शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त गावात टॅँकर मंजूरीचे अधिकार आता तहसिलदारांना : चंद्रकांतदादा

By admin | Updated: April 24, 2017 19:16 IST

७४ गावात टंचाई निवारणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २४ : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात टॅँकर मंजूरीचे अधिकार तहसिलदारांना देण्यात आले आहेत. टॅँकरबाबत खर्चाची माहिती त्यांनी शासनाकडे पाठवायची आहे. याबाबतचा शासननिर्णय काढण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील ७४ टंचाईग्रस्त गावात टंचाई निवारणीसाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती दिली. शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहामध्ये ग्रामीण भागातील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा व उपाययोजना बाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री उल्हास पाटील, अमल महाडिक, सुजित मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कायर्कारी अधिकारी इंद्रजित देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उप जिल्हाधिकारी (रोहयो)विजयसिंह देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर पालकमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील ७४ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील ५, भुदरगडमधील १८, चंदगडमधील २३, गडहिंग्लजमधील ४, हातकणंगलेमधील ९, राधानगरीमधील १० आणि शिरोळमधील ५ गावांमध्ये टंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये ९ प्रकारची कामे केली जाणार असून सध्या करावयाच्या २७१ कामांचे नियोजन केले आहे. गावांमधील पाणीसाठयात वाढ करणे, भुजल अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे, पाण्याचे मागणी व्यवस्थापन स्थानिकस्तरावर करणे, यामाध्यमातून टंचाई कालावधीत सार्वजनिक विहिर खोल करणे, गाळ काढणे, खाजगी विहरी अधिग्रहण करणे, प्रगतीवरील नळ योजना शिघ्रगतीने पूर्ण करणे, नवीन विंधन विहरी घेणे, विंधन विहरींची दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तीकरणे आणि टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करणे आदी उपाय योजना करण्यात येणार आहेत. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून तात्काळ टँकर चालू करावा, तसेच जी गावे अद्यापही टंचाईग्रस्त घोषित होणे आवश्यक आहेत त्या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी जावून सर्व्हे करावा व तशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच महानगरपालिका व नगरपालिकांनीही पाण्याचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचनाही त्यांनी दिला.त्याचबरोबर यामध्ये लोकप्रतिनिधींनीही जागरुकता दाखवून अर्धवेळ नाही तर पूर्ण वेळ काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात ८४४.४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध जिल्ह्यात ४ मोठे, ९ मध्यम आणि ५३ लघू असे एकूण ६६ पाटबंधारे प्रकल्प असून त्यामध्ये मोठ्या प्रकल्पांमध्ये ५५८.१०, मध्यम प्रकल्पांमध्ये १९५.८६ तर लघू प्रकल्पांमध्ये ६०.५३ असा एकूण ८४४.४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात टंचाई आराखड्यामध्ये १०० गावांचा समावेश असून १७१ वाडया आहेत. टंचाईग्रस्त सुमारे १८०९३६ लोकसंख्येसाठी २ कोटी रुपये खर्चाची २७२ कामे हाती घेण्यात आली आहेत. आॅक्टोबर २०१६ ते जून २०१७ अखेर आजरा तालुक्यातील ७ गावे व १६ वाड्या, भुदरगडमधील १६ गावे व ३६ वाडया, चंदगडमधील १३ गावे व ११ वाडया, गडहिंग्लजमधील २६ गावे आणि ७ वाडया, गगनबावड्यातील ३ वाडया, हांतकणंगलेतील ९गावे १५ वाडया, करवीरमधील २ गावे व १ वाडी, कागलमधील १ गाव १६ वाडया, पन्हाळयातील ११ गावे आणि १० वाडया, राधानगरीतील ६ गावे आणि ३१ वाडया, शाहूवाडीतील ५ गावे व ११ वाडया, शिरोळमधील ४ गावे १४ वाड्यांचा समावेश आहे.