शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रस्त्याची अवस्था दयनीय

By admin | Updated: December 7, 2015 00:21 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : सहा वर्षांपूर्वी केली होती दुरुस्ती, उखडलेल्या रस्त्यामुळे ऊस वाहतुकीचे बैल जखमी

आबुब मुल्ला-- खोची -सहा वर्षांपूर्वी २५ लाख ४५ हजारांचा निधी वाठार-भादोले रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वापरला गेला. त्यानंतर भरीव निधीच रस्त्याला मिळालेला नाही. वाठार-भादोले या दोन्ही ग्रामपंचायतींनी यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला; परंतु सहकार्याचा हात न देता सर्वांनीच हात वर केले. त्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागायत जमिनीचे क्षेत्र आहे. रस्त्याच्या म्हणजे दोन्ही गावच्या सेंटरला भादोले गावच्या हद्दीलगत चांदोली वसाहत आहे. म्हणजे वाठार-चांदोली वसाहत-भादोले या गावांतील ग्रामस्थांची लोकप्रतिनिधींना निवडणुकीत मते हवी असतात. परंतु, त्यांच्याच मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा प्रत्यय रस्त्याच्या दशेवरून येतो. ऊस वाहतुकीमुळे रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण पडलेला आहे. उखडलेल्या खडीमुळे बैलगाडीतून ऊस वाहतूक करणाऱ्यांचे तर अतोनात हाल होत आहेत. बैलांचे पाय घसरणे, ठेच लागणे यामुळे ते जखमी होत आहेत. रस्ता उकरून खडी रस्त्यावर विखुरल्या आहेत. रस्त्यात आडव्या लांबलचक मोठ्या चरी आहेत. त्यामुळे दुचाकीपासून सर्व मोठ्या गाड्यांना चर-खड्डा, खडी चुकविताच येत नाही. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. प्रवाशांचे शारीरिक हाल होत आहेत. तालुक्यातील सर्वांत खराब रस्ता म्हणून प्रवासी प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.या महिन्यात ही अवस्था आहे. पावसाळ््यात प्रवास म्हणजे महासंकटच असते. २०१० मध्ये २५ लाख ४५ हजारांचा निधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्राप्त झाला. तो आठ महिन्यांत खर्च करण्यात आला. तेव्हा काहीसे चांगले दळणवळण होईल, अशी आशा वाटली, पण गेल्या तीन-चार वर्षांत रस्ताच खराब झाला आहे. तो त्वरित चांगला व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला आहे; परंतु या मागणीला दुर्लक्षित केले आहे. या मार्गावरून शेतकरीवर्गाची ये-जा जास्त आहे. हे जरी खरे असले तरी सांगली-कोल्हापूर या दोन्ही शहरांत जाण्या-येण्यासाठी हा कमी अंतराचा मार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडणारा हा रस्ता अत्यंत उपयुक्त आहे. जनतेच्या मागणीचा विचार करून हा रस्ता सुखकर प्रवासासाठी चांगला व्हावा, यासाठी अग्रक्रमाने लोकप्रतिनिधींनी निधी देणे गरजेचे आहे, अन्यथा याबाबत ग्रामस्थांकडून उद्रेक होईल. आंदोलनाचे मार्ग अवलंबिले जातील, अशी स्थिती आहे. वाठार हे राष्ट्रीय मार्गालगतचे हातकणंगले तालुक्यातील प्रमुख ठिकाण आहे. या ठिकाणाहून जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांत प्रवास करण्यासाठी असंख्य प्रवासी दररोज येतात. सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता होण्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे मागणी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य यांनी आश्वासन दिलेले आहे. रस्ता होण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. रस्ता नाही झाला, तर आंदोलन करावे लागेल.- काशीनाथ भोपळे, सरपंच, वाठार तर्फ वडगावया रस्त्याच्या कामांसाठी २५ लाखांचा निधी मिळावा म्हणून जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दाखल केला आहे. तातडीने सद्य:परिस्थिती लक्षात घेता रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. जनतेची मागणी योग्य असून, लोकप्रतिनिधी या नात्याने निधी देणारच. जानेवारीत कामाला सुरुवात होईल, अशी आशा आहे.- मंदा घाटगे, जिल्हा परिषद सदस्य.