शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील रस्ते प्रकल्प कायदेशीरच

By admin | Updated: November 27, 2014 00:49 IST

निकालपत्र जाहीर : यापूर्वीच का आला नाही : हायकोर्ट

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांमध्ये केलेला त्रिसदस्यीय एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाचा करार हा कायदेशीरच असल्याचा निर्वाळा आज, बुधवारी उच्च न्यायालयाने याप्रश्नी जाहीर केलेल्या निकालपत्रात दिला. टोलप्रश्नी १४ आॅक्टोबर २०१४ रोजी फेटाळलेल्या सर्व तिन्ही याचिकांचे राखून ठेवलेले सविस्तर १०५ पानांचे निकालपत्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. धर्माधिकारी व ए. के. मेनन यांनी जाहीर केले. शहर एकात्मिक रस्ते प्रकल्पाबाबत राज्य शासनाने फेब्रुवारी २०१३ मध्ये नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने व सोव्हिल या सल्लागार कंपनीने यापूर्वी ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा अहवाल दिला आहे. २००४ ते २००८ पर्यंत प्रकल्पाच्या करार व निविदेचे काम सुरू होते, त्यावेळी कोल्हापूरकर गप्प राहिले. ‘आयआरबी’ने पोलीस संरक्षणाची मागणी केल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. /बाब न्यायप्रविष्ट असतानाच कोल्हापूरकरांनी टोलनाके जाळले, आदी कारणांसह न्यायालयात येण्यास उशीर झाल्यानेच टोलप्रश्नी सर्व याचिका फे टाळल्याचे निकालपत्राद्वारे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती कृती समितीचे अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी ‘लोकमत’ला दिली. याप्रश्नी आता सर्वोच्च न्यायालयात टोलविरोधी कृती समिती दाद मागणार आहे. अ‍ॅड. नरवणकर यांनी निकापत्राबाबत माहिती देताना सांगितले की, निकालपत्राच्या पहिल्या ४० पानांमध्ये न्यायालयाने शांतताप्रिय कोल्हापूरकरांनी टोलनाके जाळत कायदा हातात का घेतला, असा सवाल उपस्थित केला आहे. प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना अशा प्रकारे हिंसा करणे म्हणजे न्यायालयावर अविश्वास दाखविण्यासारखेच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. टोलप्रश्नी एकापेक्षा अधिक जनहित याचिका दाखल करण्याची गरज नव्हती; त्यामुळे हेतूबाबत शंका उपस्थित होते. आयआरबीचा पोलीस संरक्षणाचा मुद्दा ग्राह्ण धरल्यानंतरच कोल्हापूरकरांनी न्यायालयात धाव घेतली. २००४ ते २००८पर्यंत रस्ते प्रकल्पाची निविदा काढणे व करार करण्याची जाहीर प्रक्रिया सुरू होती. आता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कराराबाबत आक्षेप घेणे योग्य नाही. जनहिताचा विचार करता त्याच वेळी न्यायालयात दाद मागणे इष्ट झाले असते. आयआरबीला महापालिकेने हॉटेलसाठी दिलेला भूखंड क्रीडांगणासाठी राखीव असल्यास ही राखीव जागा महापालिकेला हस्तांतरित करून याचा अहवाल चार महिन्यांत द्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.शासनाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने व सल्लागार कंपनीने दिलेल्या कामाच्या पूर्णत्वाबाबतच्या दाखल्यावर वेगळे मुद्दे नोंदविण्याची गरज वाटत नाही. कामाचा दर्जा तपासणे हे न्यायालयाचे काम नाही. हे काम शासनाने नेमलेल्या समितीने यापूर्वीच केले आहे. त्यामुळे कामाच्या दर्जामध्ये न पडता याचिका रद्द करण्याचा निर्णय घेत असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केल्याचे अ‍ॅड. नरवणकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)निकालपत्रातील मुद्दे असे :टोलला विरोध म्हणून नाके जाळणे योग्य नाही.शासनाने नेमलेल्या समितीच्या अहवाला-नुसार ९५ टक्के काम पूर्ण.नागरी हिताची पायमल्ली प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कशी दिसली ?२००४ ते ८ या दरम्यान आवाज उठविणे गरजेचे होते.रस्ते प्रकल्प अपूर्ण आहे. याबाबत महापालिकेने प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. प्रकल्प अपूर्ण असताना केलेली टोलवसुली बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर टोलवसुली बंद करावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. - अ‍ॅड. अभय नेवगी व अ‍ॅड. युवराज नरवणकरनिकालाची पार्श्वभूमीमुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापुरातील टोलवसुलीस दिलेली स्थगिती सर्वाेच्च न्यायालयाने ५ मे २०१४ रोजी उठविली होती. याबाबत उच्च न्यायालयाने फेरविचार करून ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती, राज्य शासन व आयआरबी कंपनीस उच्च न्यायालयाने म्हणणे मांडण्यासाठी वेळ देत २९ व ३० सप्टेंबर २०१४ अशी दोन दिवस सुनावणी घेतली. १४ आॅक्टोबरला निकाल देत सर्व याचिका फेटाळल्या होत्या. यानंतर न्यायालयाने निकाल आज जाहीर केला. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे किरण पवार, चंद्रमोहन पाटील, सुभाष वाणी, शिवाजीराव परुळेकर व अमर नाईक यांनी दाखल केल्या होत्या.