शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

टंचाईग्रस्त गावात टॅँकर मंजूरीचे अधिकार आता तहसिलदारांना : चंद्रकांतदादा

By admin | Updated: April 24, 2017 19:16 IST

७४ गावात टंचाई निवारणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २४ : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात टॅँकर मंजूरीचे अधिकार तहसिलदारांना देण्यात आले आहेत. टॅँकरबाबत खर्चाची माहिती त्यांनी शासनाकडे पाठवायची आहे. याबाबतचा शासननिर्णय काढण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील ७४ टंचाईग्रस्त गावात टंचाई निवारणीसाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती दिली. शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहामध्ये ग्रामीण भागातील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा व उपाययोजना बाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री उल्हास पाटील, अमल महाडिक, सुजित मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कायर्कारी अधिकारी इंद्रजित देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उप जिल्हाधिकारी (रोहयो)विजयसिंह देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर पालकमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील ७४ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील ५, भुदरगडमधील १८, चंदगडमधील २३, गडहिंग्लजमधील ४, हातकणंगलेमधील ९, राधानगरीमधील १० आणि शिरोळमधील ५ गावांमध्ये टंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये ९ प्रकारची कामे केली जाणार असून सध्या करावयाच्या २७१ कामांचे नियोजन केले आहे. गावांमधील पाणीसाठयात वाढ करणे, भुजल अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे, पाण्याचे मागणी व्यवस्थापन स्थानिकस्तरावर करणे, यामाध्यमातून टंचाई कालावधीत सार्वजनिक विहिर खोल करणे, गाळ काढणे, खाजगी विहरी अधिग्रहण करणे, प्रगतीवरील नळ योजना शिघ्रगतीने पूर्ण करणे, नवीन विंधन विहरी घेणे, विंधन विहरींची दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तीकरणे आणि टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करणे आदी उपाय योजना करण्यात येणार आहेत. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून तात्काळ टँकर चालू करावा, तसेच जी गावे अद्यापही टंचाईग्रस्त घोषित होणे आवश्यक आहेत त्या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी जावून सर्व्हे करावा व तशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच महानगरपालिका व नगरपालिकांनीही पाण्याचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचनाही त्यांनी दिला.त्याचबरोबर यामध्ये लोकप्रतिनिधींनीही जागरुकता दाखवून अर्धवेळ नाही तर पूर्ण वेळ काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात ८४४.४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध जिल्ह्यात ४ मोठे, ९ मध्यम आणि ५३ लघू असे एकूण ६६ पाटबंधारे प्रकल्प असून त्यामध्ये मोठ्या प्रकल्पांमध्ये ५५८.१०, मध्यम प्रकल्पांमध्ये १९५.८६ तर लघू प्रकल्पांमध्ये ६०.५३ असा एकूण ८४४.४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात टंचाई आराखड्यामध्ये १०० गावांचा समावेश असून १७१ वाडया आहेत. टंचाईग्रस्त सुमारे १८०९३६ लोकसंख्येसाठी २ कोटी रुपये खर्चाची २७२ कामे हाती घेण्यात आली आहेत. आॅक्टोबर २०१६ ते जून २०१७ अखेर आजरा तालुक्यातील ७ गावे व १६ वाड्या, भुदरगडमधील १६ गावे व ३६ वाडया, चंदगडमधील १३ गावे व ११ वाडया, गडहिंग्लजमधील २६ गावे आणि ७ वाडया, गगनबावड्यातील ३ वाडया, हांतकणंगलेतील ९गावे १५ वाडया, करवीरमधील २ गावे व १ वाडी, कागलमधील १ गाव १६ वाडया, पन्हाळयातील ११ गावे आणि १० वाडया, राधानगरीतील ६ गावे आणि ३१ वाडया, शाहूवाडीतील ५ गावे व ११ वाडया, शिरोळमधील ४ गावे १४ वाड्यांचा समावेश आहे.