शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जोखमीचे काम, पण लईच कमी दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चोवीस तास अलर्ट, कोणत्याही आपत्तीशी लढण्याची तयारी, अत्यंत जोखमीचे काम, पण लईच कमी दाम. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चोवीस तास अलर्ट, कोणत्याही आपत्तीशी लढण्याची तयारी, अत्यंत जोखमीचे काम, पण लईच कमी दाम. सांगायलाही कमीपणा वाटावं इतकं ! कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील फायरमन्सची ही अवस्था आहे. सहा-सात वर्षे काम करुनही त्यांना सेवेत कायम करुन घेण्यास तसेच मानधनाची रक्कम वाढवून देण्यास प्रशासनाकडून उदासिनता दाखवली जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दल चोवीस तास कोणत्याही प्रकारच्या आपत्तीशी लढण्यास तयार असते. आगीसारख्या घटना असोत की महापुरातील अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम असो, आपत्तीवेळी अग्निशमनचे जवान तत्काळ घटनास्थळी जाऊन संपत्तीचे, जीवांचे रक्षण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. त्यांच्या कार्याला तोड नाही. महानगरपालिकेतील हा एकमेव विभाग आहे जो प्रामाणिक, तत्परतेने काम करत आहेे. परंतु, ठोक मानधनावरील फायरमन, चालकांना मिळणारे मानधन त्यांच्यात एकप्रकारचे नैराश्य आणणारे आहे.

अग्निशमन दलाकडे अधिकारी, फायरमन, चालक तसेच अन्य कर्मचारी मिळून १८५ पदे मंजूर आहेत. गेल्या काही वर्षांत नियमित सेवेतील जवळपास १३५ अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाले. पण त्यांच्या जागी नव्याने नियुक्त्या झाल्या नाहीत. एकूण उत्पन्नाच्या पस्तीस टक्केच प्रशासकीय खर्च असला पाहिजे, या शासकीय अटीचा फटका या विभागाला बसला आहे. शासकीय अटीमुळे प्रशासनाचे हात बांधले आहेत.

रिक्त जागा नव्याने भरल्या नाहीत म्हणून ठोक मानधनावर कर्मचारी नेमण्याचा मध्यमार्ग प्रशासनाने स्वीकारला. त्यानुसार चालकांना बारा हजार तर फायरमनना दहा हजार रुपये मानधन देण्यात येते. गेल्या सहा-सात वर्षांपासून १३५ कर्मचारी ठोक मानधनावर काम करत आहेत. त्यांचे मानधन वाढत नाही आणि सेवेतही कायम करुन घेतले जात नाही. त्यामुळे हे कर्मचारी विचित्र कात्रीत सापडले आहेत.

उद्या पालकमंत्री घेणार आढावा -

उद्या, शुक्रवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील महानगरपालिकेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत रोजंदारीवरील कर्मचारी, अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करणार आहेत. थेट पाईपलाईन योजनेचाही आढावा घेणार आहेत.

- किमान मरण्यापूर्वी कायम करा -

महानगरपालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या ३४९ इतकी आहे. यातील बहुसंख्य कर्मचारी २५ ते ३० वर्षे रोजंदारीवर काम करत आहेत. त्यांना अद्याप कायम केलेले नाही. किमान मरण्यापूर्वी तरी सेवेत काम करावे, अशी रोजंदारी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.