शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

करवीर पश्चिम भागात रस्त्यांची दुरवस्था

By admin | Updated: January 23, 2015 00:47 IST

पंतप्रधान सडक योजना थंडावली : निधीअभावी डांबरीकरण, रुंदीकरण नाही

सावरवाडी : केंद्र शासनाच्या शासकीय निधीचा अभाव, रस्त्यांच्या दुरुस्तीकडे खासदारांचे झालेले दुर्लक्ष, पंतप्रधान सडक योजनांचे थंडावलेले काम, दळणवळणाच्या साधनांचा अभाव, डांबरीकरण व खडीकरणांची ठप्प झालेली कामे, या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांची मोठी दुरवस्था निर्माण झाली.रस्त्यांमध्ये प्रचंड स्वरूपाचे खड्डे पडल्याने ग्रामीण वाहतूक ठप्प होऊ लागली आहे. रस्ते दुरुस्तीची कामेही थंडावली आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था सध्या बिकट झाली आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’, अशी अवस्था आहे. ग्रामीण भागात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची ऊस वाहतूक जोरदार सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मोरीची बांधकामेही रेंगाळलेल्या अवस्थेत आहेत. नागमोडी वळणे आहेत, तेथे सूचना फलक नाहीत. साईडपट्ट्यांचे कामही थांबले आहे.करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात उत्तर व दक्षिण दिशेला वाहतुकीसाठी मोठ्या रस्त्यांचे प्रकल्पही शासनदरबारी धूळ खात पडले आहेत. शासकीय निधीअभावी मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण झालेले नाही. रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने ग्रामीण वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यातच रस्त्यावर उसाचा पाला टाकण्याचे प्रकार ग्रामीण भागात घडत असून, त्यामुळे अपघातची दाट शक्यता आहे. केंद्र शासनाकडून करवीर तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी गावागावांतील ग्रामस्थांतून होत आहे.तालुक्यातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. शासकीय निधी अल्प मिळत आहे. डोंगरी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आवाज उठविणार.- भिकाजी जाधव,-भाजप करवीर तालुका उपाध्यक्ष.