शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

माघार संपली, थेट लढाई सुरू

By admin | Updated: October 17, 2015 00:57 IST

कोल्हापूर महापालिका निवडणूक : ५०६ उमेदवार रिंग्ांणात; दोन माजी महापौरांसह २६ नगरसेवकांचा समावेश

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची सत्ता कोणाच्या हाती सोपवायची, याचा फैसला करणाऱ्या महानगरपालिकेच्या आठव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहुरंगी, तसेच चुरशीने लढती होणार हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. शहरातील ८१ प्रभागांत एकूण ५०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पक्षीय पातळीवर निवडणूक होत असल्याने बहुतांश अपक्ष उमेदवारांनी नांगी टाकत या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली. महानगरपालिका निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरला मतदान होत आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया ६ आॅक्टोबरपासून सुरू झाली असून, शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी एकूण ७८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी २७७ उमेदवारांनी गेल्या दोन दिवसांत माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ५०६ उमेदवार राहिले. या निवडणुकीत नंदकुमार वळंजू, जयश्री सोनवणे हे दोन माजी महापौर, २६ विद्यमान नगरसेवक, २० माजी नगरसेवक, राजकीय नेत्यांचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते आपले राजकीय भवितव्य अजमावून पाहत आहेत. कॉँग्रेसचे नगरसेवक सचिन चव्हाण व भाजपचे नगरसेवक आर. डी. पाटील यांचे अर्ज अवैध ठरल्याने त्यांना या निवडणुकीपासून दूर राहावे लागणार आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची शहरावरील ताकद सिद्ध करणारी ही निवडणूक आहे. देशात आणि राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप व शिवसेना या पक्षांनी निवडणुकीत सवता सुभा मांडत दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. भाजपने मात्र स्थानिक ताराराणी आघाडी, आरपीआय व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी महायुती करत नवी व्यूहरचना आखली आहे. भाजपची रणनीती ओळखून तेवढ्याच ताकदीने शिवसेनेनेही स्वतंत्रपणे तयारी केली आहे. सध्या महानगरपालिका सभागृहात सत्तारूढ असलेल्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडी यांनीही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शेतकरी कामगार पक्ष, हिंदू महासभा, भाकप, माकप, तसेच राजू माने प्रणीत एस फोर ए आघाडी, आदी पक्ष व आघाड्यांनी आपापल्या ताकदीनुसार उमेदवार उभे केले आहेत. परंतु, खरी लढत ही कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यातच होईल. शहरात ८१ प्रभाग असून, सर्व प्रभागांतून कमीत कमी चार व जास्तीत जास्त १६ उमेदवार निवडणूक लढवित असल्याने या सर्वच लढती बहुरंगी होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेचे सोपान आपल्या हाती राखण्यासाठी कंबर कसली कसली आहे. त्यामुळे सर्वत्र चुरशीच्या लढती होणार आहेत. (प्रतिनिधी)