शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कामगार भरतीत कंत्राटी कामगारांना कायम करा - राजू शेट्टी

By संदीप आडनाईक | Updated: March 5, 2024 19:54 IST

महावितरणमध्ये शासनाकडून नवीन कामगार भरती केली जात आहे.

कोल्हापूर: महावितरणमध्ये शासनाकडून नवीन कामगार भरती केली जात आहे. त्यात उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस स्वत:चा जीव धोक्यात घालून गेल्या १५ ते २० वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्यांना कायम करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. कोल्हापूरातील महावितरणच्या कार्यालयासमोर सुरु असलेल्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली, त्यावेळी झालेल्या द्वारसभेत ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीतर्फे कोल्हापुरात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. यावेळी नेत्यांनी द्वारसभा घेतली. वीज मंडळाच्या तिन्ही कंपन्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना कायम करावे, नवीन नोकर भरती प्रक्रिया राबवू नये, सध्या मिळत असलेल्या एकुण पगार, भत्ता यासंदर्भात १ एप्रिल २०२३ पासून मागील सर्व फरकांसह ३० टक्के वेतन वाढ करावी, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावेत, तसे आदेश संबंधित कंपन्यांना कळवावेत, रानडे समितीच्या शिफारशींनुसार भरतीसाठीची वयोमर्यादा समान असावी, कंत्राटी कामगारांना सामाउन घेताना वयोमर्यादेत सवलत द्यावी, कंत्राटदार हटवून शासनाचे २३ टक्के पैसे वाचवावेत, अपघात विमा, सेवानिवृत्तीची ग्रॅच्युअटीचा लाभ देण्यासह इतर मागण्या संघटनेने केल्या आहेत.

भरतीच्या नावे वीज वितरण कर्मचाऱ्यांचे शोषणराज्यामध्ये महावितरण विभागामध्ये भ्रष्ट कारभार सुरु असून नवीन निर्माण झालेल्या बांडगुळी व्यवस्थेमुळे कंत्राटी भरतीच्या नावाखाली वीज वितरण कर्मचाऱ्यांचे शोषण केले जात आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. प्रशासकीय पातळीवर मंत्रालयापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून कंत्राटी कामगारापेक्षा कंपन्यांचेच भले होत आहे, कंत्राटी कंपन्या आणि सरकारमधील बड्या लोकांचे अर्थपूर्ण हितसंबंध असून संगनमताने कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते, असे राजू शेट्टी म्हणाले. राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्या या योग्य असून याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेतले पाहिजे, त्यांना अपघात विमा, सेवानिवृत्तीपोटी ग्रॅच्युयटी यासारख्या गोष्टींचा लाभ मिळाला पाहिजे, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी