शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

जोखमीचे काम, पण लईच कमी दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चोवीस तास अलर्ट, कोणत्याही आपत्तीशी लढण्याची तयारी, अत्यंत जोखमीचे काम, पण लईच कमी दाम. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चोवीस तास अलर्ट, कोणत्याही आपत्तीशी लढण्याची तयारी, अत्यंत जोखमीचे काम, पण लईच कमी दाम. सांगायलाही कमीपणा वाटावं इतकं ! कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील फायरमन्सची ही अवस्था आहे. सहा-सात वर्षे काम करुनही त्यांना सेवेत कायम करुन घेण्यास तसेच मानधनाची रक्कम वाढवून देण्यास प्रशासनाकडून उदासिनता दाखवली जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दल चोवीस तास कोणत्याही प्रकारच्या आपत्तीशी लढण्यास तयार असते. आगीसारख्या घटना असोत की महापुरातील अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम असो, आपत्तीवेळी अग्निशमनचे जवान तत्काळ घटनास्थळी जाऊन संपत्तीचे, जीवांचे रक्षण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. त्यांच्या कार्याला तोड नाही. महानगरपालिकेतील हा एकमेव विभाग आहे जो प्रामाणिक, तत्परतेने काम करत आहेे. परंतु, ठोक मानधनावरील फायरमन, चालकांना मिळणारे मानधन त्यांच्यात एकप्रकारचे नैराश्य आणणारे आहे.

अग्निशमन दलाकडे अधिकारी, फायरमन, चालक तसेच अन्य कर्मचारी मिळून १८५ पदे मंजूर आहेत. गेल्या काही वर्षांत नियमित सेवेतील जवळपास १३५ अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाले. पण त्यांच्या जागी नव्याने नियुक्त्या झाल्या नाहीत. एकूण उत्पन्नाच्या पस्तीस टक्केच प्रशासकीय खर्च असला पाहिजे, या शासकीय अटीचा फटका या विभागाला बसला आहे. शासकीय अटीमुळे प्रशासनाचे हात बांधले आहेत.

रिक्त जागा नव्याने भरल्या नाहीत म्हणून ठोक मानधनावर कर्मचारी नेमण्याचा मध्यमार्ग प्रशासनाने स्वीकारला. त्यानुसार चालकांना बारा हजार तर फायरमनना दहा हजार रुपये मानधन देण्यात येते. गेल्या सहा-सात वर्षांपासून १३५ कर्मचारी ठोक मानधनावर काम करत आहेत. त्यांचे मानधन वाढत नाही आणि सेवेतही कायम करुन घेतले जात नाही. त्यामुळे हे कर्मचारी विचित्र कात्रीत सापडले आहेत.

उद्या पालकमंत्री घेणार आढावा -

उद्या, शुक्रवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील महानगरपालिकेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत रोजंदारीवरील कर्मचारी, अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करणार आहेत. थेट पाईपलाईन योजनेचाही आढावा घेणार आहेत.

- किमान मरण्यापूर्वी कायम करा -

महानगरपालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या ३४९ इतकी आहे. यातील बहुसंख्य कर्मचारी २५ ते ३० वर्षे रोजंदारीवर काम करत आहेत. त्यांना अद्याप कायम केलेले नाही. किमान मरण्यापूर्वी तरी सेवेत काम करावे, अशी रोजंदारी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.