शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कारखानदारी वाचविण्यासाठी रस्त्यावर

By admin | Updated: November 9, 2014 23:31 IST

हसन मुश्रीफ : आजरा कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ

आजरा : साखरेचे दर वाढत नाहीत तोपर्यंत उसाला जादा दर देता येत नाही. साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. सद्य:स्थितीत शासनाकडून भरीव अनुदान थेट ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचले जाण्याची गरज आहे. यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे. सध्या केंद्रात व राज्यात आपण विरोधी बाकावर असल्याने साखर कारखानदारी वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरणार, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.आजरा साखर कारखान्याच्या १८व्या गळीत हंगाम प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी आ. संध्यादेवी कुपेकर होत्या. उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष मारुतीराव घोरपडे यांनी केले. यावेळी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांनी व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासास तडा न जाऊ देता किमान वैधानिक दरापेक्षा जादा दर कारखान्याकडून दिला गेला आहे. सध्या बाजारातील साखरेचे दर पाहता ऊस वाहतुकीसह कारखाना कर्मचारी पगार व इतर खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसणे कठीण आहे. डिस्टीलरीचा छोटा प्रकल्प सुरू करून उत्पन्न वाढविण्यास संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कारखानदारी मोडीत निघाल्यास अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होतील, यासाठी सरकारकडून साखर कारखान्यांबाबत सकारात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षांत साखर कारखानदारीसमोर नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. उत्पादित साखरेसाठी प्रत्येक पोत्यामागे सरकारने ५०० रुपये थेट अनुदान द्यावे. अडचणी आहेत म्हणून संचालक मंडळाने खचून न जाता सहवीज प्रकल्प, डिस्टीलरी प्रकल्प यांसारखे उपक्रम हाती घ्यावेत.आ. मुश्रीफ म्हणाले, गेले पंधरा वर्षे आघाडी सरकारची सत्ता होती; आता बसपाळी मिळाली आहे. सत्ता गेल्यामुळे लोकांची कामे करण्यावर अनेक मर्यादा येत आहेत. येथून पुढे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येण्याची तयारी ठेवावी, कारण आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही. के. पी. पाटील हे जिद्दी असल्याने भविष्यात त्यांचे लालदिव्याचे स्वप्न साकार होईल, असेही स्पष्ट केले.यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, मुकुंदराव देसाई, अशोक चराटी, वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या संजीवनी गुरव, विलास नाईक, विजयकुमार पाटील, उपसभापती दीपक देसाई, तुळशीराम कांबळे, सुधीर देसाई, रामराजे कुपेकर, बी. एन. पाटील, राजू होलम, अनिल फडके, असलम खेडेकर, कारखान्याचे संचालक, कर्मचारी, सचिव व्यंकटेश ज्योती यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक पी. एल. हरेरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)