शहरं
Join us  
Trending Stories
1
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
2
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
3
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
4
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
5
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
6
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
7
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
8
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
9
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
10
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
11
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
12
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
13
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
14
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
15
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
16
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
17
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
18
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
19
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
20
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!

जंगलावर वननिवासींचाच अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

पेरणोली : जंगल हक्क कायदा पूर्वजांचा वारसा जोपासणारा आहे. वननिवासींच्या वास्तव्यामुळेच जंगलसमृद्धी झाली आहे; त्यामुळे कायद्यानुसार जंगलावर वननिवासींचाच अधिकार ...

पेरणोली : जंगल हक्क कायदा पूर्वजांचा वारसा जोपासणारा आहे. वननिवासींच्या वास्तव्यामुळेच जंगलसमृद्धी झाली आहे; त्यामुळे कायद्यानुसार जंगलावर वननिवासींचाच अधिकार असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक व संशोधन विभागाचे प्रमुख प्रा. अविनाश भोले यांनी केले. खानापूर (जि. बेळगाव) येथे वनहक्क संघर्ष समितीतर्फे 'वनहक्क व जमीन कायदा' या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

प्रा. भाले म्हणाले, डंगे धनगर, सिद्दी समाज, आदी वननिवासींनी जंगलसमृद्धीची परंपरा कायम ठेवली आहे. त्यानुसार केंद्र शासनाने वननिवासींच्या बाजूने कायदा केला आहे. कायद्यानुसार सांस्कृतिक, रूढी, परंपरा, देवस्थान यात्रा करू शकता. सामुदायिक व वैयक्तिक दावे करू शकता व शाळा सुरू करू शकता.

कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामसभा व वनहक्क समिती महत्त्वाची आहे. कॉ. संपत देसाई म्हणाले, ही लढाई जिंकण्यासाठी संयम आवश्यक आहे. कायदा हे शस्त्र आहे. कायदा आपल्या बाजूने आहे. या शस्त्राचा वापर लढा यशस्वी करण्यासाठी करूया.

यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या धनश्री सरदेसाई, अ‍ॅड. दिलीप नाईक, अभिजित सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रणजित कालेकर, कृष्णा सावंत यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी : खानापूर (जि. बेळगाव) येथील जंगल हक्क व जमीन कायदा कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करताना महादेव मरगळे. यावेळी अविनाश भाले, कॉ. संपत देसाई, अ‍ॅड. दिलीप नाईक, धनश्री सरदेसाई, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २२०४२०२१-गड-०२