शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता केला वाढून पिके गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५१ अंतर्गत भादोले ते शिगाव दरम्यान रस्त्याचे काम यंदा पूर्ण झाले. हे काम करताना ...

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५१ अंतर्गत भादोले ते शिगाव दरम्यान रस्त्याचे काम यंदा पूर्ण झाले. हे काम करताना रस्त्याची उंची पाच फुटांनी वाढविल्याने, तसेच केवळ दोन ठिकाणी पाणी जाण्यासाठी चार फुटांचा एक नळा ठेवल्याने महापुराचे पाणी तुंबून भादोले, शिगाव, किणी, कोरेगाव येथील तब्बल चार हजार एकर शेती अद्याप पाण्याखाली आहे. हा नवा रस्ता शेतकऱ्यांसाठी काळ ठरला असून, पूरबाधित भागात रस्त्याची उंची वाढविलीच का, असा संतप्त सवाल परिसरातील शेतकरी करीत आहेत.

यंदाच्या महापुराने नदीकाठच्या पिकांचा चिखल झाल्याने अगोदरच कोरोनामुळे हवालदिल झालेला शेतकरी पुरता हरला आहे. वारणा नदीकाठची पिके २३ जुलैपासून पाण्यात असल्याने, तसेच २०१९ पेक्षा पुराचे पाणी एक किलोमीटर जास्त आत शिरल्याने शेतकऱ्याच्या भरल्या संसाराची राखरांगोळी झाली असल्याचे चित्र आहे. वारणाकाठ हा कसदार पट्टा, तसेच ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, यंदाच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५१ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम पूर्ण केले. भादोले ते शिगाव हा पूर पट्टा असल्याने येथे रस्त्याची उंची न वाढविता केवळ रस्ता करणे अपेक्षित होते. तसेच रस्त्याच्या पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे जाण्यासाठी चार ते पाच ठिकाणी मोठी माेरी बांधणे आवश्यक होते. परंतु, हा रस्ता पाच फुटांनी वाढविण्यात आला. तसेच केवळ दोन ठिकाणी मोरी बांधून तेथे केवळ एक चार फुटी सिंमेंटचा नळा टाकून पाच किलोमीटरचे महापुराचे पाणी घालविण्याचा भीम पराक्रम केला आहे. यामुळे यंदा वारणाकाठच्या शेतीला मरणकळा आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या रस्त्यामुळे सर्वांत जास्त फटका भादोलेला बसला असून, येथील जवळपास दोन हजार एकर शेती पाण्याखाली आहे. सांगली जिल्ह्यातील शिगाव गाव ८० टक्के स्थलांतर केले असून, ७० टक्केे जमीन पाण्यात गेली आहे, तर कोरेगाव येथे पुराचे अडीच किलोमीटर पाणी आले असून, ८०० एकरांतील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच किणी येथील पूरपातळी २०१९ पेक्षा वाढून ५०० एकर शेती बुडाली आहे.

.........

त्या अभियंत्याला नोबेलच द्यायला हवे

शिगाव ते भादोले अंतर साडेतीन किलोमीटर आहे. या अंंतरात पाणी रस्ता पास करण्यासाठी तीन ते चार ठिकाणी मोठ्या मोऱ्या बांधणे अपेक्षित होते. परंतु, केवळ दोन ठिकाणी केवळ एक नळा टाकून पाणी जाण्याचे नियोजन करणाऱ्या सार्वजिनक बांधकामच्या अधिकाऱ्यास नोबेलच द्यायला हवा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

........

मंत्री गाडीतून उतरलेही नाहीत

दोनच दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील या रस्त्यावरून जात असताना येथील शेतकऱ्यांनी त्यांचा तापा अडवून रस्त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच मोरी लहान असल्याने पाणी जात नसल्याचे सांगून मोरी पाहण्याची विनंती केली. परंतु, मी लक्ष घालतो असे सांगून त्यांनी गाडीतून उतरण्याची तसदीही घेतली नाही. तसेच या भागातील एकही लाेकप्रतिनिधी या भागाकडे फिरकलेला नाही. यावरही शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.

.....

कोट....

जिल्ह्यातील तीन मंत्री असूनही ते आपल्या मतदारसंघापुरतेच पूरस्थिती पाहत बसले आहेत. भादोले ते शिगाव पाणी तुंबूंन शेती बुडाली आहे; पण आमदार, खासदार इकडे फिरकलेला नाही, हा प्रश्न लवकर सोडवला नाही तर शेतकरी मंत्र्यांच्या गाड्या फोडतील.

शिवाजी माने, अध्यक्ष जय शिवराय किसान संघटना.

.........

भादोले ते शिगाव रस्ता उंच केल्याने शिगावमध्ये ८५० फूट पाणी आत आले आहे. २०१९ मध्ये ३० टक्के गाव उठले होते. यंदा ८० टक्के गाव स्थलांतर झाले आहे. तसेच ७० टक्के शेती पाण्याखाली आहे. रस्ता वाढल्याने आमचे वाटोळे झाले आहे.

निवास पाटील, शेतकरी शिगाव

.........

हा रस्ता करीत असताना आम्ही तीन ठिकाणी मोरी बांधण्याचा प्रयत्न केला, पण तेथील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने जागा बदलावी लागली. तसेच येथे नाले नसल्याने पाणी जास्त वेळ साठून राहत आहे. जर तशी मागणी केली तर आणखी दोन ठिकाणी मोरी बांधण्यास आम्ही तयार आहोत.

जी. आर. टेपाळे, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग