शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गुळाला ‘शुगर’चा धोका हायड्रोस पावडरचा अतिरेक : कर्नाटकातील साखर मिश्रणाचे लोण कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:01 IST

कोल्हापूर : गुळाचा रंग व गोडी वाढवून कोल्हापुरी गुळाला टक्कर देण्यासाठी कर्नाटकातील विशेषत: सीमाभागातील गुºहाळमालकांनी उसाच्या रसात साखर मिसळण्यास सुरुवात केली.

कोल्हापूर : गुळाचा रंग व गोडी वाढवून कोल्हापुरी गुळाला टक्कर देण्यासाठी कर्नाटकातील विशेषत: सीमाभागातील गुºहाळमालकांनी उसाच्या रसात साखर मिसळण्यास सुरुवात केली. त्याचे लोण आता कोल्हापुरात पसरले असून बहुतांशी गुºहाळघरांवर कमी-अधिक प्रमाणात साखर व हायड्रोस पावडरचा वापर सुरू झाल्याने मूळ कोल्हापुरी गुळाचे गुणधर्म कमी होत आहेत.

परिणामी, शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेली गुळाची बाजारपेठ काहीशी बदनाम झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यापासूनच उसाचे मुबलक पीक आहे. साखर कारखानदारी सुरू व्हायची होती, त्यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपºयांत गुºहाळघरे सुरू होती. गुळाचे उत्पादन व्हायचे पण त्याला बाजारपेठ नसल्याने राजर्षी शाहू महाराज यांनी गुळाची बाजारपेठ वसवली. मुळात येथील मातीतच कसदारपणा असल्याने कोल्हापुरी गुळाने सातासमुद्रापार भुरळ घातली.

रासायनिक खतांचा वापर अत्यल्प होता. शेणखत, गावतलावातील गाळाचा वापर करून त्यावर पिके घेतली जात असल्याने प्रत्येक पिकात एक वेगळाच कसदारपणा असायचा. त्यामुळे पिवळाधमक व कणीदार गुळाने गुजरातची बाजारपेठेवर आपली हुकूमत गाजवली. गेली अनेक वर्षे ‘कोल्हापुरी गूळ’ म्हटले की ग्राहकांच्या उड्या पडतात. त्यामुळे कोल्हापुरीचा ब्रॅँड आजही देश-विदेशातील मार्केटमध्ये प्रसिद्ध आहे.

कोल्हापूरसह सातारा, सांगली व कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात गुळाचे उत्पादन घेतले जाते. कणीदार गुळामुळे मार्केटमध्ये कोल्हापुरी गुळाला मागणी अधिक राहिली. त्यामुळे येथील गुळाला गुजरातच्या बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी सांगली व कर्नाटकातील गूळ उत्पादकांनी साखरमिश्रित गूळ निर्मिती करण्यास सुरुवात केली. ४० टक्के उसाचा रस व ६० टक्के साखरमिश्रित केल्याने गुळाची गोडी वाढते. त्याचबरोबर हायड्रोस पावडरचे प्रमाणही वाढविल्याने पांढराशुभ्र गूळ तयार होतो.

या गुळापुढे साखरविरहित कोल्हापुरी गूळ फिका पडत आहे. त्यामुळेच येथील उत्पादकांनी साखर वापरण्यास सुरुवात केली आहे. साधारणत: जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. या भेसळीमुळे ‘शाहूं’नी वसवलेल्या बाजारपेठेची बदनामी सुरू झाली आहे. ही बदनामी थांबविण्यासाठी साखरविरहित गूळनिर्मिती करणे गरजेचे आहे.गोडी वाढली पण टिकाऊपणा गेलासाखरमिश्रित गुळाची गोडी वाढली, पण त्याचा टिकाऊपणा गेला. गुजरातमधील व्यापारी गुळाची खरेदी करून तो शीतगृहात ठेवतात; पण साखरमिश्रित गुळाला पाणी सुटत असल्याने व्यापाºयांचे नुकसान होऊ लागले आहे. त्याचा परिणाम दरावर झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. 

आम्ही शंभर टक्के उसाच्या रसापासून गूळ निर्मिती करतो, पण कर्नाटकसह सांगली जिल्ह्यातून साखरमिश्रित गूळ येत असल्याने आमच्या गुळाला मार बसत आहे. प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी दर कमी मिळत आहे. साखरमिश्रित गूळनिर्मिती सुरूच राहिली तर शाहूंची बाजारपेठ टिकणे कठीण होईल.- दादासाहेब पाटीलगूळ उत्पादक, निगवे दुमाला

गुळास प्रतिक्विंटल १२०० रुपये अनुदान द्यावेबाजार समिती: चंद्रकांतदादांकडे मागणीकोल्हापूर : गुळाचे दर घसरल्याने जिल्ह्यातील गूळ उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून राज्य सरकारने गुळास प्रतिक्विंटल १२०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोमवारी केली.सध्या गूळ उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आहे. बेभरवशाच्या दराने जिल्ह्यातील शेकडो गुºहाळघरे बंद झाली आहेत. या व्यवसायाला सावरण्यासाठी सरकारने आता पुढाकार घेण्याची गरज आहे. कांद्याचे दर घसरले त्यावेळी सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५० व १०० रुपये याप्रमाणे अनुदान दिले होते. त्याप्रमाणे गुळाला १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांच्याकडे केली.गुळास प्रतिक्विंटल १२०० रुपये अनुदान द्यावे माध्यमातून गूळ खरेदी केली होती. त्याच धर्तीवर यावेळीही सरकारने धोरण अवलंबावे. शालेय पोषण आहारात समावेश केल्यास मागणी वाढून दर चांगला मिळेल, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.समितीचे सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे, संचालक परशराम खुडे, विलास साठे, भगवान काटे, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सालपे, गुºहाळमालक शिवाजी पाटील, रंगराव वरपे, आदम मुजावर, श्रीकांत घाटगे, दादासाहेब पाटील आदी उपस्थित होते.गुळाच्या प्रश्नाबाबत लवकरच बैठक घेऊन काही तरी मार्ग काढला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.