शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते मूल्यांकन समिती अध्यादेशाचा ताकतुंबा

By admin | Updated: January 25, 2015 01:09 IST

कोल्हापूरचा टोलप्रश्न : ‘नगरविकास’ने पाठविली यादी सार्वजनिक बांधकामकडे

कोल्हापूर : शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या २२० कोटींच्या रस्त्यांचे फेरमूल्यांकन करण्याकरिता समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांची नावे निश्चित करून त्यांच्या नावांसह अशी समिती स्थापन होत असल्याचा अध्यादेश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाने काढावा म्हणून नगरविकास विभागाने निर्देश दिले आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याच ताब्यातील मंत्रालयाने अध्यादेश काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करणे म्हणजे हास्यास्पद असून, त्यामुळे दोन खात्यांतील ताकतुंबाही यानिमित्ताने पुढे आला आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान २१ डिसेंबरला कोल्हापूरच्या टोलसंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी समिती स्थापन करून ‘आयआरबी’ने केलेल्या रस्त्यांचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. या घटनेला तब्बल महिना उलटून गेला तरी अद्याप अशी समिती स्थापन करीत असल्याचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. अध्यादेश कोणी काढायचा या वादात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतरही समितीची स्थापना करण्याचे काम रखडले आहे. नगरविकास विभागाने या समितीत कोण असेल यांची नांवे निश्चित केली. त्यांची नावे घालून समिती स्थापन करण्यात येत असल्याचा अध्यादेश काढावा, असे पत्र दोन दिवसांपूर्वीच नगरविकास विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. वास्तविक, समिती स्थापन करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला असताना नगरविकास विभागाने यात पुढाकार घेऊन स्वत:च अध्यादेश काढायला हवा होता; पण तसे न करता त्यांनी आपली जबाबदारी झटकत त्याचे उत्तरदायित्व सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम) यांच्यावर सोपविले आहे. रस्ते प्रकल्पाचा करार हा आयआरबी व रस्ते महामंडळ यांच्यात झाला आहे व महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे आदेश कुणी काढायचा असा तिढा उपस्थित झाला आहे. समितीची घोषणा झाली तेव्हाच महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते; परंतु एक महिना झाला तरी अजून समितीचीच स्थापना झालेली नाही. यावरूनच सरकारची चालढकल तर दिसतेच; शिवाय ‘ठंडा करके खाओ’ अशी मानसिकताही दिसून येत आहे. शासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे रस्त्यांचे फेरमूल्यांकन केव्हा आणि कसे होणार? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. शिवसेना-भाजप निवांतच... विशेष म्हणजे अशी समिती स्थापन होऊन लवकरात लवकर रस्त्यांचे मूल्यांकन व्हावे, टोलबाबत निर्णय व्हावा, या दृष्टीने कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक शिवसेना, भाजपच्या आमदारांनीही कसलेच प्रयत्न केलेले नाहीत, ही बाबही पुढे आली आहे. शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळीही पालकमंत्र्यांनी या प्रश्नाला सरळसरळ बगलच दिली. (प्रतिनिधी)