शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

टंचाईग्रस्त गावात टॅँकर मंजूरीचे अधिकार आता तहसिलदारांना : चंद्रकांतदादा

By admin | Updated: April 24, 2017 19:16 IST

७४ गावात टंचाई निवारणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २४ : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात टॅँकर मंजूरीचे अधिकार तहसिलदारांना देण्यात आले आहेत. टॅँकरबाबत खर्चाची माहिती त्यांनी शासनाकडे पाठवायची आहे. याबाबतचा शासननिर्णय काढण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील ७४ टंचाईग्रस्त गावात टंचाई निवारणीसाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती दिली. शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहामध्ये ग्रामीण भागातील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा व उपाययोजना बाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री उल्हास पाटील, अमल महाडिक, सुजित मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कायर्कारी अधिकारी इंद्रजित देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उप जिल्हाधिकारी (रोहयो)विजयसिंह देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर पालकमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील ७४ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील ५, भुदरगडमधील १८, चंदगडमधील २३, गडहिंग्लजमधील ४, हातकणंगलेमधील ९, राधानगरीमधील १० आणि शिरोळमधील ५ गावांमध्ये टंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये ९ प्रकारची कामे केली जाणार असून सध्या करावयाच्या २७१ कामांचे नियोजन केले आहे. गावांमधील पाणीसाठयात वाढ करणे, भुजल अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे, पाण्याचे मागणी व्यवस्थापन स्थानिकस्तरावर करणे, यामाध्यमातून टंचाई कालावधीत सार्वजनिक विहिर खोल करणे, गाळ काढणे, खाजगी विहरी अधिग्रहण करणे, प्रगतीवरील नळ योजना शिघ्रगतीने पूर्ण करणे, नवीन विंधन विहरी घेणे, विंधन विहरींची दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तीकरणे आणि टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करणे आदी उपाय योजना करण्यात येणार आहेत. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून तात्काळ टँकर चालू करावा, तसेच जी गावे अद्यापही टंचाईग्रस्त घोषित होणे आवश्यक आहेत त्या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी जावून सर्व्हे करावा व तशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच महानगरपालिका व नगरपालिकांनीही पाण्याचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचनाही त्यांनी दिला.त्याचबरोबर यामध्ये लोकप्रतिनिधींनीही जागरुकता दाखवून अर्धवेळ नाही तर पूर्ण वेळ काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात ८४४.४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध जिल्ह्यात ४ मोठे, ९ मध्यम आणि ५३ लघू असे एकूण ६६ पाटबंधारे प्रकल्प असून त्यामध्ये मोठ्या प्रकल्पांमध्ये ५५८.१०, मध्यम प्रकल्पांमध्ये १९५.८६ तर लघू प्रकल्पांमध्ये ६०.५३ असा एकूण ८४४.४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात टंचाई आराखड्यामध्ये १०० गावांचा समावेश असून १७१ वाडया आहेत. टंचाईग्रस्त सुमारे १८०९३६ लोकसंख्येसाठी २ कोटी रुपये खर्चाची २७२ कामे हाती घेण्यात आली आहेत. आॅक्टोबर २०१६ ते जून २०१७ अखेर आजरा तालुक्यातील ७ गावे व १६ वाड्या, भुदरगडमधील १६ गावे व ३६ वाडया, चंदगडमधील १३ गावे व ११ वाडया, गडहिंग्लजमधील २६ गावे आणि ७ वाडया, गगनबावड्यातील ३ वाडया, हांतकणंगलेतील ९गावे १५ वाडया, करवीरमधील २ गावे व १ वाडी, कागलमधील १ गाव १६ वाडया, पन्हाळयातील ११ गावे आणि १० वाडया, राधानगरीतील ६ गावे आणि ३१ वाडया, शाहूवाडीतील ५ गावे व ११ वाडया, शिरोळमधील ४ गावे १४ वाड्यांचा समावेश आहे.