शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पन्हाळा पश्चिम भागाकडून येणारा रस्ता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:22 IST

पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाजा किंवा कोकण दरवाजाकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना

ठळक मुद्देकोकण दरवाजा : मार्गाचे डांबरीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी

पन्हाळा : पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाजा किंवा कोकण दरवाजाकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता धोकादायक झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी जोरदार मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी, गुढे, रविवार पेठ, इंजोळे, खडेखोळ या गावांतील लोकांना या रस्त्याने पन्हाळ्याला ये-जा करावी लागते या गावच्या लोकांचे जीवन पन्हाळा शहरावरच अवलंबून आहे. येथील वृद्ध, मुले, रुग्ण यांना पायी पन्हाळ्याकडे प्रवास करणे अवघड बनत असल्याने व वाघबीळमार्गे प्रवास करायचा झाल्यास १० ते १२ किलोमीटर जादा अंतर जावे लागत असल्याने या भागातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी तत्कालीन आमदार स्व. यशवंत एकनाथ पाटील यांच्या प्रयत्नांतून तीन दरवाजा ते सोमवार पेठ महादेव मंदिर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

सध्या या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे खडी उखडली आहे रस्त्यावर या उकडलेल्या खडीने दुचाकी वाहने घसरण्याचे व छोटे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. खरंतर हा रस्ता तीव्र चढ-उताराचा आहे. वळणांचा देखील आहे. वाहनधारकांना रस्ता खराब झाल्याने वाहन चालविणे मुश्किलीचे झाले आहे. या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वाहनांचे देखील नुकसान होत असल्याचे अनेक वाहनधारकांनी सांगितले आहे. ह्या रस्त्याची रुंदी कमी असून, तीन दरवाज्याकडून सोमवार पेठेकडे खाली जाताना पन्हाळा स्मशानभूमी येथील तीव्र वळण व वळणाकडेच्या बाजूचा भाग तुटून गेला असून, संरक्षक कठडा तर पूर्णपणे जमिनदोस्त झाला आहे.संरक्षक कठडा बांधणे आवश्यकया मार्गावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संरक्षक कठडा बांधणे आवश्यक आहे. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सोमवार पेठेकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला खोल दरी असून, येथे संरक्षक ग्रीलची आवश्यकता आहे. रात्रीच्यावेळी येथे एखादी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावर नवीन वाहकाला वाहन चालविण्याचा अंदाज येत नाही, तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, रस्त्याच्या बाजूला संरक्षक लोखंडी अथवा कठडे तातडीने बांधावेत, अशी जोरदार मागणी वाहनधारक, नागरिकांच्यावतीने होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर