शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

खासगी बससह रिक्षाही जागेवरच ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST

कोल्हापूर : आठ दिवसांच्या लाॅकडाऊनमुळे रविवारपासून कोल्हापुरातून बाहेर जिल्ह्यासह परराज्यात होणारी खासगी आराम बस वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली ...

कोल्हापूर : आठ दिवसांच्या लाॅकडाऊनमुळे रविवारपासून कोल्हापुरातून बाहेर जिल्ह्यासह परराज्यात होणारी खासगी आराम बस वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणारी रिक्षा वाहतूकही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे सुमारे ५०० खासगी बस व जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक रिक्षा व्यवसाय ठप्प झाला.

जिल्ह्यातून नियमित पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आदी मार्गावर सुमारे ५०० हून अधिक खासगी बस रोज धावत होत्या. मात्र, पहिल्या लाॅकडाऊननंतर त्यात घट झाली. सद्य:स्थितीतही केवळ ६० बस शनिवारी रात्रीपर्यंत बाहेर जात होत्या. मात्र, त्यांनतर पुन्हा आठ दिवसांसाठी जिल्ह्यात पूर्णपणे लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही वाहतूक पूर्णपणे बंद झाली. शनिवारी रात्री दोन खासगी बस पुण्याकडे रवाना होणार होत्या. मात्र, त्यातील १२ जणांना प्रशासनाने योग्य कारण नसल्यामुळे ई-पास नाकारला. त्यामुळे याही बस रद्द करण्यात आल्या.

जिल्ह्यात एस.टी.सह, खासगी प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यावर निर्भर असणारा रिक्षा व्यवसायही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे रविवारी संपूर्ण दिवस मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकही रिक्षा दिसली नाही. दरम्यान कोल्हापूर रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी महाराष्ट्र एक्स्प्रेस आल्यानंतर त्यातून उतरलेल्या प्रवाशांना घरापर्यंत जाण्यासाठी एकही वाहन मिळाले नाही. अनेकांना पायी प्रवास करावा लागला. तर ज्यांना ग्रामीण भागात जायचे होते, असे ई-पास धारकही नातेवाइकांची वाट पाहत होते.

खासगी बस व्यवसायावर हजारो जण निर्भर

जिल्ह्यात २५०० हून अधिक खासगी बस आहेत. त्यापैकी पहिल्या लाॅकडाऊननंतर रस्त्यावर केवळ ५०० च्या आसपास धावत आहेत. अन्य बस व्यावसायिकांना बँकांसह विमा, चालक पगार, देखभाल दुरुस्ती आदी खर्च परवडेनासा झाला आहे. त्यामुळे त्यांना हा व्यवसायाच बंद केला आहे. या व्यवसायावर १५०० हून अधिक मेकॅनिक, तर २०० हून अधिक ऑटोमोबाइल दुकाने, टायर व्यावसायिक, डिझेल पंपचालक आदी अवलंबून आहेत. असा हजारो जणांचा संसार या व्यवसायावर निर्भर आहे. कोल्हापुरातील या बस बंदमुळे व्यावसायिकांना सुमारे ३ कोटींचा फटका बसणार आहे.

प्रतिक्रिया

जवळचा नातेवाईक मृत झाल्यानंतर किंवा परदेशात फ्लाइट असतानाही योग्य कारण नसल्याचे सांगून ई-पास नाकारला जात आहे. त्यात बसनाही परवानगी नाही. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. याचा विचार शासनाने करणे जरूरीचे आहे.

-महेश गोवेकर, उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा कार ऑपरेटर्स असोसिएशन

प्रतिक्रिया

रिक्षा व्यावसायिकांना अटी, शर्तीवर शहरातून अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देणे गरजेचे होते. रेल्वेतून आलेल्या प्रवाशांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय जिल्ह्यात रिक्षा वाहतुक ठप्प असल्याने सुमारे दहा लाखांचे दिवसाचे नुकसानही झाले आहे.

चंद्रकांत भोसले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वाहतुक सेना

फोटो : १६०५२०२१-कोल-प्रवासी

ओळी : राष्ट्रीय महामार्गालगतच्या तावडे हाॅटेल परिसरातील बस थांब्यावर रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रवासी बसची वाट पाहत बसले होते.

(छाया : नसीर अत्तार)