शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वारणेचे हक्काचे पाणी मिळविणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:24 IST

इचलकरंजी : फसवेगिरी करणाऱ्या पुढाºयांच्या नादाला लागून वारणाकाठच्या नागरिकांनी पाण्याला नाही म्हणण्याचे पाप करू नये. त्यांचा नाद सोडून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करीत इचलकरंजीसाठी वारणा नदीतून हक्काचे पाणी मिळविणारच. त्यासाठी पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. साशमवारचा मोर्चा हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही ...

इचलकरंजी : फसवेगिरी करणाऱ्या पुढाºयांच्या नादाला लागून वारणाकाठच्या नागरिकांनी पाण्याला नाही म्हणण्याचे पाप करू नये. त्यांचा नाद सोडून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करीत इचलकरंजीसाठी वारणा नदीतून हक्काचे पाणी मिळविणारच. त्यासाठी पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. साशमवारचा मोर्चा हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिला.शासनाच्या अमृत योजनेंतर्गत वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी वारणाकाठावरील नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी इचलकरंजीतील सर्वपक्षीय नेत,े तसेच नागरिकांनी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. पाण्यासाठी मोर्चामध्ये हजारो नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले.सुरुवातीला काविळीच्या साथीमध्ये बळी ठरलेल्या ४० नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.मोर्चासमोर बोलताना हाळवणकर म्हणाले, एखादा पुढारी उठतोय आणि पाणी नाही म्हणण्याचं पाप करतोय. चार लाख लोकसंख्या असलेल्या शहराला पाणी नाही म्हणणाºयांचा नायनाट होईल. गावकºयांनी त्यांचा नाद सोडावा आणि आम्हाला पाणी द्यावे. इचलकरंजीकरांच्या शांततेला नामुष्की समजू नये. प्रसंग पडल्यास कुदळ-फावडे आणि मागाचा लाकडी मारा घेऊन वारणा योजनेच्या भूमिपूजनाला दानोळीत आल्याशिवाय राहणार नाही. तरी आमचा अंत पाहू नका.नगराध्यक्षा अलका स्वामी म्हणाल्या, इचलकरंजीवासीयांना पाणी-पाणी करायला लावू नका. वारणा नदीतील पिण्यासाठी म्हणून आरक्षित असलेल्या पाण्यातील हक्काचे पाणी आम्ही मागत आहोत आणि ते मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही. पंचगंगा व कृष्णा नदी प्रदूषित झाली असल्याने इचलकरंजी शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड आम्हाला परवडणारी नाही. दूषित पाण्यामुळे सुमारे चाळीस हजार नागरिकांना काविळीची लागण झाली. त्यामध्ये चाळीस नागरिक मृत्युमुखी पडले. या सर्वांचा गांभीर्याने विचार करूनच शासनाने योजना मंजूर केली आहे. त्यामुळे हक्काचे पाणी आम्ही मिळविणारच.माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, वारणेच्या पाण्यावर आमचा हक्क आहे. तो हक्क कसा बनतो, याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. पाण्यासाठी आमची नेहमी संयमाची भूमिका आहे. गरज पडल्यास संघर्षाची तयारीही आहे. कृष्णा नदीतून पाणी आणताना विरोध होता, तो झुगारून योजना राबविली. आता तर राजकारण विसरून एकत्र आलो आहोत. त्यामुळे वारणेतील पाणी आणणारच, असा निर्धार व्यक्त केला.यावेळी मदन कारंडे, दत्ता माने, पाणीपुरवठा सभापती नितीन जांभळे, अजित जाधव, आदींची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी वारणा नदीतून पाणी मिळालेच पाहिजे, असा निर्धार व्यक्त केला. उपनगराध्यक्षा सरिता आवळे यांनी मोर्चात सहभागी झालेल्या शहरवासीयांचे आभार मानले.