शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बससह रिक्षाही जागेवरच ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST

कोल्हापूर : आठ दिवसांच्या लाॅकडाऊनमुळे रविवारपासून कोल्हापुरातून बाहेर जिल्ह्यासह परराज्यात होणारी खासगी आराम बस वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली ...

कोल्हापूर : आठ दिवसांच्या लाॅकडाऊनमुळे रविवारपासून कोल्हापुरातून बाहेर जिल्ह्यासह परराज्यात होणारी खासगी आराम बस वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणारी रिक्षा वाहतूकही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे सुमारे ५०० खासगी बस व जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक रिक्षा व्यवसाय ठप्प झाला.

जिल्ह्यातून नियमित पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आदी मार्गावर सुमारे ५०० हून अधिक खासगी बस रोज धावत होत्या. मात्र, पहिल्या लाॅकडाऊननंतर त्यात घट झाली. सद्य:स्थितीतही केवळ ६० बस शनिवारी रात्रीपर्यंत बाहेर जात होत्या. मात्र, त्यांनतर पुन्हा आठ दिवसांसाठी जिल्ह्यात पूर्णपणे लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही वाहतूक पूर्णपणे बंद झाली. शनिवारी रात्री दोन खासगी बस पुण्याकडे रवाना होणार होत्या. मात्र, त्यातील १२ जणांना प्रशासनाने योग्य कारण नसल्यामुळे ई-पास नाकारला. त्यामुळे याही बस रद्द करण्यात आल्या.

जिल्ह्यात एस.टी.सह, खासगी प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यावर निर्भर असणारा रिक्षा व्यवसायही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे रविवारी संपूर्ण दिवस मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकही रिक्षा दिसली नाही. दरम्यान कोल्हापूर रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी महाराष्ट्र एक्स्प्रेस आल्यानंतर त्यातून उतरलेल्या प्रवाशांना घरापर्यंत जाण्यासाठी एकही वाहन मिळाले नाही. अनेकांना पायी प्रवास करावा लागला. तर ज्यांना ग्रामीण भागात जायचे होते, असे ई-पास धारकही नातेवाइकांची वाट पाहत होते.

खासगी बस व्यवसायावर हजारो जण निर्भर

जिल्ह्यात २५०० हून अधिक खासगी बस आहेत. त्यापैकी पहिल्या लाॅकडाऊननंतर रस्त्यावर केवळ ५०० च्या आसपास धावत आहेत. अन्य बस व्यावसायिकांना बँकांसह विमा, चालक पगार, देखभाल दुरुस्ती आदी खर्च परवडेनासा झाला आहे. त्यामुळे त्यांना हा व्यवसायाच बंद केला आहे. या व्यवसायावर १५०० हून अधिक मेकॅनिक, तर २०० हून अधिक ऑटोमोबाइल दुकाने, टायर व्यावसायिक, डिझेल पंपचालक आदी अवलंबून आहेत. असा हजारो जणांचा संसार या व्यवसायावर निर्भर आहे. कोल्हापुरातील या बस बंदमुळे व्यावसायिकांना सुमारे ३ कोटींचा फटका बसणार आहे.

प्रतिक्रिया

जवळचा नातेवाईक मृत झाल्यानंतर किंवा परदेशात फ्लाइट असतानाही योग्य कारण नसल्याचे सांगून ई-पास नाकारला जात आहे. त्यात बसनाही परवानगी नाही. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. याचा विचार शासनाने करणे जरूरीचे आहे.

-महेश गोवेकर, उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा कार ऑपरेटर्स असोसिएशन

प्रतिक्रिया

रिक्षा व्यावसायिकांना अटी, शर्तीवर शहरातून अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देणे गरजेचे होते. रेल्वेतून आलेल्या प्रवाशांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय जिल्ह्यात रिक्षा वाहतुक ठप्प असल्याने सुमारे दहा लाखांचे दिवसाचे नुकसानही झाले आहे.

चंद्रकांत भोसले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वाहतुक सेना

फोटो : १६०५२०२१-कोल-प्रवासी

ओळी : राष्ट्रीय महामार्गालगतच्या तावडे हाॅटेल परिसरातील बस थांब्यावर रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रवासी बसची वाट पाहत बसले होते.

(छाया : नसीर अत्तार)