शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा ‘पीएफ’ रखडला

By admin | Updated: July 17, 2015 00:05 IST

आस्थापनाची दिरंगाई : ९७० कर्मचाऱ्यांना फटका--लोकमत हेल्पलाईन न्यूज

कोल्हापूर : महापालिकेकडे रोजंदारी व ठोक मानधनावर असलेल्या ९७० कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची दोन कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाकडे जमा झालेली नाही. पगारातून दरमहा १२ टक्के कपात होणारी रक्कम नेमकी कुठे जाते, याची माहिती तरी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी अनिल जाधव यांनी ‘लोकमत’कडे हेल्पलाईनद्वारे गुरुवारी केली. याबाबत महापालिका प्रशासनाकडे चौकशी केली असता, निधीकडे पैसा जमा करणे सुरू असून, येत्या दोन महिन्यांत सर्व पैसे जमा होतील, असे सांगण्यात आले.महापालिकेकडे रोजंदारी व ठोक मानधनावर ९७० कर्मचारी कामावर आहेत. महापालिकेच्या आस्थापना विभागाकडून या कर्मचाऱ्यांतून दरमहा कपात होणारी १२ टक्के भविष्य निर्वाह निधीची रक्कम व महापालिकेच्या वाट्याची १२ टक्के अशी २४ टक्के रक्कम संबंधित विभागाकडे जमाच केलेली नाही. कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर १६ फेब्रुवारीला सात दिवसांची नोटीसही बजावली. मात्र, मनपा प्रशासनाने हालचाल केलीच नाही.भविष्य निधी संघटनेच्या कारवाईच्या तगाद्याने आता प्रशासनाने भविष्य निर्वाहचे पैसे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. आस्थापना विभागाकडे या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती अनेकवेळा सांगूनही दिली गेली नाही. जन्म दिनांक, कामावर रूजू दिनांक, आदी अत्यंत साधी कार्यालयीन माहितीही देण्यास आस्थापना विभागाने कुचराई केली. परिणामी गेली दोन वर्षे पैशांची मासिक पगारातून वजावट होऊनही ते भविष्य निर्वाह निधीकडे जमा झाले नाहीत. आता कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीच्या खात्याचा तपशील मागण्यास सुरुवात केल्याने प्रशासन हडबडल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)आस्थापनातील त्रुटींमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य निधीचे पैसे जमा होऊन संबंधित खात्याकडे वर्ग करता आले नाहीत. गेल्या महिन्याभरात एक कोटी ५९ लाख व एक कोटी २५ लाख रुपये असे दोन टप्प्यांत हे पैसे निधीकडे जमा केले आहेत. आता फक्त मागील तीन महिन्यांचे ४५ लाख रुपये जमा करणे बाकी आहेत.- संजय सरनाईक, मुख्य लेखाधिकारी, महापालिकाआमच्या पगारातून कपात होणारे पैसे नेमके कुठे जातात याची माहिती तोंडी व लेखी मागूनही दिली जात नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीकडेही याबाबत दाद मागितली. कर्मचाऱ्यांच्या पैशांचा हिशेब किंवा खात्यांचा तपशील वेळोवेळी मिळाला पाहिजे.- अनिल जाधव, पवडी रोजंदारी कर्मचारी, महापालिका