शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या साठ्यावर निर्बंध आणण्याच्या हालचाली

By admin | Updated: April 28, 2016 00:19 IST

व्यापारीवर्गात अस्वस्थता : दर घसरून साखर उद्योग पुन्हा अडचणीत येण्याची भीती

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी साखरेचा साठा आणि उलाढालीवर निर्बंध आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. यामुळे साखर व्यापाऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. असे निर्बंध आल्यास साखरेचे दर घसरून हा उद्योग पुन्हा अडचणीत येण्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.गेल्या दोन वर्षांपासून साखरेचे दर घसरल्याने साखर उद्योग अडचणीत आला होता. तो १९५० रुपये क्विंटलपर्यंत खाली आला होता. उत्पादन खर्चापेक्षाही साखरेचे दर कमी झाल्याने कारखान्यांना तोटा सहन करावा लागत होता. उसाची एफआरपी देणेही अशक्य बनले होते. केंद्र आणि राज्य सरकारने या उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी निर्यात अनुदान, बिनव्याजी कर्ज अशा स्वरूपात मदत दिली. गेल्या दोन महिन्यांपासून साखरेचे दर वाढू लागल्याने या उद्योगाला ‘अच्छे दिन’ दिसू लागले होते. हे दर प्रतिक्विंटल ३५०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचल्याने साखरेचा किरकोळ बाजारातील दर ४० रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचला. दरातील वाढती तेजी पाहता व्यापाऱ्यांनी फॉरवर्ड ट्रेडिंगमध्ये आॅक्टोबरचा भाव ३६०० रुपये प्रतिक्विंटलवर नेऊन ठेवला. ही दरवाढ अशीच चालू राहिल्यास बाजारातील साखरेचा दर प्रतिकिलो ५० रुपयांवर जाऊन पोहोचेल अशी भीती व्यक्त केली जाऊ लागल्याने केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेत ही दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांकडील साखरेचा साठा आणि उलाढालीवर निर्बंध आणण्याचे संकेत दिले. यामुळे व्यापाऱ्यांत खळबळ माजली. दरवाढीलाही ब्रेक लागला आणि ३५०० रुपयांपर्यंत गेलेला साखरेचा दर कमी होऊ लागला. सध्या तो ३३०० ते ३३५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहे. साखरेच्या साठ्यावर निर्बंध आणल्यास अडचणी येऊ शकतात हे लक्षात आल्याने व्यापाऱ्यांनी कारखान्यांकडील साखर खरेदी कमी करून आपल्याकडील साखर विक्रीला काढल्याने दर उतरले असल्याचे कारण साखर कारखानदारीतील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. कारखान्यामध्ये तयार झालेली साखर ग्राहकांपर्यंत जाईपर्यंत ती चार ते पाच मध्यस्थांमार्फत जाते. त्यामुळे साखरेच्या साठ्यावर निर्बंध आणून सरकारला जे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे ते होईलच याबाबत व्यापाऱ्यांच्या मनातही शंका आहे. ती सरकारच्या कानावर घालण्यासाठी आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नवी दिल्लीत पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्रराज मिश्रा यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि चर्चा केली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल विठलानी यांनी केले. व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील साखरेचा अतिरिक्त साठा बाजारात आणण्यासाठी पुरेसा वेळ दिला जावा. तो कालावधी साठ्यावर निर्बंध आणणारा अध्यादेश ज्या दिवशी निघेल त्या दिवसापासून ३० दिवसांचा असावा. साखरेच्या साठ्याची मर्यादा कोलकाता येथे एक हजार टनांवरून १५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढवावी. उर्वरित देशात ही मर्यादा ५०० टनांची आहे, ती १००० टनांपर्यंत वाढवावी. निर्यात अनुदान थांबविण्यात यावे. साठ्याची मर्यादा सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी दिल्या जाणाऱ्या साखरेला लागू करू नये. राज्य सरकारचा एक्साइज गेट पास अनिवार्य करून ही सार्वजनिक वितरणासाठीची साखर दिली जावी. सध्या ज्यांनी कराराद्वारे घेऊन ठेवलेली एनसीडीइएक्सच्या गोदामात साखर ठेवली आहे, त्या साठ्याची निर्गत करण्यासाठी एकवेळ यातून सूट द्यावी. नवीन साखरेला ही सूट दिली जाऊ नये, आदी मागण्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केल्या आहेत.काही कारखाने अडचणीतसाखरेचे दर वाढू लागल्याने ते आणखी वाढतील या अपेक्षेने काही कारखान्यांनी आपली साखरच विक्रीला काढलेली नाही. आता दर घसरू लागल्याने या कारखान्यांवर कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.दर उत्पादन खर्चापेक्षा जादासध्या बाजारात मिळणारा दर साखरेच्या उत्पादन खर्चापेक्षा जादा आहे. किमान कारखान्यांना तोटा होणार नाही हे तरी निश्चित आहे. यामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस येऊ लागले आहेत. साठ्याची मर्यादा आल्यास दर पुन्हा आणखी खाली येऊन साखर कारखानदारी पुन्हा अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.