शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

‘रिंग रोड’प्रश्नी तोडग्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 13, 2015 23:51 IST

गडहिंग्लजमध्ये संयुक्त बैठक : तात्पुरत्या रहदारीस शेतकऱ्यांची सहमती

गडहिंग्लज : मे महिन्यात होणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्याबरोबरच अनेक वर्षांपासून प्रलंबित रिंग रोडप्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न संयुक्त बैठकीत झाला. याप्रश्नी अंतिम तोडगा निघेपर्यंत यात्रा कालावधीत आपल्या खासगी शेतजमिनीतून तात्पुरत्या रहदारीसाठी रस्ता खुला करण्यास संबंधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी सहमती दर्शविली.उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या शाहू सभागृहात ही बैठक झाली. नगररचना विभागाचे सहायक संचालक संजय चव्हाण, सहायक नगररचनाकार रा. पा. पाटील, मुख्याधिकारी तानाजी नरळे, नगरअभियंता रमेश पाटील, यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुमारे ३० वर्षांपासून रिंगरोडचा प्रश्न प्रलंबित आहे. संकेश्वर रोड ते भडगाव रोड आणि कडगाव रोड ते आजरा रोड जोडणारा वळण रस्ता काही शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतून जात असल्यामुळे त्यांचा त्यास विरोध आहे. संबंधित शेतकरी शेखर पाटील, महेश पाटील व राजू पाटील यांच्यासह पाटीलमंडळी बैठकीस उपस्थित होते.रिंगरोडमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना द्यावी लागणारी नुकसानभरपाई आणि विकास हक्क हस्तांतरण याबाबत सविस्तर चर्चा झाली. सार्वजनिक हितासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती शेतकऱ्यांना करण्यात आली. मात्र, योग्य भरपाई मिळाल्याशिवाय रस्त्यासाठी जमीन न देण्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिले. तथापि, श्री महालक्ष्मी यात्रा कालावधीतील संभाव्य वाहतुकीची कोंडी दूर होण्यासाठी पालिकेला व यात्रा समितीला सहकार्य म्हणून आपल्या शेतातून जाणारा रस्ता तात्पुरता खुला करण्याची तयारी संबंधित शेतकऱ्यांनी दाखवली. बैठकीस यात्रा समिती उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, सहसचिव चंद्रकांत सावंत, नगरसेवक रामदास कुराडे, हारूण सय्यद, राहुल घुगरे आदींसह नागरिक उपस्थित होते.