शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पन्हाळा पश्चिम भागाकडून येणारा रस्ता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:22 IST

पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाजा किंवा कोकण दरवाजाकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना

ठळक मुद्देकोकण दरवाजा : मार्गाचे डांबरीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी

पन्हाळा : पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाजा किंवा कोकण दरवाजाकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता धोकादायक झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी जोरदार मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी, गुढे, रविवार पेठ, इंजोळे, खडेखोळ या गावांतील लोकांना या रस्त्याने पन्हाळ्याला ये-जा करावी लागते या गावच्या लोकांचे जीवन पन्हाळा शहरावरच अवलंबून आहे. येथील वृद्ध, मुले, रुग्ण यांना पायी पन्हाळ्याकडे प्रवास करणे अवघड बनत असल्याने व वाघबीळमार्गे प्रवास करायचा झाल्यास १० ते १२ किलोमीटर जादा अंतर जावे लागत असल्याने या भागातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी तत्कालीन आमदार स्व. यशवंत एकनाथ पाटील यांच्या प्रयत्नांतून तीन दरवाजा ते सोमवार पेठ महादेव मंदिर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

सध्या या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे खडी उखडली आहे रस्त्यावर या उकडलेल्या खडीने दुचाकी वाहने घसरण्याचे व छोटे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. खरंतर हा रस्ता तीव्र चढ-उताराचा आहे. वळणांचा देखील आहे. वाहनधारकांना रस्ता खराब झाल्याने वाहन चालविणे मुश्किलीचे झाले आहे. या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वाहनांचे देखील नुकसान होत असल्याचे अनेक वाहनधारकांनी सांगितले आहे. ह्या रस्त्याची रुंदी कमी असून, तीन दरवाज्याकडून सोमवार पेठेकडे खाली जाताना पन्हाळा स्मशानभूमी येथील तीव्र वळण व वळणाकडेच्या बाजूचा भाग तुटून गेला असून, संरक्षक कठडा तर पूर्णपणे जमिनदोस्त झाला आहे.संरक्षक कठडा बांधणे आवश्यकया मार्गावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संरक्षक कठडा बांधणे आवश्यक आहे. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सोमवार पेठेकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला खोल दरी असून, येथे संरक्षक ग्रीलची आवश्यकता आहे. रात्रीच्यावेळी येथे एखादी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावर नवीन वाहकाला वाहन चालविण्याचा अंदाज येत नाही, तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, रस्त्याच्या बाजूला संरक्षक लोखंडी अथवा कठडे तातडीने बांधावेत, अशी जोरदार मागणी वाहनधारक, नागरिकांच्यावतीने होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर