शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

जंगलावर वननिवासींचाच अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

पेरणोली : जंगल हक्क कायदा पूर्वजांचा वारसा जोपासणारा आहे. वननिवासींच्या वास्तव्यामुळेच जंगलसमृद्धी झाली आहे; त्यामुळे कायद्यानुसार जंगलावर वननिवासींचाच अधिकार ...

पेरणोली : जंगल हक्क कायदा पूर्वजांचा वारसा जोपासणारा आहे. वननिवासींच्या वास्तव्यामुळेच जंगलसमृद्धी झाली आहे; त्यामुळे कायद्यानुसार जंगलावर वननिवासींचाच अधिकार असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक व संशोधन विभागाचे प्रमुख प्रा. अविनाश भोले यांनी केले. खानापूर (जि. बेळगाव) येथे वनहक्क संघर्ष समितीतर्फे 'वनहक्क व जमीन कायदा' या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

प्रा. भाले म्हणाले, डंगे धनगर, सिद्दी समाज, आदी वननिवासींनी जंगलसमृद्धीची परंपरा कायम ठेवली आहे. त्यानुसार केंद्र शासनाने वननिवासींच्या बाजूने कायदा केला आहे. कायद्यानुसार सांस्कृतिक, रूढी, परंपरा, देवस्थान यात्रा करू शकता. सामुदायिक व वैयक्तिक दावे करू शकता व शाळा सुरू करू शकता.

कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामसभा व वनहक्क समिती महत्त्वाची आहे. कॉ. संपत देसाई म्हणाले, ही लढाई जिंकण्यासाठी संयम आवश्यक आहे. कायदा हे शस्त्र आहे. कायदा आपल्या बाजूने आहे. या शस्त्राचा वापर लढा यशस्वी करण्यासाठी करूया.

यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या धनश्री सरदेसाई, अ‍ॅड. दिलीप नाईक, अभिजित सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रणजित कालेकर, कृष्णा सावंत यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी : खानापूर (जि. बेळगाव) येथील जंगल हक्क व जमीन कायदा कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करताना महादेव मरगळे. यावेळी अविनाश भाले, कॉ. संपत देसाई, अ‍ॅड. दिलीप नाईक, धनश्री सरदेसाई, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २२०४२०२१-गड-०२