शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पूर्वीचेच रेखांकन कायम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

कोपार्डे : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन बदलून भुये, भुयेवाडी ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला आहे. एकाच रस्त्यासाठी दोन दोन रस्ते ...

कोपार्डे : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन बदलून भुये, भुयेवाडी ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला आहे. एकाच रस्त्यासाठी दोन दोन रस्ते प्रस्तावित केल्याने येथील पिकाऊ जमीन व स्थावर मालमत्तेचे नुकसान होणार आहे. यासाठी सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेले पूर्वीचे रेखांकन कायम करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, २०१८ मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेल्या रेखांकनात बदल केल्यामुळे भुये आणि भुयेवाडी ग्रामस्थांची कसदार जमीन, स्थावर मालमत्तेबरोबर नैसर्गिक जलस्रोत असणाऱ्या चार पाच विहिरी कूपनलिका नष्ट होणार आहेत. यामुळे भविष्यात अनेक ग्रामस्थ भूमिहीन होणार आहेत.

गेली दोन वर्षे आम्ही याबाबत लढा देत आहोत. मात्र, याची राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. उलट छुप्या पद्धतीने भूसंपादनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्वसंमतीने मंजूर रेखांकनाप्रमाणे रस्ता करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

तर निवडणुकांवर बहिष्कार

चौकट : अधिकारी छुप्या पद्धतीने भूसंपादनाचा घाट घालत असून तो त्यांनी वेळीच थांबवावा. अन्यथा गोकुळच्या निवडणुकीत दोन गावच्या दूध संस्थांचे ठरावधारक वेगळा विचार करतील आणि पुढील निवडणुकीवरही बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा देव पाटील यांनी दिला. या निवेदनावर गोकुळचे ठरावधारक शिवाजी महादेव पाटील, अमित शिवकुमार पाटील, अश्विनी विकास पाटील, राजेंद्र पाटील, बाजीराव पाटील, राजेंद्र स्वामी, शकुंतला स्वामी, माणिक स्वामी यांच्यासह ४०० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

फोटो: ०३ भुयेवाडी निवेदन

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे पूर्वीचे रेखांकन कायम ठेवा, अशी मागणी भुये, भुयेवाडीतील ग्रामस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली.