शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पूर्वीचेच रेखांकन कायम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

कोपार्डे : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन बदलून भुये, भुयेवाडी ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला आहे. एकाच रस्त्यासाठी दोन दोन रस्ते ...

कोपार्डे : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन बदलून भुये, भुयेवाडी ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला आहे. एकाच रस्त्यासाठी दोन दोन रस्ते प्रस्तावित केल्याने येथील पिकाऊ जमीन व स्थावर मालमत्तेचे नुकसान होणार आहे. यासाठी सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेले पूर्वीचे रेखांकन कायम करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, २०१८ मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेल्या रेखांकनात बदल केल्यामुळे भुये आणि भुयेवाडी ग्रामस्थांची कसदार जमीन, स्थावर मालमत्तेबरोबर नैसर्गिक जलस्रोत असणाऱ्या चार पाच विहिरी कूपनलिका नष्ट होणार आहेत. यामुळे भविष्यात अनेक ग्रामस्थ भूमिहीन होणार आहेत.

गेली दोन वर्षे आम्ही याबाबत लढा देत आहोत. मात्र, याची राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. उलट छुप्या पद्धतीने भूसंपादनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्वसंमतीने मंजूर रेखांकनाप्रमाणे रस्ता करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

तर निवडणुकांवर बहिष्कार

चौकट : अधिकारी छुप्या पद्धतीने भूसंपादनाचा घाट घालत असून तो त्यांनी वेळीच थांबवावा. अन्यथा गोकुळच्या निवडणुकीत दोन गावच्या दूध संस्थांचे ठरावधारक वेगळा विचार करतील आणि पुढील निवडणुकीवरही बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा देव पाटील यांनी दिला. या निवेदनावर गोकुळचे ठरावधारक शिवाजी महादेव पाटील, अमित शिवकुमार पाटील, अश्विनी विकास पाटील, राजेंद्र पाटील, बाजीराव पाटील, राजेंद्र स्वामी, शकुंतला स्वामी, माणिक स्वामी यांच्यासह ४०० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

फोटो: ०३ भुयेवाडी निवेदन

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे पूर्वीचे रेखांकन कायम ठेवा, अशी मागणी भुये, भुयेवाडीतील ग्रामस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली.