शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

जिल्ह्यातील चार हजार रिक्षा निघणार मोडीत, १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:02 IST

राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील लाखो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३ हजार ९१६ इतक्या रिक्षा मोडीत निघणार आहेत. यातील बहुतांश रिक्षा बीएस- दोन या युरो मानांकनातील आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चार हजार रिक्षा निघणार मोडीत, १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षाबहुतांश रिक्षा बीएस-२ मानांकनाच्या; पर्यावरण ऱ्हास रोखण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील लाखो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३ हजार ९१६ इतक्या रिक्षा मोडीत निघणार आहेत. यातील बहुतांश रिक्षा बीएस- दोन या युरो मानांकनातील आहेत.प्रदूषण करणाऱ्या वाहनांमुळे वातावरणात कार्बन मोनोआॅक्साईड व कार्बन डायआॅक्साईड हे दोन विषारी वायू सोडले जातात. हे दोन वायू मानवी शरीरास घातक समजले जातात. त्यामुळे जागतिक तापमानातही वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून विकसनशील देशांमध्ये बीएस- ही युरो मानांकन करणारी वाहनांची श्रृंखला निर्माण करण्यात आली.

यात वातावरणात कमी प्रदूषण करतील अशा इंजिनांची निर्मिती वाहन उत्पादक कंपन्यांनी केली. त्यानुसार भारतात बी. एस. १ ते आतापर्यंत बी. एस. ६ इथपर्यंत मानांकनानुसार वाहने रस्त्यांवर धावू लागली. त्यात कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांची निर्मिती झाली. यातही मग पहिल्या मानांकनानुसार बनविण्यात आलेली आधीची वाहने अधिक प्रदूषण करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.

त्यामुळे ती रस्त्यांवरून हटवून स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील अशा प्रदूषण करणाऱ्या बी. एस. २ च्या रिक्षांचा समावेश यात करण्यात आला. त्यास अनुसरून राज्यात हा निर्णय घेण्यात आला. सर्वांत चांगला पर्याय म्हणून सीएनजी अर्थात कॉम्प्रेसिव्ह नॅचरल गॅसवर वाहने चालविणे अधिक सोईस्कर व पर्यावरणपूरक झाले आहे. याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.सन २०१३ साली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या ठाणे, पनवेल, नवी मुंबई, मुंबई या शहरांतील १६ आणि २० वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याचा पहिला निर्णय राज्य शासनाने घेतला. आता उर्वरित महाराष्ट्रात हा निर्णय लागू करण्यात आला आहे. कोल्हापूरचा विचार करता, आजमितीला तीन हजार ९१६ रिक्षांनी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडली आहे. २०१९ पूर्ण होईपर्यंत २६४ रिक्षांची भर पडणार आहे; तर २०२० साल पूर्ण झाल्यानंतर त्यात आणखी १६३ रिक्षांची भर पडणार आहे. 

जिल्ह्यात आजमितीला १६ हजार ९७६ रिक्षा आहेत. त्यांपैकी तीन हजार ९१६ रिक्षांंनी १६ वर्षांची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या रिक्षा राज्य शासनाच्या निर्णयानुसार स्क्रॅप कराव्या लागणार आहेत. अशा रिक्षांच्या देखभाल -दुरुस्तीवरही अधिक खर्च होतो. शिवाय नवीन गाडी घेतल्यानंतर पर्यावरणाचा ºहास रोखण्यास मदत व प्रवाशांना आरामदायी प्रवासही मिळेल. त्यामुळे रिक्षाचालकांनी विचार करावा.- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

वाढत्या प्रदूषणाबाबत रिक्षाचालकांवरच गंडांतर का? इतर वाहनेही याच नियमानुसार स्क्रॅप करा. ज्या रिक्षा स्क्रॅप करणार त्यांना नवीन रिक्षा घेण्यासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. अन्यथा हा लढा सुरूच राहील.- राजू जाधव, रिक्षाचालक सेना, जिल्हाप्रमुख 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर