शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता केला वाढून पिके गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५१ अंतर्गत भादोले ते शिगाव दरम्यान रस्त्याचे काम यंदा पूर्ण झाले. हे काम करताना ...

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५१ अंतर्गत भादोले ते शिगाव दरम्यान रस्त्याचे काम यंदा पूर्ण झाले. हे काम करताना रस्त्याची उंची पाच फुटांनी वाढविल्याने, तसेच केवळ दोन ठिकाणी पाणी जाण्यासाठी चार फुटांचा एक नळा ठेवल्याने महापुराचे पाणी तुंबून भादोले, शिगाव, किणी, कोरेगाव येथील तब्बल चार हजार एकर शेती अद्याप पाण्याखाली आहे. हा नवा रस्ता शेतकऱ्यांसाठी काळ ठरला असून, पूरबाधित भागात रस्त्याची उंची वाढविलीच का, असा संतप्त सवाल परिसरातील शेतकरी करीत आहेत.

यंदाच्या महापुराने नदीकाठच्या पिकांचा चिखल झाल्याने अगोदरच कोरोनामुळे हवालदिल झालेला शेतकरी पुरता हरला आहे. वारणा नदीकाठची पिके २३ जुलैपासून पाण्यात असल्याने, तसेच २०१९ पेक्षा पुराचे पाणी एक किलोमीटर जास्त आत शिरल्याने शेतकऱ्याच्या भरल्या संसाराची राखरांगोळी झाली असल्याचे चित्र आहे. वारणाकाठ हा कसदार पट्टा, तसेच ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, यंदाच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५१ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम पूर्ण केले. भादोले ते शिगाव हा पूर पट्टा असल्याने येथे रस्त्याची उंची न वाढविता केवळ रस्ता करणे अपेक्षित होते. तसेच रस्त्याच्या पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे जाण्यासाठी चार ते पाच ठिकाणी मोठी माेरी बांधणे आवश्यक होते. परंतु, हा रस्ता पाच फुटांनी वाढविण्यात आला. तसेच केवळ दोन ठिकाणी मोरी बांधून तेथे केवळ एक चार फुटी सिंमेंटचा नळा टाकून पाच किलोमीटरचे महापुराचे पाणी घालविण्याचा भीम पराक्रम केला आहे. यामुळे यंदा वारणाकाठच्या शेतीला मरणकळा आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या रस्त्यामुळे सर्वांत जास्त फटका भादोलेला बसला असून, येथील जवळपास दोन हजार एकर शेती पाण्याखाली आहे. सांगली जिल्ह्यातील शिगाव गाव ८० टक्के स्थलांतर केले असून, ७० टक्केे जमीन पाण्यात गेली आहे, तर कोरेगाव येथे पुराचे अडीच किलोमीटर पाणी आले असून, ८०० एकरांतील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच किणी येथील पूरपातळी २०१९ पेक्षा वाढून ५०० एकर शेती बुडाली आहे.

.........

त्या अभियंत्याला नोबेलच द्यायला हवे

शिगाव ते भादोले अंतर साडेतीन किलोमीटर आहे. या अंंतरात पाणी रस्ता पास करण्यासाठी तीन ते चार ठिकाणी मोठ्या मोऱ्या बांधणे अपेक्षित होते. परंतु, केवळ दोन ठिकाणी केवळ एक नळा टाकून पाणी जाण्याचे नियोजन करणाऱ्या सार्वजिनक बांधकामच्या अधिकाऱ्यास नोबेलच द्यायला हवा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

........

मंत्री गाडीतून उतरलेही नाहीत

दोनच दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील या रस्त्यावरून जात असताना येथील शेतकऱ्यांनी त्यांचा तापा अडवून रस्त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच मोरी लहान असल्याने पाणी जात नसल्याचे सांगून मोरी पाहण्याची विनंती केली. परंतु, मी लक्ष घालतो असे सांगून त्यांनी गाडीतून उतरण्याची तसदीही घेतली नाही. तसेच या भागातील एकही लाेकप्रतिनिधी या भागाकडे फिरकलेला नाही. यावरही शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.

.....

कोट....

जिल्ह्यातील तीन मंत्री असूनही ते आपल्या मतदारसंघापुरतेच पूरस्थिती पाहत बसले आहेत. भादोले ते शिगाव पाणी तुंबूंन शेती बुडाली आहे; पण आमदार, खासदार इकडे फिरकलेला नाही, हा प्रश्न लवकर सोडवला नाही तर शेतकरी मंत्र्यांच्या गाड्या फोडतील.

शिवाजी माने, अध्यक्ष जय शिवराय किसान संघटना.

.........

भादोले ते शिगाव रस्ता उंच केल्याने शिगावमध्ये ८५० फूट पाणी आत आले आहे. २०१९ मध्ये ३० टक्के गाव उठले होते. यंदा ८० टक्के गाव स्थलांतर झाले आहे. तसेच ७० टक्के शेती पाण्याखाली आहे. रस्ता वाढल्याने आमचे वाटोळे झाले आहे.

निवास पाटील, शेतकरी शिगाव

.........

हा रस्ता करीत असताना आम्ही तीन ठिकाणी मोरी बांधण्याचा प्रयत्न केला, पण तेथील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने जागा बदलावी लागली. तसेच येथे नाले नसल्याने पाणी जास्त वेळ साठून राहत आहे. जर तशी मागणी केली तर आणखी दोन ठिकाणी मोरी बांधण्यास आम्ही तयार आहोत.

जी. आर. टेपाळे, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग