शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

पन्हाळा पश्चिम भागाकडून येणारा रस्ता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:22 IST

पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाजा किंवा कोकण दरवाजाकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना

ठळक मुद्देकोकण दरवाजा : मार्गाचे डांबरीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी

पन्हाळा : पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाजा किंवा कोकण दरवाजाकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता धोकादायक झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी जोरदार मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी, गुढे, रविवार पेठ, इंजोळे, खडेखोळ या गावांतील लोकांना या रस्त्याने पन्हाळ्याला ये-जा करावी लागते या गावच्या लोकांचे जीवन पन्हाळा शहरावरच अवलंबून आहे. येथील वृद्ध, मुले, रुग्ण यांना पायी पन्हाळ्याकडे प्रवास करणे अवघड बनत असल्याने व वाघबीळमार्गे प्रवास करायचा झाल्यास १० ते १२ किलोमीटर जादा अंतर जावे लागत असल्याने या भागातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी तत्कालीन आमदार स्व. यशवंत एकनाथ पाटील यांच्या प्रयत्नांतून तीन दरवाजा ते सोमवार पेठ महादेव मंदिर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

सध्या या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे खडी उखडली आहे रस्त्यावर या उकडलेल्या खडीने दुचाकी वाहने घसरण्याचे व छोटे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. खरंतर हा रस्ता तीव्र चढ-उताराचा आहे. वळणांचा देखील आहे. वाहनधारकांना रस्ता खराब झाल्याने वाहन चालविणे मुश्किलीचे झाले आहे. या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वाहनांचे देखील नुकसान होत असल्याचे अनेक वाहनधारकांनी सांगितले आहे. ह्या रस्त्याची रुंदी कमी असून, तीन दरवाज्याकडून सोमवार पेठेकडे खाली जाताना पन्हाळा स्मशानभूमी येथील तीव्र वळण व वळणाकडेच्या बाजूचा भाग तुटून गेला असून, संरक्षक कठडा तर पूर्णपणे जमिनदोस्त झाला आहे.संरक्षक कठडा बांधणे आवश्यकया मार्गावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संरक्षक कठडा बांधणे आवश्यक आहे. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सोमवार पेठेकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला खोल दरी असून, येथे संरक्षक ग्रीलची आवश्यकता आहे. रात्रीच्यावेळी येथे एखादी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावर नवीन वाहकाला वाहन चालविण्याचा अंदाज येत नाही, तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, रस्त्याच्या बाजूला संरक्षक लोखंडी अथवा कठडे तातडीने बांधावेत, अशी जोरदार मागणी वाहनधारक, नागरिकांच्यावतीने होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर