शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांचे १ कोटी परत, शेतकरी निवासासाठी घेतली होती रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 05:14 IST

कोल्हापूर : पुण्यातील साखर संकुलामध्ये राज्यभरातील साखर कारखान्यांना शेतकरी निवास कक्ष देण्यासाठी भरून घेतलेले एक कोटी सहा लाख रुपये संबंधित कारखान्यांना परत करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे.

विश्वास पाटील कोल्हापूर : पुण्यातील साखर संकुलामध्ये राज्यभरातील साखर कारखान्यांना शेतकरी निवास कक्ष देण्यासाठी भरून घेतलेले एक कोटी सहा लाख रुपये संबंधित कारखान्यांना परत करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार १२ कारखान्यांना आरटीजीएसद्वारे ही रक्कम परतही करण्यात आली आहे. ‘लोकमत’मध्ये १२ आॅक्टोबरच्या अंकात त्यासंबंधीचे वृत्त प्रसिद झाले होते. त्याची दखल घेऊन पैसे परत करण्याची प्रक्रिया त्याच दिवसापासून गतीने करण्यात आली.पुण्यात कृषी महाविद्यालयाच्या ७ एकरांवर साखर संकुलाची उभारणी करण्यात आली. तीन एकरांवर शेतकरी निवास, अधिकारी निवासस्थाने व कारखान्यांसाठी कक्ष बांधण्यात येणार होते. त्यासाठी मंत्री समितीच्या २००५च्या बैठकीत कारखान्यांकडून निधी जमा करण्याचा निर्णय झाला. देखभालीसाठी म्हणून साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टची स्थापना करण्यात आली; परंतु कृषी विद्यापीठाने जागा देण्यास नकार दिला. ज्या कामासाठी ट्रस्टची स्थापना केली ते कामच न राहिल्याने ट्रस्ट बरखास्त करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला; २००५पासूनचे लेखापरीक्षणाचे अहवाल व चेंज रिपोर्ट सादर करण्याची सूचना धर्मादाय आयुक्तांनी केली. ती प्रक्रिया सुरू आहे. त्याचदरम्यान ९ आॅगस्ट २०१७ला कारखान्यांचा निधी परत करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले; प्रत्यक्षात पैसे परत दिलेले नव्हते.‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच साखर आयुक्त कार्यालयातून संबंधित कारखान्यांना फोन आले व कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना देण्यात आली.>व्याजाची अडचणट्रस्ट स्थापन करताना त्याला सामाजिक कारणावरून आयकर सवलत मिळाली होती; तो उद्देशच पूर्ण न झाल्याने जमा केलेल्या निधीवर आयकर विभागास तब्बल एक कोटी रुपये भरावे लागले. त्यामुळे कारखान्यांना फक्त मुद्दलच परत करण्यात येत आहे.