शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

घोषणा नको अंंमलबजावणी हवी : रिक्षाचालकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:25 IST

जिल्ह्यातील २० हजार रिक्षाचालकांना त्याचा लाभ मिळणार आहे.रिक्षाचालकांसाठीही स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावे.

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक भाग म्हणून सेवा बजावणाऱ्या रिक्षाचालकांकरिता मुख्यमंत्र्यांनी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. ते त्वरित मंजूर करून त्याच्या अंमलबजावणीची मागणी होत आहे. ते मंजूर झाल्यास जिल्ह्यातील २० हजार रिक्षाचालकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

रिक्षाचालकांसाठीही स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावे. जेणेकरून अनेक वर्षे रिक्षा व्यवसाय करून पोट भरणाऱ्यांना पेन्शन, घरकुल, विमा, वैद्यकीय सुविधा मिळावी. याकरिता राज्यभरातील लाखो रिक्षाचालक आंदोलन, निवेदन, आदी मार्गांनी सरकारकडे मागणी करीत होते. त्याप्रमाणे चार वर्षांपूर्वी मावळत्या सरकारने जाता-जाता रिक्षाचालकांकरिता कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर आणखी एकदा सर्व रिक्षा संघटनांनी विद्यमान सरकारकडे महामंडळाची पुन्हा मागणी केली. त्यानुसार या सरकारने अगदी तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून पुन्हा एकदा रिक्षाचालकांकरिता स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही घोषणा हवेत विरून न जाता तिची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील रिक्षाचालक-मालक आणि संघटनांकडून व्यक्त होत आहे.प्रतीक्षा वृत्तपत्र विक्रेता महामंडळाच्या घोषणेचीस्टॉलसाठी जागा द्या, घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवा, संघटनेच्या पदाधिकाºयांना मोफत एस.टी. प्रवासाची सोय करा, संघटनेच्या बैठकीसाठी शासकीय विश्रामगृह उपलब्ध करून द्या, विधान परिषदेवर असंघटित कामगारांचा प्रतिनिधी नेमण्यात यावा, पेन्शन, आदी मागण्या वृत्तपत्र विक्रेता महामंडळाच्या आहेत. त्याचीही मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून त्याचीही अंमलबजावणी त्वरित करावी, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांकडून होत आहे.विविध मागण्या अशालायसेन्स, बॅज असलेल्या सर्व रिक्षाचालकांना महामंडळाचा लाभ व्हावा.ज्यांचे वय ६० वर्षे पूर्ण झाले आहे, अशा रिक्षाचालक, मालक यांना किमान ३००० रुपये पेन्शन मिळावी.रिक्षाचालकांकरिता खास घरकुल योजना तयार करावी.खासगी विमा कंपन्यांपेक्षा या महामंडळाद्वारे रिक्षासह चालक, मालकांचाही विमा उतरवावा.रिक्षा व्यवसायिकांना सार्वजनिक व्यवस्थेचा एक भाग म्हणून शासन उपक्रमाप्रमाणे सामावून घ्यावे.रिक्षाचालकांच्या पाल्यांकरिता खास शैक्षणिक शिष्यवृत्ती द्यावी. 

वाढत्या महागाईत रिक्षा व्यावसायिकांना महामंडळाच्या रूपाने चांगली भेट मिळेल. त्याचा लाभ जिल्ह्यातील २० हजार रिक्षाचालकांनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही होईल.- राजू जाधव, जिल्हाध्यक्ष

 

मागील सरकारप्रमाणे विद्यमान सरकारने केवळ या महामंडळाची घोषणा न करता त्याची अंमलबजावणी करून रिक्षा व्यावसायिकांना सुखद धक्का द्यावा.- चंद्रकांत भोसले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा वाहतूक सेना 

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूरRto officeआरटीओ ऑफीस