शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

माघार संपली, थेट लढाई सुरू

By admin | Updated: October 17, 2015 00:57 IST

कोल्हापूर महापालिका निवडणूक : ५०६ उमेदवार रिंग्ांणात; दोन माजी महापौरांसह २६ नगरसेवकांचा समावेश

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची सत्ता कोणाच्या हाती सोपवायची, याचा फैसला करणाऱ्या महानगरपालिकेच्या आठव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहुरंगी, तसेच चुरशीने लढती होणार हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. शहरातील ८१ प्रभागांत एकूण ५०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पक्षीय पातळीवर निवडणूक होत असल्याने बहुतांश अपक्ष उमेदवारांनी नांगी टाकत या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली. महानगरपालिका निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरला मतदान होत आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया ६ आॅक्टोबरपासून सुरू झाली असून, शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी एकूण ७८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी २७७ उमेदवारांनी गेल्या दोन दिवसांत माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ५०६ उमेदवार राहिले. या निवडणुकीत नंदकुमार वळंजू, जयश्री सोनवणे हे दोन माजी महापौर, २६ विद्यमान नगरसेवक, २० माजी नगरसेवक, राजकीय नेत्यांचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते आपले राजकीय भवितव्य अजमावून पाहत आहेत. कॉँग्रेसचे नगरसेवक सचिन चव्हाण व भाजपचे नगरसेवक आर. डी. पाटील यांचे अर्ज अवैध ठरल्याने त्यांना या निवडणुकीपासून दूर राहावे लागणार आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची शहरावरील ताकद सिद्ध करणारी ही निवडणूक आहे. देशात आणि राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप व शिवसेना या पक्षांनी निवडणुकीत सवता सुभा मांडत दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. भाजपने मात्र स्थानिक ताराराणी आघाडी, आरपीआय व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी महायुती करत नवी व्यूहरचना आखली आहे. भाजपची रणनीती ओळखून तेवढ्याच ताकदीने शिवसेनेनेही स्वतंत्रपणे तयारी केली आहे. सध्या महानगरपालिका सभागृहात सत्तारूढ असलेल्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडी यांनीही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शेतकरी कामगार पक्ष, हिंदू महासभा, भाकप, माकप, तसेच राजू माने प्रणीत एस फोर ए आघाडी, आदी पक्ष व आघाड्यांनी आपापल्या ताकदीनुसार उमेदवार उभे केले आहेत. परंतु, खरी लढत ही कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यातच होईल. शहरात ८१ प्रभाग असून, सर्व प्रभागांतून कमीत कमी चार व जास्तीत जास्त १६ उमेदवार निवडणूक लढवित असल्याने या सर्वच लढती बहुरंगी होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेचे सोपान आपल्या हाती राखण्यासाठी कंबर कसली कसली आहे. त्यामुळे सर्वत्र चुरशीच्या लढती होणार आहेत. (प्रतिनिधी)