31 IST

हसन मुश्रीफ : आजरा कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ

आजरा : साखरेचे दर वाढत नाहीत तोपर्यंत उसाला जादा दर देता येत नाही. साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. सद्य:स्थितीत शासनाकडून भरीव अनुदान थेट ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचले जाण्याची गरज आहे. यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे. सध्या केंद्रात व राज्यात आपण विरोधी बाकावर असल्याने साखर कारखानदारी वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरणार, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.आजरा साखर कारखान्याच्या १८व्या गळीत हंगाम प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी आ. संध्यादेवी कुपेकर होत्या. उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष मारुतीराव घोरपडे यांनी केले. यावेळी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांनी व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासास तडा न जाऊ देता किमान वैधानिक दरापेक्षा जादा दर कारखान्याकडून दिला गेला आहे. सध्या बाजारातील साखरेचे दर पाहता ऊस वाहतुकीसह कारखाना कर्मचारी पगार व इतर खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसणे कठीण आहे. डिस्टीलरीचा छोटा प्रकल्प सुरू करून उत्पन्न वाढविण्यास संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कारखानदारी मोडीत निघाल्यास अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होतील, यासाठी सरकारकडून साखर कारखान्यांबाबत सकारात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षांत साखर कारखानदारीसमोर नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. उत्पादित साखरेसाठी प्रत्येक पोत्यामागे सरकारने ५०० रुपये थेट अनुदान द्यावे. अडचणी आहेत म्हणून संचालक मंडळाने खचून न जाता सहवीज प्रकल्प, डिस्टीलरी प्रकल्प यांसारखे उपक्रम हाती घ्यावेत.आ. मुश्रीफ म्हणाले, गेले पंधरा वर्षे आघाडी सरकारची सत्ता होती; आता बसपाळी मिळाली आहे. सत्ता गेल्यामुळे लोकांची कामे करण्यावर अनेक मर्यादा येत आहेत. येथून पुढे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येण्याची तयारी ठेवावी, कारण आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही. के. पी. पाटील हे जिद्दी असल्याने भविष्यात त्यांचे लालदिव्याचे स्वप्न साकार होईल, असेही स्पष्ट केले.यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, मुकुंदराव देसाई, अशोक चराटी, वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या संजीवनी गुरव, विलास नाईक, विजयकुमार पाटील, उपसभापती दीपक देसाई, तुळशीराम कांबळे, सुधीर देसाई, रामराजे कुपेकर, बी. एन. पाटील, राजू होलम, अनिल फडके, असलम खेडेकर, कारखान्याचे संचालक, कर्मचारी, सचिव व्यंकटेश ज्योती यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक पी. एल. हरेरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)