शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार हजार रिक्षा निघणार मोडीत, १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:02 IST

राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील लाखो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३ हजार ९१६ इतक्या रिक्षा मोडीत निघणार आहेत. यातील बहुतांश रिक्षा बीएस- दोन या युरो मानांकनातील आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चार हजार रिक्षा निघणार मोडीत, १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षाबहुतांश रिक्षा बीएस-२ मानांकनाच्या; पर्यावरण ऱ्हास रोखण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील लाखो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३ हजार ९१६ इतक्या रिक्षा मोडीत निघणार आहेत. यातील बहुतांश रिक्षा बीएस- दोन या युरो मानांकनातील आहेत.प्रदूषण करणाऱ्या वाहनांमुळे वातावरणात कार्बन मोनोआॅक्साईड व कार्बन डायआॅक्साईड हे दोन विषारी वायू सोडले जातात. हे दोन वायू मानवी शरीरास घातक समजले जातात. त्यामुळे जागतिक तापमानातही वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून विकसनशील देशांमध्ये बीएस- ही युरो मानांकन करणारी वाहनांची श्रृंखला निर्माण करण्यात आली.

यात वातावरणात कमी प्रदूषण करतील अशा इंजिनांची निर्मिती वाहन उत्पादक कंपन्यांनी केली. त्यानुसार भारतात बी. एस. १ ते आतापर्यंत बी. एस. ६ इथपर्यंत मानांकनानुसार वाहने रस्त्यांवर धावू लागली. त्यात कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांची निर्मिती झाली. यातही मग पहिल्या मानांकनानुसार बनविण्यात आलेली आधीची वाहने अधिक प्रदूषण करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.

त्यामुळे ती रस्त्यांवरून हटवून स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील अशा प्रदूषण करणाऱ्या बी. एस. २ च्या रिक्षांचा समावेश यात करण्यात आला. त्यास अनुसरून राज्यात हा निर्णय घेण्यात आला. सर्वांत चांगला पर्याय म्हणून सीएनजी अर्थात कॉम्प्रेसिव्ह नॅचरल गॅसवर वाहने चालविणे अधिक सोईस्कर व पर्यावरणपूरक झाले आहे. याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.सन २०१३ साली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या ठाणे, पनवेल, नवी मुंबई, मुंबई या शहरांतील १६ आणि २० वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याचा पहिला निर्णय राज्य शासनाने घेतला. आता उर्वरित महाराष्ट्रात हा निर्णय लागू करण्यात आला आहे. कोल्हापूरचा विचार करता, आजमितीला तीन हजार ९१६ रिक्षांनी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडली आहे. २०१९ पूर्ण होईपर्यंत २६४ रिक्षांची भर पडणार आहे; तर २०२० साल पूर्ण झाल्यानंतर त्यात आणखी १६३ रिक्षांची भर पडणार आहे. 

जिल्ह्यात आजमितीला १६ हजार ९७६ रिक्षा आहेत. त्यांपैकी तीन हजार ९१६ रिक्षांंनी १६ वर्षांची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या रिक्षा राज्य शासनाच्या निर्णयानुसार स्क्रॅप कराव्या लागणार आहेत. अशा रिक्षांच्या देखभाल -दुरुस्तीवरही अधिक खर्च होतो. शिवाय नवीन गाडी घेतल्यानंतर पर्यावरणाचा ºहास रोखण्यास मदत व प्रवाशांना आरामदायी प्रवासही मिळेल. त्यामुळे रिक्षाचालकांनी विचार करावा.- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

वाढत्या प्रदूषणाबाबत रिक्षाचालकांवरच गंडांतर का? इतर वाहनेही याच नियमानुसार स्क्रॅप करा. ज्या रिक्षा स्क्रॅप करणार त्यांना नवीन रिक्षा घेण्यासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. अन्यथा हा लढा सुरूच राहील.- राजू जाधव, रिक्षाचालक सेना, जिल्हाप्रमुख 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर